शुक्रवार, 27 फ़रवरी 2009

गुरुवरप्रार्थनापंचरत्‍नस्तोत्रम्

श्रीगणेशाय नमः ॥ यं विज्ञातुं भृगु पितरमुपगतः पंचवारं यथावज्ज्ञानादेवामृताप्तेः सततमनुपमं चिद्विवेकादि लब्ध्वा ।
तस्मै तुभ्यं नमः श्रीहरिहरगुरवे सच्चिदानंदमुक्‍तानंताद्वैतप्रतिते न कुरु कितवतां पाहि मां दीनबंधो ॥ १ ॥
यस्मान्नश्यस्य जन्मस्थितिविलयमिमे तैत्तिरीयाः पठंति स्वाविद्यामात्रयोगात्सुखशयनतले मुख्यतः स्वप्नवच्च । तस्मै० ॥ २ ॥

यो वेदांतैकलभ्यं श्रुतिषु नियमितस्तैत्तिरीयैश्‍च काण्वैरन्यैरप्यानिषेकादुदयपरिमितं चारुसंस्कारभाजाम् । तस्मै० ॥ ३ ॥
यस्मिन्नेवावसन्नाः सकलनिगमवाङमौलयः सुप्तपुंसि प्रोक्‍तं तन्नामतद्वन्निजमहिमगतध्वांततत्कार्यरूपे । तस्मै० ॥ ४ ॥
चित्त्वात्संकल्पपूर्वं सृजति जगदिदं योगिवन्मायया नः स्वात्मन्येवाद्वितीये परमसुखदृशि स्वप्नवद् भूम्नि नित्ये ॥ तस्मै० ॥ ५ ॥
इत्यच्युतविरचितं गुरुवरप्रार्थनापञ्चरत्‍नस्तोत्रं संपूर्णम् ।

मंगलवार, 24 फ़रवरी 2009

नागनाथ - करुणाष्टक

नागनाथ - करुणाष्टक

श्रीनागनाथा कर ठेवि माथा
संसार व्याधी निरसी समर्था
तू थोर दाता या मृत्युलोकी
कृपाकटाक्षे मज आवलोकी ॥१॥
मी मागतो तुज एक दान

त्वरे निवारी भवदुष्टस्वप्न
उदार राजा शिव सिद्धनाथा
कृपानिधी तारक तारि आता ॥२॥
नको विचारु गुणदोष माझे
शरणागताचे तू घेशि ओझे
सांभाळ बापा आपुल्या ब्रिदासी
चिंतीतसे मी तुझिया पदासी ॥३॥
मी थोर कृतघ्न मोठा
पादारविन्दी घडेचि निष्ठा

हे एक ठायी मन ठेवि देवा
ऐक्य करी सत्वर जीवशीवा ॥४॥
तपतीर्थ नेम
त्रिसंध्या विधियुक्त कर्म
वैराग्य देही अणुमात्र नाही
भावार्थ भक्ती घडेचि काही ॥५॥
अपराधी अपराधराशी
समासमुद्रा मज मोक्ष देशी
बद्धत्वतेचा भ्रम हारवीसी

विकर्म इंधन ज्ञाननळेचि नाशी ॥६॥
तापवीरा गुरु आवतारा
जडजीव नामस्मरचेचि तारा
अज्ञान ज्ञान निरसूनि दोनी
विज्ञानबोध परवस्तुदानी
गुरु सिद्ध तू फणीन्द्रा
तू दाविसी खेचरी सिद्ध मुद्रा
शीघ्रासन घालुनी बैसवीला
म्हणे सिद्धलिंग हे दाखविले मजला ॥७॥

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय।



श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय ४०

श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय ४०


"श्रीगणेशाय नमः
जयजयाजी पंढरीनाथा ॥ पुंडलीकवरदा रुक्मिणीकांता ॥ दीनबंधो अनाथनाथा ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥१॥
मागिलें अध्यायीं रसाळ वचन ॥ तुवां बोलविलें कृपेंकरुन ॥ स्वर्गी चरपटीनाथें जाऊन ॥ इंद्राचा गर्व हरिलासे ॥२॥
हरिहरांची जिंकूनि कोटी ॥ पुढे लोभाची भेटी ॥ गमनकळा नारदहोटीं ॥ प्राप्त झाली महाराजा ॥३॥
उपरी मनिकर्णिकेचें करुनि स्नान ॥ पुढें पातले पाताळभुवन ॥ घेवूनि बळीचा गौरव मान ॥ वामनातें भेटला ॥४॥

भोगावतीची करुनि आंघोळी ॥ पुनः पातला भूमंडळीं ॥ यावरी कथा पुढें कल्होळीं ॥ नवरसातें वाढी कां ॥५॥
असो आतां रमारमण ॥ ग्रंथाक्षरीं बैसला येवून ॥ तरी पुढें श्रोतीं सावधान ॥ कथारस घ्यावा कीं ॥६॥
इंद्र चरपटीनें जिंकला ॥ वैभवें मशकातुल्य केला ॥ तरी तो विस्मयवान खोंचला ॥ खडतरपणीं हदयांत ॥७॥
मग जो गुरु वाचस्पती ॥ परम ज्ञाता सर्वमूर्ती ॥ सहस्त्रनयन तयाप्रती ॥ घेवूनियां बैसलासे ॥८॥
देवमंडळांत सहस्त्रनयन ॥ घेवूनि बैसलासे कनकासन ॥ जैसा नक्षत्रीं रोहिणीरमण ॥ अति तेजें मिरवला ॥९॥
ऐशा रीती पाकशासन ॥ बैसला सेवूनि सभास्थान ॥ मग बृहस्पती विस्मयरत्न ॥ चरपटप्रताप सांगतसें ॥१०॥
अहा वय धाकुटें सान स्वरुप ॥ परी अर्कासमान थोर प्रताप ॥ हरिहरादि करुनि लोप ॥ स्थापूनि गेला आपुलेचि ॥११॥
तरी वाताकर्षणविद्या सबळ ॥ देवदानव झाले निर्बळ ॥ नाथपंथीं हें महाबळ ॥ आतळलें कैसें कळेना ॥१२॥
तरी यातें करुनि उपाय ॥ साध्य करावी इतुकी ठेव ॥ या कर्मासी कोण लाघव ॥ स्वीकारावें महाराजा ॥१३॥

कीं तयाच्या गृहाप्रती जावून ॥ दास्य करावें मनोधर्मे ॥ तोषवूनि सर्व कर्म ॥ महीवरी मिरवावें ॥१४॥
असो यापरी यत्न करुन ॥ भेट घ्यावी त्या गंवसून ॥ परी ते जोगी तीव्रपणें ॥ वर्तताती सर्वदा ॥१५॥
तरी उगलीच घेऊनि सदृढ भेट ॥ अर्थ वदावा तयासी निकट ॥ परी काय चाड आमुची अलोट ॥ कार्यार्थी भीड कोणती ॥१६॥
तरी भिडेचें उपजेपण ॥ उजेड पडेल दासत्वेंकरुन ॥ तयामागें रानोरान ॥ अपार मही हिंडावी ॥१७॥
तरी हिंडल्यानें कोणे काळीं ॥ उदय पावेल कृपानव्हाळी ॥ अमरपुरीची देवमंडळी ॥ तेजोयुक्त होईल ॥१८॥
म्हणाल ऐसें कासयान ॥ हा विपर्यास येईल घडोन ॥ तरी महीं होतो पुण्यपावन ॥ आसन माझें घेतसे ॥१९॥
तरी मी येथें सावधान ॥ करुनि रक्षितों आपुलें आसन ॥ तस्मात् अमरावती सोडून ॥ जाणें नाहीं मजलागीं ॥२०॥
ऐसें बोलतां अमरपती ॥ बोलता झाला वाचस्पती ॥ म्हणे महाराजा नाथाप्रती ॥ येथेंचि आणावे महायत्नें ॥२१॥
तरी तो यत्न म्हणशील कैसा ॥ यज्ञ करावा सोमभासा ॥ त्या निमित्तें नाथ राजसा ॥ घेवोनि यावें स्वर्गासी ॥२२॥

मग तो येथें आल्यापाठी ॥ दावूनि भक्तीची अपार कोटी ॥ मोह उपजवोनि नाथापोटीं ॥ कार्य साधूनि घेइजे ॥२३॥
ऐसें बोलतां तपोद्विज ॥ परम तोषला अमरराज ॥ उपरी म्हणे महाराज ॥ कोणा पाठवूं पाचाराया ॥२४॥
यावरी बोले कचतात ॥ हे महाराज अमरनाथ ॥ मच्छिंद्रपिता अष्टवसूंत ॥ उपरिचर नामें मिरवतसे ॥२५॥
उपरिचर जातां महीतळवटीं ॥ मच्छिंद्राची घेईल भेटी ॥ सांगूनि त्यातें कार्य शेवटीं ॥ मग मच्छिंद्र आम्हां बोधील ॥२६॥
तरी त्यातें पाचारुन ॥ कार्ययज्ञाचा वदूनि काम ॥ विमानयानीं रुढ करुन ॥ पाठवावा महाराजा ॥२७॥
यापरी मच्छिंद्रनाथ ॥ आला असतां अमरपुरींत ॥ गौरवोनि तुवां त्यातें ॥ तुष्टचित्तीं मिरवावा ॥२८॥
तरी शक्ति तव सरितालोट ॥ मच्छिंद्र उदधिपोट ॥ संगमिता पात्र अलोट ॥ प्रेमतोय भरलें असे ॥२९॥
तरी सुमुखाचें पडतां जळ ॥ कार्यशुक्तिकामुक्ताफळ ॥ तूतें ओपील तपोबळ ॥ नवनाथ आणोनियां ॥३०॥
मग तो मुक्त अविंधविधी ॥ लावी भक्तीच्या शस्त्रास्त्रसंधीं ॥ मग तें रत्न कर्णविधीं ॥ स्वीकारी कां महाराजा ॥३१॥

ऐसे ऐकूनि गुरुवचन ॥ परम तोषला सहस्त्रनयन ॥ मग रथीं मातली पाठवोन ॥ उपरिचरा पाचारी ॥३२॥
उपरिचर येतां वदे त्यातें ॥ म्हणे महाराजा कामना मनांत ॥ उदेली करुं सोममखातें ॥ पूर्ण करीं आतां तूं ॥३३॥
तरी विमानयानीं करोनि आरोहण ॥ जाऊनियां मच्छिंद्रनंदन ॥ उपरी त्यातें सवें घेऊन ॥ जावें नवनाथमेळीं ॥३४॥
मग ते आर्या भावार्थित ॥ मेळवोनि आणी अमरपुरींत ॥ सोममखाचें सकळ कृत्य ॥ तया हस्तें संपादूं ॥३५॥
अवश्य म्हणे वसुनाथ ॥ तत्काळ विमानयानीं बैसत ॥ बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ ॥ लक्षूनियां पातला ॥३६॥
तों गोरक्ष धर्मनाथ ॥ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत ॥ बद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथ ॥ तीर्थस्नानीं ऐक्यमेळा झाला असे ॥३७॥
ऐशा समुदायांत मच्छिंद्रनाथें ॥ अवचटपणीं देखिला ताते ॥ मग उठोनि मौळी चरणातें ॥ समर्पीत महाराजा ॥३८॥
मग नाथ वसु भेटून ॥ बैसला सकळांमध्यें वेष्टून ॥ म्लानवाणीं कार्यरत्न ॥ अमरांचें सांगतसे ॥३९॥
म्हणे महाराज हो शक्रापोटीं ॥ अर्थ उदेला मखकोटी ॥ तरी आपण नवही जेठी ॥ साह्य व्हावें कार्यार्था ॥४०॥

बहुतांपरी करुनि भाषण ॥ सर्वांचे तुष्ट केलें मन ॥ उपरी मच्छिंद्रातें बोधून ॥ अवश्यपणीं वदविलें ॥४१॥
मग जालंदर कानिफा चौरंगी ॥ मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी ॥ गोपीचंद रायादि अन्य जोगी ॥ आरुढ झाले विमानीं ॥४२॥
गौडबंगाली हेलापट्टण ॥ प्रविष्ट झालें तैं विमान ॥ राव गोपीचंद मातेसी भेटून ॥ समागमें घेतली ॥४३॥
उपरी विमानयानी होऊन ॥ पहाते झाले वडवालग्राम तेथून ॥ तेथें वटसिद्धनागनाथ पाहून ॥ आरुढ केला विमानीं ॥४४॥
तेथूनि भर्तरीचें करुनि काम ॥ विमान चालविती इच्छिल्या व्योमें ॥ तों गौतमतीरीं नाथ उत्तम ॥ जती भर्तरी अवतरला असे ॥४५॥
यापरी तीर्थ करितां महीपाठीं ॥ महासिद्ध जो नाथ चरपटी ॥ अवंतीसी होता ताम्रपर्णीकांठीं ॥ सवें घेतला महाराजा ॥४६॥
तेणें पुण्यमान देशी विटग्राम नामानें ॥ पहाते झाले विमानयानें ॥ तेथें रेवणसिद्ध बोधून ॥ आरुढ केला विमानीं ॥४७॥
असो नवनाथ परिवारासहित ॥ ते विमानयानीं झाले स्थित ॥ चौर्‍यायशीं सिद्धांसमवेत ॥ अमरपुरीं पातले ॥४८॥
विमान येतां ग्रामद्वारी ॥ सामोरा आला वृत्रारी ॥ परम गौरवोनि वागुत्तरीं ॥ चरणांवरी लोटला ॥४९॥

सकळां करोनि नमनानमन ॥ नेत सदना सहस्त्रनयन ॥ आपुल्या आसनीं बैसवोन ॥ षोडशोपचारें पूजिले ॥५०॥
नवनाथां पाहोनि सकळ अमर ॥ मनीं संतोषले अपार ॥ तेज पाहोनियां गंभीर ॥ उभे तेथें ठाकलें ॥५१॥
मग हवनकृत्य मनकामना ॥ वदतां झाला सकळ जनां ॥ म्हणे महाराजा कवणे स्थाना ॥ सिद्ध अर्थ अर्थावा ॥५२॥
मग वाचस्पति आणि मच्छिंद्रनाथ ॥ म्हणती सुरवरपाळा ऐक मात ॥ सिंहलद्वीपीं स्थान अदभुत ॥ यज्ञ तेथें करावा ॥५३॥
अटव्य कानन आहे तुमचें ॥ शीतळ छायाभरित जळाचें ॥ तेथें न्यून साहित्याचें ॥ पडणार नाहीं कांहींच ॥५४॥
उपरिचरन वसु गंधर्व घेऊन ॥ पाहत झालें अटव्यवन ॥ तेथें यज्ञसाहित्य आहुती करुन ॥ यज्ञ आरंभ मांडिला ॥५५॥
दंपत्य बैसोनि सहस्त्रनयन ॥ मंत्रप्रयोगीं बृहस्पती आपण ॥ यज्ञ आहुती नवही जण ॥ स्वाहा म्हणोनि कुंडीं टाकिती ॥५६॥
परी किलोतळेचे सीमे आंत ॥ अटव्यवन होते अदभुत ॥ यज्ञ होतां मीननाथ ॥ मच्छिंद्रातें आठवला ॥५७॥
मग पाचारोनि उपरिचर तात ॥ मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ ॥ सिंहलद्वीपीं मीननाथ ॥ कवण ग्रामीं ठेविला ॥५८॥

येरु म्हणे त्याच्या ग्रामसीमेंत ॥ अटव्यवन हें विख्यात विराजित ॥ तरी कीलोतळेसहित मीननाथ ॥ पाचारितों आतांचि ॥५९॥
मग उपरिचर वसु प्रत्यक्ष जाऊन ॥ मीननाथासह कीलोतळारत्न ॥ पाचारुनि एक क्षण ॥ भेटी केली उभयतां ॥६०॥
परम स्नेहानें क्षण एक कांहीं ॥ वाहवले मोहप्रवाही ॥ उपरी दारा सुत तया ठायीं ॥ मच्छिंद्रानें ठेविले ॥६१॥
चौरंगी आणि अडबंगीनाथ ॥ मिरवीत बैसविले समुदायांत ॥ यज्ञआहुती तयांचे हस्तें ॥ स्वीकारीत महाराजा ॥६२॥
दहा नाथ यज्ञआहुती ॥ प्रवाहीं चाले मच्छिंद्रजती ॥ पुत्रमोह धरुनि चित्तीं ॥ अभ्यासातें बैसविला ॥६३॥
अभ्यास करितां मीननाथ ॥ वाचस्पती शक्रासी बोलत ॥ म्हणे महाराजा यज्ञार्थ ॥ तुम्ही बैसतां सरेना ॥६४॥
तरी दंपत्यार्थ उपरिचरवसु ॥ बैसवोनि पहावा अर्थ सुरसु ॥ ऐसे बोलतां प्राज्ञ विशेषु ॥ अमरपाळ समजला ॥६५॥
मग हातींचें सोडूनि यज्ञकंकण ॥ वसुहाती केलें स्थापन ॥ मग न्यूनपणें बहुतां प्रार्थून ॥ निजदृष्टीं विलोकी ॥६६॥
सर्व पदार्थ आणवोनि आपण ॥ अंगें झिजवी शचीरमण ॥ उदकपात्र सांगतां जाण ॥ सिद्ध होय पुढारी ॥६७॥

खाद्य भोज्य षड्रस अन्न ॥ करें आणीतसे पात्रीं वाढून ॥ शेवटीं शिणले तयाचे चरण ॥ निजहस्तीं चुरीतसे ॥६८॥
ऐसी सेवा करितां संपन्न ॥ तुष्ट होतसे जतीचे मन ॥ हदयीं भाविती यावरुन ॥ प्राणसांडी करावी ॥६९॥
येरीकडे मीननाथ ॥ सुतासी विद्या अभ्यासीत ॥ तो समय जाणोनि सापेक्ष ॥ इंद्र मयूरवेषें नटलासे ॥७०॥
निकटतरुशाखेवरती ॥ विद्या अभ्यासीत गुप्तपंथीं ॥ तों अकस्मात वातास्त्र जपती ॥ वाताकर्षण लाधलें ॥७१॥
दैवें सर्व तपराहटी ॥ सकळ लाधली हातवटी ॥ उपरी वाताकर्षणविद्या पाठीं ॥ वातप्रेरक अस्त्र लाधलें ॥७२॥
ऐसी विद्या होतां सघन ॥ परम हरुषला सहस्त्रनयन ॥ परी एक संवत्सर होतां यज्ञ ॥ अभ्यासीत तंववरी ॥७३॥
असो हवनअर्पण आहुती ॥ मग पावूनि पूर्ण समाप्ती ॥ मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती ॥ अग्रपूजे बैसला ॥७४॥
मग पूजा करोनि सांगोपांग ॥ उपरी दशमनाथें पूजिलें अंग ॥ वस्त्रभूषणें चांग ॥ देऊनिया गौरविलें ॥७५॥
सकळां बैसवोनि कनकासनीं ॥ उभा राहिला जोडीनि पाणी ॥ सर्वासी वदे म्लानवदनीं ॥ नाथ वचन माझें परिसा ॥७६॥

मातें घडला एक अन्याय ॥ परी आपण सहन करा समुदाय ॥ म्यां मयूरवेष धरुनि मायें ॥ अभ्यासिलें विद्येतें ॥७७॥
मीनजतीचा प्रताप गहन ॥ मज सांपडलें विद्यारत्न ॥ तरी आपुला वर त्यातें देऊन ॥ सनाथपणीं मिरवावें ॥७८॥
ऐसें बोलतां अमरनाथ ॥ सर्वासी समजलें तस्करीकृत्य ॥ मग ते कोपोनि परम चित्तांत ॥ शापवचन बोलताती ॥७१॥
म्हणती इंद्रा तूं कृत्रिम ॥ आणिलें ठकवावया कारण ॥ तरी चोरुनि घेतलें विद्यारत्न ॥ निष्फळ होईल तुजलागीं ॥८०॥
ऐसें बोलता सकळ जती ॥ मग उपरिचर वसु वाचस्पती ॥ गौरवोनि अपार युक्तीं ॥ तुष्ट केलें चित्तांत ॥८१॥
म्हणती महाराजा शापमोचन ॥ पुढें बोला कांहीं वचन ॥ मग ते बोलती तयाकारण ॥ तप आचरावें इंद्रानें ॥८२॥
द्वादश वर्षे तप आचरितां ॥ विद्या फळेल तत्त्वतां ॥ परी नाथपंथी छळ न होतां ॥ पदरावरी पडेल ॥८३॥
ऐसें बोलोनि सकळ जती ॥ विमानारुढ झाले समस्ती ॥ खाली उतरुनि महीवरती ॥ नाना तीर्थे भ्रमताती ॥८४॥
ऐसें भ्रमण करितां जती ॥ तीर्थे झालीं अपरिमिती ॥ याउपरी कीलोतळेतें मच्छिंद्रजती ॥ पुसोनिया चालिला ॥८५॥

मग तें कीलोतळेचें नमन ॥ अवर्ण्य आहे अनुष्ठान ॥ नेत्रीं प्रेमबिंदु आणोन ॥ बोळविलें नाथासी ॥८६॥
सवें घेऊनि मीननाथ ॥ विमानयानी झाले समस्त ॥ खालीं उतरुनि मृत्युमहींत ॥ नाना तीर्थे पाहिलीं ॥८७॥
हेलापट्टणीं मैनावती ॥ पोहोंचवोनि तीर्थे हिंडती ॥ तेव्हां मीननाथें तीर्थक्षितीं ॥ सिद्ध तीन निर्मिले ॥८८॥
तयांचें सांगितलें पूर्वी नाम ॥ आतां सांगावया नाहीं काम ॥ असो सिद्धकटकासह उत्तम ॥ तीर्थे करीत भ्रमताती ॥८९॥
येरीकडे अमरनाथ ॥ लक्षूनियां सह्याद्रिपर्वत ॥ द्वादश वरुषें तप निश्चित ॥ तीव्रपणी आचरला ॥९०॥
परी तें आचरितां तीव्रपणीं ॥ मंत्रप्रयोगें सोडी पाणी ॥ तेणें सरिता लोट लोटोनी ॥ भीमरथीतें भेटली ॥९१॥
तें मणिकर्णिकेचे जीवन ॥ आणिलें होतें कमंडलू भरोन ॥ परी इंद्रहस्तीं प्रवाही होऊन ॥ इंद्रायणीं पडियेलें ॥९२॥
ऐसें तप करोन ॥ स्वस्थानासी इंद्र जाऊन ॥ उपरी नवनाथ करितां तीर्थाटन ॥ बहुत दिवस लोटले ॥९३॥
शके सत्राशें दहापर्यंत ॥ प्रकटरुपें मिरवले नाथ ॥ मग येऊनि आपुले स्थानांत ॥ गुप्तरुपें राहिले ॥९४॥

मठींत राहिला कानिफाजती ॥ उपरी मछिंद्रासी मायबाप म्हणती ॥ जानपीर जो जालंदर जती ॥ गर्भागिरीं नांदतसे ॥९५॥
त्याहूनि खालतां गैबीपीर ॥ तो गहनीनाथ परम सुंदर ॥ वडवानळ ग्रामीं समाधिपर ॥ नागनाथ असे कीं ॥९६॥
वीटग्रामीं मानवदेशांत ॥ तेथें राहिले रेवणनाथ ॥ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ ॥ गुप्त अद्यापि करिताती ॥९७॥
भर्तरी राहिला पाताळभुवनीं ॥ मीननाथ गेला स्वर्गालागोनी ॥ गिरनार पर्वतीं गोरक्षमुनी ॥ दत्ताश्रमीं राहिला ॥९८॥
गोपीचंद आणि धर्मनाथ ॥ ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठांत ॥ विमान पाठवोनि मैनावतीतें ॥ घेऊनि विष्णु गेलासे ॥९९॥
पुढें चौर्‍यायशीं सिद्धांपासून ॥ नाथपंथ मिरवला अतिसामर्थ्यानें ॥ येथूनि चरित्र झालें संपूर्ण ॥ सर्व नाथांचें महाराजा ॥१००॥
तरी आतां सांगतों मुळापासून ॥ कथा वर्तली कवण ॥ प्रथमाध्यायीं गणपतिस्तवन ॥ सुंदरपणीं मिरवले ॥१॥
उपरी सांगूनि रेताक्षिती ॥ आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती ॥ तो बद्रिकाश्रमाप्रती ॥ तपालागीं बैसला ॥२॥
या प्रसंगाचें श्रवण पठण ॥ नित्य करितां भावेंकरुन ॥ तरी समंधबाधा घरांतून ॥ जाईल वासूनी महाराजा ॥३॥

द्वितीय अध्यायीं अत्रिनंदन ॥ विद्यार्णव केला अनुग्रह देऊन ॥ उपरी नागपत्रीं अश्वत्थी जाऊन ॥ सिद्धयर्थकळा साधिली ॥४॥
तो अध्याय करितां नित्य पठण ॥ अपार धन लाभेल संसारी जाण ॥ विजयलक्ष्मी पाठीं बैसून ॥ करील हरण दरिद्र ॥५॥
तृतीय अध्यायीं मच्छिंद्र मारुती ॥ युद्धा प्रवर्तले श्वेतक्षितीं ॥ युद्ध करुनि उपरांतीं ॥ ऐक्यचित्त झालें असे ॥६॥
याचें झालिया पठण ॥ शत्रु होतील क्षीण ॥ मुष्टिविद्यासाधन ॥ तया होत सर्वथा ॥७॥
मुष्टिबाधा झाली असोन ॥ अपकार होईल तियेने ॥ मुर्तिमंत मारुती करोनि रक्षण ॥ राहे तया घरीं सर्वदा ॥८॥
चतुर्थ अध्यायीं वदली कथा ॥ अष्टभैरव चामुंडा समस्ता ॥ रणीं जिंकूनि वसुसुता ॥ ज्वालामुखी भेटली ॥९॥
तो अध्याय नित्यपठण करितां ॥ चुकेल कपटाची बंधनव्यथा ॥ शत्रु पराभवोनि सर्वथा ॥ निरंतर शांति मिरवेल ॥११०॥
पांचवे अध्यायींचे कथन ॥ भूतें घेतलीं प्रसन्न करुन ॥ अष्टपती जिंकून ॥ विजयी झाला मच्छिंद्र ॥११॥
ती कथा नित्य करिता पठण ॥ भूतसंचार नोहे त्या घराकारण ॥ आले असतां जाती सोडोन ॥ परम त्रासेंकरोनियां ॥१२॥

सहाव्या अध्यायांत ॥ शिवअस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ ॥ युद्ध करुनि प्रसन्नचित्त ॥ वश्य झालीं अस्त्रें ती ॥१३॥
तो अध्याय नित्य करितां पठण ॥ शत्रूलागीं पडेल मोहन ॥ निष्कपट तो करुनि मन ॥ किंकर होईल द्वारींचा ॥१४॥
सातव्या अध्यायीं अपूर्व कथा ॥ जिंकूनि वीरभद्र केली ऐक्यता ॥ उपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथा ॥ इच्छेसमान झालीसे ॥१५॥
ती कथा नित्य गातां ऐकतां ॥ लिप्त नोहे त्रौर्‍यायशींची व्यथा ॥ झाली असेल मिटेल सर्वथा ॥ चिंत्ता व्यथा हरतील ॥१६॥
जखीणभयापासुनी ॥ त्वरित मुक्त होईल जनीं ॥ एक मंडळ त्रिकालीं अभ्यासूनी ॥ फलप्राप्ति घेइजे ॥१७॥
आठव अध्यायीं सकळ कथन ॥ पाशुपतरायासी रामदर्शन ॥ रणीं मित्रराज जिंकोन ॥ केला प्रसन्न विद्येसीं ॥१८॥
तो अध्याय नित्य गातां ऐकतां ॥ आपुला सखा देशावरता ॥ तो गृहासी येऊन भेटेल तत्त्वतां ॥ चिंताव्यथा हरेल कीं ॥१९॥
नववे अध्यायीं कथन ॥ गोरक्षाचा होऊनि जन्म ॥ उपरी सेवूनि बद्रिकाश्रम ॥ विद्यार्णव झालासें ॥१२०॥
तो अध्याय नित्य गातां ऐकतां ॥ साधेल विद्या इच्छिल्या अर्था ॥ ब्रह्मज्ञान रसायण कविता ॥ चवदा विद्या करोनि राहे ॥२१॥

दशम अध्यायीचें कथन ॥ स्त्रीदेशीं मच्छिंद्रनंदन ॥ अंजनीसुतअर्थी पाठवोन ॥ अर्थ किलोतळेचे पुरविले ॥२२॥
एकांतीं बैसूनि अनुष्ठान ॥ संजीवनी पाठ करी गौरनंदन ॥ गहिनीनाथाचा झाला जन्म ॥ कर्दमपुतळा करितां तो ॥२३॥
तो अध्याय करितां पठण ॥ स्त्रियांचे दोष जातील कपटपण ॥ फळे वाचतील होतां जाण ॥ जगीं संतती मिरवेल ॥२४॥
उपरी गृहद्रव्याच्या यज्ञांत ॥ उदय पावला जालिंदरनाथ ॥ तो एकादश अध्याय पठण करितां नित्य ॥ अग्निपीडा होईना ॥२५॥
आणि जयाचे धवळारात ॥ पूर्वीचा कांहीं दोष असत ॥ तो जाऊनि संपत्तिविशेषातें ॥ संततीसह भोगील कीं ॥२६॥
बाराव्यांत हें कथन ॥ जालिंदरें गुरु केला अत्रिनंदन ॥ उपरी कानिफाचा होऊनि जन्म ॥ विटंबिले देवांसी ॥२७॥
तो अध्याय करितां पठण ॥ क्षोभ न पावे कोणी देवता जाण ॥ क्षोभित असल्या होतील शमन ॥ सुख सर्व त्याचि देती ॥२८॥
तेराव्या अध्यायांत ॥ मैनावतीतें प्रसन्न नाथ ॥ होऊनि केलें अचल सनाथ ॥ ब्रह्मरुपीं आगळी ॥२९॥
तरी तो अध्याय करितां पठण ॥ स्त्रीहत्येचें दोष सघन ॥ त्यांचे होऊनि सकळ निरसन ॥ उद्धरील पूर्वजां चतुर्दश ॥१३०॥

चतुर्दश अध्यायीं कथन ॥ गर्तेत जालिंदर गोपीचंदानें ॥ स्त्रीबोलें घातले नेऊन ॥ गुप्त निशीमाझारी ॥३१॥
तो अध्याय पठण करितां ॥ असेल बंध कारागृहीं व्यथा ॥ तरी त्याची होईल मुक्तता ॥ निर्दोष जनीं वर्तेल ॥३२॥
पंचदशांत सुढाळ कथन ॥ कानिफामारुतीचे युद्धकंदन ॥ उपरी स्त्रीराज्यांत जाऊन ॥ आतिथ्य पूर्ण भोगिलें ॥३३॥
तो अध्याय गातां ऐकता नित्य ॥ घरचे दारचे कलह नित्यकृत्य ॥ शांति पावोनि सर्व सुखांत ॥ निर्भयपणें नांदेल ॥३४॥
सोळावे अध्यायांत ॥ कानिफा भेटला गोपीचंदातें ॥ तरी तो अध्याय वाचितां नित्यानित्य ॥ दुःस्वप्नातें नाशील ॥३५॥
सप्तदश अध्यायीं कथन ॥ जालिंदर काढिला गर्तेतून ॥ उपरी नाथाची दीक्षा घेऊन ॥ गोपीचंदें अर्चिला ॥३६॥
तोचि अध्याय पठण करितां ॥ योग साधेल योग आचरतां ॥ दुष्टबुद्धि जाईल सर्वथा ॥ सुपंथपंथा लागेल तो ॥३७॥
अष्टादश अध्यायीं कथन ॥ बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन ॥ तपःपूर्ण भगिनी उठवोन ॥ तीव्रपणीं आचरला ॥३८॥
तो अध्याय नित्य पठण करितां ॥ ब्रह्महत्या नासेल सर्वथा ॥ पूर्वज कुंभीपाकीं असतां ॥ सुटका होईल तयांची ॥३९॥

एकोणिसाव्यात गोरक्षाकारण ॥ भेटला मारुति श्रीरामप्रीतीने ॥ तरी तो अध्याय करितां पठण ॥ तया मोक्षार्थ साधेल कां ॥१४०॥
तिसाव्यात अदभुत कथन ॥ श्रीमाच्छिंद्रा भेटीचे कारण ॥ गोरक्ष स्त्रीराज्यांत जाऊन ॥ स्नेहसंपन्न जाहला ॥४१॥
तो अध्याय पठण करितां गोड ॥ लागलें असेल अत्यंत वेड ॥ तरी ती चेष्टा जाऊनि धड ॥ होऊनि प्रपंच आचरेल ॥४२॥
एकविसाव्यांत स्त्रीराज्यांतून ॥ मच्छिंद्रासी काढिलें गोरक्षनंदनें ॥ नानापरी बोधूनि मन ॥ दुष्टकर्मातें निवटिलें ॥४३॥
तो नित्य अध्याय पठण करितां ॥ नासेल बहुजन्माची गोहत्या ॥ निष्कलंक होऊनि चित्ता ॥ तपोलोकीं मिरवेल ॥४४॥
बाविसाव्यांत सोरटीग्रामी ॥ गोरक्षें मीननाथा मारोनी ॥ पुन्हां उठविला मंत्रेंकरोनी ॥ मच्छिंद्रमोहेंकरुनियां ॥४५॥
तरी तो अध्याय नित्य पठण करितां ॥ पुत्रांर्थिया पुत्र तत्त्वतां ॥ तो होईल विद्यावंत ॥ विद्वज्जना मान्य कीं ॥४६॥
तेविसाव्यांत रसाळ कथन ॥ मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन ॥ सुवर्णविटेकरितां सुवर्ण ॥ गर्भगिरि केला असे ॥४७॥
आणिक केला तेथें उत्सव ॥ तरी तो अध्याय पठण नित्य भावे ॥ करितां घरीं सुवर्ण नव ॥ अखंड राहे भरोनि ॥४८॥

चोविसाव्यांत भर्तरीनाथ ॥ जन्मोनि आला आवंतिकेंत ॥ तरी तो अध्याय पठण करितां नित्य ॥ बाळहत्या नासेल ॥४९॥
बाळहत्या जन्मांतरी ॥ तेणें समस्त वांझ होती नारी ॥ तरी ते नासेल संसारीं ॥ सुखी होऊनि बाळ वांचे ॥१५०॥
पंचविसाव्यात गंधर्व सुरोचन ॥ रासभ झाला शापेंकरुन ॥ तरी तो अध्याय केलिया पठण ॥ शापवचन बाधेना ॥५१॥
आणि मानवाविण दुसरा जन्म ॥ होणार नाही तयाकारण ॥ आरोग्य काया पतिव्रता कामिन ॥ पुत्र गुणी होईल ॥५२॥
सव्विसावे अध्यायांत ॥ गणगंधर्व झाला विक्रमसुत ॥ आणि विक्रम भर्तरीसुत ॥ एकचित्त ॥ भेटी होऊनि राहिले ॥५३॥
तो अध्याय करितां पठण ॥ गोत्रहत्या जाति नासून ॥ पोटीं पाठीं शत्रुसंतान ॥ न राहे होऊनियां ॥५४॥
सत्ताविसाव्यांत अदभुत कथन ॥ राज्यपदी बैसला राव विक्रम ॥ भर्तरी पिंगलेचें होऊनि लग्न ॥ दत्तानुग्रह लाधला ॥५५॥
तरी तो अध्याय करितां पठण ॥ पदच्युत पावेल पूर्वस्थान ॥ गेली वस्तु पुनः परतोन ॥ सांपडेल तयांची ॥५६॥
अट्ठाविसाव्या अध्यायांत ॥ पिंगलेकरितां स्मशानांत ॥ विरक्त होऊनि भर्तरीनाथ ॥ पूर्ण तप आचरला ॥५७॥

तो अध्याय करितां श्रवण पठण ॥ त्या भाविकाचें होईल लग्न ॥ कांता लाभेल गुणवान ॥ सदा रत सेवेसी ॥५८॥
एकुणतिसावे अध्यायींचे चरित्र ॥ भर्तरी होऊनि विरक्त पवित्र ॥ गोरक्ष सांगती अत्रिपुत्र ॥ गुरुनाथ पै केला ॥५९॥
तो अध्याय नित्य करितां पठण ॥ सुटेल क्षयरोगापासून ॥ आणि त्रितापांची वार्ता जाण ॥ कालत्रयीं घडेना ॥१६०॥
तिसाव्या अध्ययांत ॥ जन्मला चौरंगीनाथ ॥ परी तें चरित्र पठण करितां ॥ तस्करी दृष्टी बंधन होय ॥६१॥
एकतिसाव्यांत चौरंगीनाथ ॥ तपा बैसला हिमालयांत ॥ तरी तो अध्याय पढतां ॥ कपटमंत्र न चालती ॥६२॥
बत्तिसाव्यांत सुगम कथन ॥ मच्छिंद्र त्रिविक्रमदेहीं संचरोन ॥ द्वादश वर्षे राज्य करोन ॥ रेवतीसी पुत्र दिधला ॥६३॥
त्या अध्यायाचें करितां पठण ॥ अयुष्य असतां देहाकारण ॥ गंडांतरें करुं येतील विघ्नें ॥ आपोआप टळतील कीं ॥६४॥
तेहतिसाव्यांत गौरनंदन ॥ वीरभद्राचा घेऊनि प्राण ॥ मच्छिंद्रशव स्वर्गाहून ॥ महीवरती उतरिलें ॥६५॥
तरी ती कथा करितां पठण ॥ धनुर्वाताचें निरसे विघ्न ॥ झालेल्यातें होतां श्रवण ॥ पीडा हरेल तयाची ॥६६॥

चौतिसाव्यांत रेवणजन्म ॥ होऊनि भेटला अत्रिनंदन ॥ सहज सिद्धिकळा दावून ॥ गेला असे महाराजा ॥६७॥
तरी ती कथा करितां पठण ॥ जाणें कोणत्याही कार्याकारण ॥ तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन ॥ यश घेऊन येईल तो ॥६८॥
पस्तिसाव्यांत पूर्ण कथन ॥ रेवण झाला विद्यावान ॥ दत्तकृपें स्वर्गी जाऊन ॥ बाळें आणिलीं विप्राचीं ॥६९॥
तरी ती कथा करितां पठण ॥ महासिद्ध येईल उदराकारण ॥ बेचाळिसांचें करुनि उद्धरण ॥ गातील आख्यान लोक परी ॥१७०॥
छत्तिसाव्यांत अपूर्व कथा ॥ जन्म झाला वटसिद्धनाथा ॥ आस्तिक ऋषि झाला ताता ॥ तयाचिये मातेसी ॥७१॥
ती कथा करितां श्रवण पठण ॥ सर्पवृश्चिक दंश जयाकारण ॥ झालिया विषाचें उत्तीर्ण ॥ श्रवण केलिया अध्याय तो ॥७२॥
सदतिसाव्या अध्यायांत ॥ नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत ॥ उपरी विद्याबळें मच्छिंद्रनाथ ॥ जिंकियेले भिडोनी ॥७३॥
ती कथा करितां श्रवण पठण ॥ सदना न लागे कुशीलपण ॥ लागल्या त्याचें होईल बंधन ॥ विद्यावंत होऊनियां ॥७४॥
अडतिसाव्यांत चरपटीचा जन्म ॥ होऊनि दत्तात्रेयें दीक्षा देऊन ॥ विद्येमाजी करुनि संपन्न ॥ तीर्थावली धाडिला ॥७५॥

तरी ती कथा सुरस ॥ श्रवण पठण होतां त्यास ॥ हिंवताप मधुरा नवज्वरास ॥ शांति होईल सर्वस्वीं ॥७६॥
एकूणचाळिसाव्यांत कथा ॥ चरपटीनें जिंकिलें अमरनाथा ॥ हरिहरादि देवां समस्तां ॥ स्वर्गी ख्याती लाविली ॥७७॥
तरी तो अध्याय करितां पठण ॥ तो युद्धां जातां तपोधन ॥ शस्त्रबाण पावोन ॥ जय घेऊन येईल कीं ॥७८॥
यावरी चाळिसाव्यांत कथन ॥ सर्व नाथांतें पाकशासन ॥ स्वर्गी नेऊनि करी हवन ॥ विद्यार्थिरुपें अर्थ पुरविला ॥७९॥
तरी चाळिसावा नित्य पठण करितां ॥ लाभेल सर्व इच्छिल्या अर्था ॥ यश श्री ऐश्वर्य योग्यता ॥ पुत्रपौत्रीं नांदेल ॥१८०॥
एकुणचाळिसांचा फलार्थ ॥ तोचि प्राप्त तदर्थ ॥ कीं चाळिसावा एक परिस ॥ कीं कामधेनु कल्पतरु ॥८१॥
गोरक्ष बोलतो वाचेकरुन ॥ त्यातें असत्य मानील जन ॥ जो निंदक यातें दावील निंदून ॥ तो अधिकारी विघ्नांचा ॥८२॥
इहलोकीं परलोकीं ॥ राहणार नाहीं परम सुखी ॥ निर्वश पावोनि शेवटीं वंशीं ॥ पिचेल ग्रंथ निंदितां हा ॥८३॥

अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार ॥ आहे गोरक्षाचा किमयागार ॥ परी पालटोनि भाषांतर ॥ महाराष्ट्र अक्षरीं रेखिला ॥८४॥
म्हणोनि श्रोते हो भाविक जन ॥ सोडोनि द्या कीं निंदावचन ॥ विश्वासपर स्वार होऊन ॥ मोक्षमुक्काम करी कीं ॥८५॥
तरी हा ग्रंथ संग्रह करुन ॥ चमत्कार पाहावा पठण करुन ॥ हे चाळीस प्रसंग मंत्रनिर्वाण ॥ महासिद्धीचे असती कीं ॥८६॥
हे चाळीस मंत्र परोपकारी ॥ आहेत दुःखाची करतील बोहरी ॥ तरी संग्रह करुनि उगलेचि घरी ॥ ठेवा विश्वास धरुनियां ॥८७॥
ह्या चाळीस अध्यायांत मंत्रयंत्र ॥ सुखकारक असती अति पवित्र ॥ दुःखदरिद्रहरण सर्वत्र ॥ गोरक्षकानें निर्मिलें ॥८८॥
पठण करितां षण्मासमिति ॥ जो अध्याय ज्या कार्याप्रति ॥ तें कार्य होईल निःसंशय चित्तीं ॥ पठण करुनि पहावें ॥८९॥
याउपरी वाचितां न ये जरी ॥ तरी संग्रह करुनि ठेवावा घरीं ॥ नित्य वंदितां नमस्कारीं ॥ कार्य त्यांतचि घडेल ॥१९०॥
एक कुसुम झोंकूनि वरती ॥ चला म्हणावें मम कार्याप्रति ॥ नवनाथ वंदूनि उक्ति ॥ नमस्कार करावा ॥९१॥
ऐसा याचा आहे मार्ग ॥ करुनि पहावा चमत्कार चांग ॥ नवनाथ ओडवोनि अंग ॥ कार्य तुमचें करितील कीं ॥९२॥

तरी असो विजय संपत्ती ॥ नांदो श्रोत्याच्या गृहाप्रति ॥ धुंडिसुत हेंचि प्रार्थी ॥ मालू नरहरी देवाते ॥९३॥
शके सत्राशें एकेचाळीस ॥ प्रमाथीनाम ज्येष्ठ मास ॥ शुक्लपक्ष प्रतिपदेस ॥ ग्रंथ समाप्त जाहला ॥९४॥
तरी ओंव्या सर्व नेमस्त ॥ सप्तसहस्त्र सहाशत ॥ उपरी ऐसे देदीप्यवंत ॥ ओंव्या मंत्र असती ह्या ॥९५॥
अध्याय वाचावया न बनेल ज्यासी ॥ तरी अध्यायांतील एक ओंवीसी ॥ पठण करुनि नाथनामासी ॥ कार्यकाज करावें ॥९६॥
असो आतां बहु भाव ॥ श्रोते असोत चिरंजीव ॥ इहलोकीं परलोकीं ठेव ॥ आनंदाची होतसे ॥९७॥
तरी समस्त नाथांतें धुंडीसुत ॥ मालू नरहरि हेंचि विनवीत ॥ कीं श्रोते असोत सुखरुपवंत ॥ सर्व अर्थी सर्वदा ॥९८॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ चत्वारिंशतितमाध्याय गोड हा ॥१९९॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ४० ॥ ओंव्या १९९ ॥
॥ नवनाथभक्तिसार चत्वारिंशतितमोऽध्याय समाप्त ॥

॥ नवनाथांचा श्लोक ॥
गोरक्षजालंदरचर्पटाश्च अडबंगकानीफमछिंदराद्याः ।
चौरंगिरेवाणकभर्तिसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः ॥




-----------------------------------------------------------------------------------
कथामृत

चरपटीनाथानें इंद्राची दुर्दशा करुन टाकली म्हणुन इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपामान त्याच्या मनास लागुन राहिला. त्यानें चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करुन बृहस्पतीजवळ गोष्ट काढली कीं, तो अल्पवयीं असून तेजस्वी आहे हें खरें ! परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणुन बेतविली आणि आपली करामत दाखविली. इतकें सामर्थ्य दुसर्‍या कोणाचें नाहीं. एक वाताकर्षणविद्या ही देव विद्या कशी फैलावली कळत नाहीं; परंतु ती विद्या आपणांस साध्य होईल.अशी कांहीं तरी युक्ती काढावी. नाहीं पेक्षा त्यांच्या घरीं जाऊन त्यांचें दास्यत्व स्वीकारुन त्यांस आनंदीत करावें. अशा भावार्थाचें इंद्राचें भाषण ऐकून बृहस्पतीनें सांगितलें कीं, नाथांस येथें आणावें हें फार चांगलें, सोमयाग करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथें आणावयास ठीक पडेल. ते तेथें आल्यनंतर तूं त्यांच्या खुशामतीमध्यें तत्पर रहा आणि त्यांच्या मर्जीनुरुप वागूंन त्यास प्रसन्न करुन घेऊन आपला मतलब साधुन घे, हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो.
ही बृहस्पतीची युक्ति इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदहि झाला. परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावें हा विचार पडला. बृहस्पति म्हणाला, अष्टवसुपैकीं उपरिक्षवसु हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय; तो जाऊन त्यास घेऊन येईल. पूर्वी मच्छिंद्रनाथ येथें आला. होता तेव्हां त्याचा चांगला आदरसत्कार झालेला आहे. तो नऊ नाथांस घेऊन येऊन तुझा हेतु सफल करील, हें ऐकून इंद्रानें उपरिक्षवसुस बोलावुन त्यास आपला हेतु सांगितला व विमान देऊन नाथांस आणावयास पाठविलें.
मग तो बदरिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला. गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफा, गोपिचंद्र चालंदर अडबंगी आदि नाथमडळीहि तेथेंच होती. उपरिक्षवसु येतांच मच्छिंद्रनाथानें उठून त्याच्या पायांवर मस्तक ठेविलें त्यानें सर्वासमक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करुन नवनाथांस अमरपुरीस घेऊन येण्यासाठीं फारच आग्रह केला व त्याजकडून येण्याचें कबूल करुन घेतलें. मग जालंदर , कानिफा, चौरंगी, मच्छिंद्र, गोरक्ष , अंडबंगी, गोपीचंद्र आदिकरुन जोगी विमानांत बसले. गौडबंगाल्यास हेळापट्टणास येऊन गोपीचंदानें आपल्या आईस घेतलें. मग तेथून वडवाळ गांवीं जाऊन वटसिद्धनाथास बोध करुन बरोबर घेतलें. तसेंच गोमतीच्या तीरीं. जाऊन भर्तृहरीस घेतलें. ताम्रपर्णीचें कांठीं जाऊन चरपटीनाथास घेतलें. पूणें प्रांतांत विटगांवाहून रेवणनाथास घेतलें असो; याप्रमाणें चौर्‍यांयशीं सिद्धासंह नवनाथ विमानांत बसुन सोमयागाकरितां अमरावतीस गेले.
त्याचें विमान आलेलें पाहिल्यबरोबर, इंद्र नाथांस सामोरा गेला आणि नम्रपणानें बोलून त्यांच्या पायां पडला. मग त्यानें सर्वांस घरीं नेऊन आसनावर बसविलें व त्यांची षोडशोपचांरानीं पूजा केली. सर्व देव आनंदानें त्यांच्यापूढें उभे राहिलें. नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतु इंद्रानें सर्वास सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हें कळविण्यासाठी प्रार्थना केली. मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पति यांनीं आपसांत विचार करून सिंहलद्विपामध्यें जें अटव्य अरण्य आहे, तेथें शीतल छाया असुन उदकाचा सुकाळ असल्यानें तें ठिकाण यज्ञान तयारी केली व स्त्रीसह स्वतः यज्ञान बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडांत आहुती देण्याच्या कामाची त्यानें योजना केली.
हें वन किलोतलेच्या सीमेंत होतें म्हणुन तेथें असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली. म्हणुन मच्छिंद्रनाथानें उपरिक्षवसुस त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितलें . त्याप्रामाणें किलोतलेसहि मी येथें घेऊन येतो असें सांगुन उपरिक्षवसु गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथानें त्यांना राहवुन घेतलें. मच्छिंद्रनाथानें मीननाथास विद्याभ्यास शिकविला. पुढें बृहस्पतीनें इंद्रास सांगितलें कीं, आपण यज्ञास न बसतां उपरिक्षासुस बसवावें. मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून उपरिक्षवसुच्या हातांत इंद्रानें यज्ञकंकण बांधिलें व आपण देखरेख ठेवूं लागला. जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वतः देत होता; त्यानें सेवा करण्यांत कसुर ठेवली नाहीं. ता वेळेची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले.

मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवीत असतां, इंद्रानें मयुराच्या रूपानें गुप्तपणें झाडावर राहुन वाताकर्षणमंत्रविद्या साधून घेतली. ती प्राप्त होतांच इंद्रास परमसंतोष झाला. एक वर्ष यज्ञ चालला होता. तोंपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवीत होता. यज्ञसांगतां होतांच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्रानें दुसर्‍या नाथांची पूजा केली व वस्त्रेंभूषणें देऊन सर्वांस गौरविलें. मग सर्व नाथ कनकासनांवर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंति करुं लागला कीं, माझ्याकडुन एक अन्याय घडला आहे, त्यची मला क्षमा करावी. तो अन्याय हा कीं, मीननाथास विद्या पढवीत असतां ती सर्व मी चोरून शिकलों आहें.यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी. इंद्राचें हें चौर्यकृत्य ऐकून सर्व नाथांनी रागानें शाप दिला कीं तुं कपटाने आम्हांस आणुन विद्या साधुन घेतली आहेस; पण ती निष्फळ होईल. तो शाप ऐकून उपरिक्षवसु व बृहस्पति यांनीं पुष्कळ प्रकारांनीं विनवून त्यास संतुष्ट केलें. नंतर इंद्रानें एवढ्या दीर्घ प्रयत्‍नानें व अति श्रमानें साधलेली विद्या फलद्रुप होण्यासाठीं काहीं तरी तोड काढावी अशी देवदिकांनीम विनंति करून रदबदली केली मग नाथ म्हणाले, इंद्रानें बारा वर्षे तपश्चर्यें करावी व नाथपंथाचा छळ करूं नये, म्हणजे त्यास ती फलद्र्प होईल. असा उःशाप देऊन विमानारुढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करूं लागले. या वेळीं मच्छिंद्रनाथानें किलोतलेस विचारुन मीननाथासहि समागमें घेतलें होतें. मैनावतीस हेळापट्टाणास पोंचविलें मीननाथाचें सिद्ध शिष्य तीन झाले. त्या सर्व नाथांची फटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरूं लागले.
इंद्रानें सह्याद्री पर्वतावर बारा वर्षें तपश्चर्या केली. मंत्रयोगाच्या वेळेस तो जें पाणी सोडी त्या उदकांचा प्रवाह वाहं लागून तो भीमरथीस मिळाला. त्या ओघास इंद्रायणी असें नाव पडलें . या प्रमाणें तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला.
नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करित होते. शके सत्राशें दहापर्यंत ते प्रकटरूपानें फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्यें कानिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजुनें मच्छिंद्रनाथ ज्याच्या बायबा असें म्हणतात तो राहिला. जालंदनाथास जानपीर म्हणतात, तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यासच गैरीपीर म्हणतात. वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ वीटगांवीं राहिला चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अंडबंगी नाथ गुप्तरुपानें अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत. भर्तरी ( भर्तृहरि ) पाताळीं राहिला. मीननाथानें स्वर्गास जाऊन वास केला. गिरिनारपर्वतीं श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमांत गोरक्षनाथ राहिला. गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले. मग विष्णुनें विमान पाठवुन मैनावतीस वैकुंठास नेलें. चौर्‍यांयशीं सिद्धांपासुन नाथपंथ भरभराटीस आला.
आतां नवनाथानें चरित्र संपलें असें सांगुन मालुकवि म्हणतात. गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयीं असा अभिप्राय आहे कीं, यास जो कोणी असल्या मानील किंवा त्याची निंदा करील तो विघ्नसंतोषी इहपरलोकीं सुखी न राहतां त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकांत पडेल. हा श्रीवनाथभक्ति कथासागर ग्रंथ शके सत्राशें एकेचाळीस, प्रमाथीनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालुकवीनें श्रोत्यांस सुखरुप ठेवण्यासाठीं व त्यांचे हेतु परिपूर्ण होण्यासाठीं श्रीदत्तात्रेयाची व नवनाथांची प्रार्थना करून संपविला.

श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय ३९

श्रीगणेशाय नमः
जयजयाजी आदिनाथा ॥ कर्पूरवर्णा उरगभूषिता ॥ बोलवीं पुढें ग्रंथार्था ॥ नवरसादि कृपेनें ॥१॥
मागिले अध्यायीं केलें कथन ॥ चरपटीचा होऊनि जन्म ॥ दत्तदीक्षा पुढें घेऊन ॥ नाथपंथीं मिरवला ॥२॥
उपरी एकादश नाथांपासून ॥ चौर्‍यायशीं सिद्ध झाले पूर्ण ॥ तयांचे सांगितले नाम ॥ यथाविधीकरुनियां ॥३॥
एक गहनी वेगळा करुन ॥ बहात्तर आठांनीं केले निर्माण ॥ उपरी मीननाथ चौरंगी आडबंगण ॥ बारा सिद्ध निर्मिले ॥४॥

एकूण चौर्‍यायशीं सिद्ध पूर्ण ॥ पुढें आतां ऐका कथन ॥ चरपटी करी तीर्थाटन ॥ कथा कैसी वर्तली ॥५॥
गया प्रयाग काशीहून ॥ जगन्नाथ मल्लिकार्जुन ॥ फणिपर्वत रामेश्वर करुन ॥ कुमारीदैवत पाहिलें ॥६॥
बारा मल्हार हिंगलाज ॥ बारा लिंगे तेजःपुंज ॥ सप्त मोक्षपुर्‍या पाहोनि सहज ॥ महीप्रदक्षिणा घातली ॥७॥
सकळ महीचें झाले तीर्थ ॥ गुप्त प्रगटे अत्यदभुत ॥ परी एक राहिले इच्छिलें तीर्थ ॥ स्वर्गपाताळ तीर्थात ॥८॥
करुनि मणिकर्णिकेचें स्नान ॥ सकळ स्वर्ग यावें पाहून ॥ उपरी पाताळभुवनीं जाण ॥ भोगावती वंदावया ॥९॥
ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ गेला बद्रिकाश्रमाप्रती ॥ तेथें नमूनि उमापति ॥ पुढें चालिला महाराजा ॥१०॥
व्यानप्रयोगीं भस्मचिमुटी ॥ चर्चूनियां निजललाटा ॥ तेणेंकरुनि वातगतीं ॥ गमनातें दावीतसे ॥११॥
मग आदित्यानामी मंत्र जपून ॥ प्रत्यक्ष केला नारायण ॥ तो मागें पुढें सिद्ध होऊन ॥ मार्गापरी गमतसे ॥१२॥
कीं मनयोगाचा धीर धरुनि करीं ॥ चरपट लंघी महेंद्रगिरी ॥ शैल्यबर्फलहरी ॥ अंगीं झगट करीतसे ॥१३॥

सवितातेज अति अदभुत परम तीव्र दाहाते करीत ॥ तेणेंकरुनि बर्फगणांत ॥ वितळपणीं मिरवत ॥१४॥
जैसें पर्जन्यकाळीं महीं ॥ वितळे मित्रतेजप्रवाहीं ॥ त्याचि न्यायें ते समयीं ॥ हिमाचलकण वहिवटले ॥१५॥
ऐसी करुनि गमनस्थिती ॥ लंघूनि गेला स्वर्गाप्रती ॥ तों प्रथम शृंगमारुती ॥ सत्यलोका पाहिलें ॥१६॥
जातांचि गेला विधिसभेंत ॥ चतुराननाचें चरण वंदीत ॥ वंदूनियां जोडूनी हस्त ॥ सन्मुख उभा राहिला ॥१७॥
विधि पाहूनि चरपटासी ॥ म्हणे कोण आला योगाभ्यासी ॥ ऐसें बोलतां घडीसीं ॥ नारद उभा तैं होता ॥१८॥
तो तयाच्या सन्मुख होऊन ॥ म्हणे महाराजा चतुरानन ॥ मग मूळापासून जन्मकथन ॥ तयापासीं वदला तो ॥१९॥
ऐकूनि विधि सर्व वत्तांत ॥ आनंदला अति अदभुत ॥ मग चरपटाचा धरुनि हस्त ॥ अंकावरी घेतला ॥२०॥
हस्तें मुख कुरवाळून ॥ क्षणोक्षणीं घेत चुंबन ॥ म्हणे बाळा तुझें येणें ॥ कैसें झालें स्वर्गासी ॥२१॥
येरी म्हणे जी ताता ॥ नारदें ओपिलें दत्तहस्ता ॥ तेणें वरदपाणी माथां ॥ ठाऊक केला बाळासी ॥२२॥

मग सकळ चरपटीतें विद्यार्णव ॥ वैखरीपत्रें आणूनि ठेव ॥ त्यावरी मोदानें कमलोदभवें ॥ श्रवणपात्रीं भरलासें ॥२३॥
तो कुशल विद्यारत्न ॥ श्रवणशक्तीं कीं सांठवण ॥ परम आल्हादें आनंदन ॥ पुन्हां चुंबन घेतसे ॥२४॥
यावरी बोले चतुरानन ॥ बाळा कामना वेधली कोण ॥ येरु म्हणे तव दर्शन ॥ मनीं वाटलें हो तात ॥२५॥
यापरी होतां कामना चित्तीं ॥ तेथेंचि वेधली कृपामूर्ती ॥ कीं मनकर्णिका स्नाना निगुतीं ॥ भोगावती पहावी ॥२६॥
यावरी बोले कमलोदभव ॥ बा रे एक संवत्सर येथें असावें ॥ त्यांत पर्वणी आल्यासी अपूर्व ॥ स्नानासी जाऊं सकळिक ॥२७॥
ऐसें बोलतां कमलोदभवतात ॥ अवश्य म्हणे चरपटीनाथ ॥ यापरी राहतां सत्य लोकांत ॥ बहुत दिन लोटले ॥२८॥
परी चरपट आणि नारदमुनी ॥ वर्तती एकचित्तें खेळणीं ॥ चैन न पडे एकावांचुनी ॥ एकमेकां क्षणार्ध ॥२९॥
यापरी कथा पूर्वापारेसीं ॥ नारद जातसे अमरपुरीसी ॥ तों ॥ सहस्त्रचक्षु देखतां त्यासी ॥ विनोदउक्तीं पाचारी ॥३०॥
देखतांचि हा तपोवृंद म्हणे यावें कळीनारद ॥ ऐसे शक्राचे ऐकूनि शब्द ॥ मुनी क्षोभ पावला ॥३१॥

चित्तीं पेटतां कोपाग्नी ॥ अंतरीं जल्पे नारदमुनी ॥ म्हणे तोही समय तुजलागुनी ॥ एक वेळं दाखवीन ॥३२॥
ऐसें म्हणून स्वचित्तांत ॥ नारद जातां आपुल्या स्थानाप्रत ॥ यासही लोटले दिन बहुत ॥ परी शब्द चित्तांत रक्षीतसे ॥३३॥
तों सांप्रतकाळीं चरपुटमुनी ॥ विद्यापात्र प्रळयाग्नी ॥ तें पाहूनि जल्पे नारद मुनी ॥ इंद्र आहुतीं योजावा ॥३४॥
ऐसे कामरत्नीं इच्छाधामीं ॥ रक्षीत असतां देवस्वामी ॥ तों एके दिवशीं श्रवणउगमीं ॥ श्रृंगारिला चरपट तो ॥३५॥
म्हणे बांधवा ऐक वचन ॥ कामें वेधलें माझें मन ॥ कीं अमरकुसुमवाटिकाश्रम ॥ पाहूं क्रीडेकारणें ॥३६॥
चरपट म्हणे अवश्य मुनी ॥ चला जाऊं येचि क्षणीं ॥ ऐसा विचार करोनि मनीं ॥ अमरपुरीं चालिले ॥३७॥
मार्गी चालतां चरपटनाथ ॥ शांतपणें महीं पाऊल पडत ॥ तें पाहूनि कमलोद्भवसुत ॥ चरपटातें बोलतसे ॥३८॥
म्हणे सखय जाणें येणें ॥ आहे परम लंबितवाणें ॥ तरी गमन ऐसे चालीनें ॥ घडोनि कैसें येईल ॥३९॥
चरपट म्हणे आम्ही मानव ॥ आमुची हीच चाली काय करावें ॥ तुम्हांपाशी असे चपल उपाव ॥ तरी तेणेंकरुनि मज न्यावें कीं ॥४०॥

नारदें ऐसे शब्द ऐकून ॥ कार्यकामनीं मोहित मन ॥ मग मार्गालागी स्थिर होऊन ॥ गमनकळा अर्पिली ॥४१॥
जो महादभुत कमलापती ॥ तेणें दिधली होती नारदाप्रती ॥ ती प्रारब्धबळें चरपटाप्रती ॥ लाधली असे अवचितीं ॥४२॥
ती गमनकळा कैसी स्थित ॥ इच्छिल्या ठाया ती नेत ॥ आणि त्रिभुवनांतील सकळ वृत्तांत ॥ दृष्टीपुढें बैसतो ॥४३॥
आयुष्य भावी वर्तमान ॥ गुप्तकृत्ये झाली होऊन ॥ कोण्या ठायी वसे कोण ॥ सकळ दृष्टी पडतसे ॥४४॥
ऐसी कळा ती गमनस्थिती ॥ चरपटाते होतां प्राप्ती ॥ मग हदयीं सरिताभरतीं ॥ तोय आनंदाचें लोटलें ॥४५॥
मग उभय एके कलेंकरुन ॥ मार्गी करिते झाले गमन ॥ एकासारखा एक चंडकिरण ॥ स्वर्गालागीं मिरवले ॥४६॥
मग लवतां डोळियाचें पातें ॥ मनोवेगीं अपूर्व असत ॥ गगनचुंबित मार्गे अमरक्षितींत ॥ कुसुमवाटिकेंत पातले ॥४७॥
तंव तेथें नाना तरु विस्तीर्ण ॥ गगनचुंबित विशाल वन ॥ ज्यांच्या कुसुमसुगंधेंकरुन ॥ अमोघ पाषाण मिरवती ॥४८॥
सहस्त्र योजन कानन समस्त ॥ झाले आहे गंधव्यक्त ॥ ते पाहूनियां चरपटनाथ ॥ परम चित्तीं आल्हादें ॥४९॥

मग कुसुमवाटीं करितां गमन ॥ खेळती नाना क्रीडावचनें ॥ खेळतां खेळतां येती दिसुन ॥ पीयूषफळे त्या ठाया ॥५०॥
नारदासी म्हणे चरपटनांथ ॥ फळें भक्षावीं कामना होत ॥ नारद म्हणे कोणी हस्त ॥ धरिला आहे तुमचा ॥५१॥
मग मन मानेल तैसें फळ ॥ तोडूनियां तपोबळ ॥ भक्षण करिती एकमेळ ॥ उभय सुत विधीचे पैं ॥५२॥
तयांच्या बीजसाली सोडून ॥ पीयूषरसासी करिती सेवन ॥ उपरी सांडूनि तें स्थान ॥ अनेक स्थानें सेविती ॥५३॥
फळें तोडितां पक्कशाखा ॥ महीं पडती विभक्त रुखा ॥ ऐसी ठाई ठाई कुसुमवाटिका ॥ महीतें दर्शवी ॥५४॥
यापरी उभय ते समयीं ॥ कुसुमें तोडिती गंधप्रवाहीं ॥ मणि भूषणमिषें सर्व देहीं ॥ घेऊनि कांहीं जाताती ॥५५॥
तों ब्रह्मदेव देवतार्चनी ॥ बैसतां ठेविती पुढें नेऊनी ॥ म्हणती कोण येतो न कळे येथ ॥ सकळ नासूनि बागाइत ॥ जात आहे येथुनी ॥५८॥
मग ते रक्षक पाळतीवरती ॥ गुप्त बैसती अन्यक्षेत्रीं ॥ तो ऐकें दिनीं उभय ते ॥ कुसुमवाटिके संचरले ॥५९॥
संचरतांचि विभक्त ठाया ॥ चरपट गेला फळें तोडावया ॥ तों रक्षक येऊनि पृष्ठीमाया ॥ चरपटातें धरियेलें ॥६०॥

तें नारदानें पाहून ॥ त्वरेंकरुनि केलें पलायन ॥ स्वस्थानासी जाऊन ॥ स्थिर होऊनि राहिला ॥६१॥
येरीकडे लतिकापाळ ॥ धरुनियां चरपटबाळ ॥ येतांचि भेदिलें मुखकमळ ॥ हस्तेंप्रहारेंकरुनियां ॥६२॥
तेणें कोपोनि तपोकेसरी ॥ कीं अपूर्व भासे वैश्वानरी ॥ मग तीव्रशिखा आहुती बनकरी ॥ चावावया धांवतसे ॥६३॥
करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ वाताकर्षण जल्पे होटीं ॥ तेणेंकरुनि बनकर थाटीं ॥ व्याप्त झाले सकळिक ॥६४॥
परम अस्त्र तें कठिण ॥ सकळांचें भेदलें हदयस्थान ॥ तेणें देहींचा सकळ पवन ॥ कुंठित झाला ते समयीं ॥६५॥
कुंठित होत श्वासोच्छ्वास ॥ तेणें प्राण झाले कासाविस ॥ सकळ उलथोनि महीस ॥ डोळां विकास दाटला ॥६६॥
गात्रें कांपती थरथराट ॥ मुखीं रुधिराचा पूरलोट ॥ नेत्र वटारुनि स्थूळवट ॥ बुबुळांतें दाविताती ॥ ॥६७॥
ऐसा होतां विपर्यास ॥ तों आणिक बनकर त्या ठायास ॥ मागूनि येतां सहज स्थितीत ॥ तेथें पाहिलें सकळिकां ॥६८॥
तों अव्यवस्थित सकळ बनकर ॥ पडिले आहेत महीवर ॥ ऐसें पाहूनि करिती विचार ॥ तों सिद्ध बाळक पाहिला ॥६९॥

परम तीव्र अति कठिण ॥ देदीप्यरुप तेज गहन ॥ त्यातें दृष्टी पाहून ॥ मागचे मागें ते सरले ॥७०॥
त्वरें येऊनि नगरक्षिती ॥ म्हणती महाराजा हे नृपती ॥ एक जोगी अर्कस्थिती ॥ आला असे महाराजा ॥७१॥
बाळरुपी अति सान ॥ तेणें बनकरांचे घेतले प्राण ॥ हदयीं पेटला प्रळयानळासमान ॥ दशा मिरवूं म्हणतसे ॥७२॥
आणीक वल्ली तरु पाहात ॥ फिरत आहे बागाइत ॥ न चले आमुचे माहात्म्य तेथ ॥ म्हणोनि आलो या ठाया ॥७३॥
मग पाचारुनि सुरवरमेळ ॥ इंद्र म्हणे तुम्ही जाऊनि सकळ ॥ शासन करुनियां बाळ ॥ धरुनि आणा मजपुढें ॥७४॥
नावरे तरी करा बंधन ॥ शस्त्रास्त्रीं करावें कंदन ॥ युक्तिप्रयुक्तिकरुन ॥ अरिष्टातें दवडा कां ॥७५॥
ऐसें बोलतां देवपाळ ॥ सकळ देव उठले सबळ ॥ चरपटप्रतापसमुद्रजळ ॥ प्राशन करुं पाहती ॥७६॥
कीं तें सैन्य नोहे वडवानळ ॥ अति शोभूनि शिखाजाळ ॥ शस्त्रास्त्रीं महादळ ॥ घेऊनियां चालिले ॥७७॥
येतांचि कुसुमवाटीनिकटीं ॥ चरपट पाहता झाला दृष्टीं ॥ मग सावध राहूनि कोपार्णव पोटीं ॥ लहरा सोडूं म्हणतसे ॥७८॥

भस्मचिमुटीं करीं कवळून ॥ सावध उभा ब्रह्मनंदन ॥ तों देवसैन्य अपार धन ॥ निकट येऊनि बोलती ॥७९॥
पाहूनि तयाचें तीव्रपण ॥ मनीं म्हणे ब्रह्मनंदन ॥ व्यर्थ विद्या अपार शीण ॥ कासयासी करावा ॥८०॥
सकळ अस्त्रप्रतापतरणी ॥ त्यांत अस्त्र मुकुटमणीं ॥ तेंचि द्वंदासी पाठवूनि ॥ वाताकर्षण रुझवावा ॥८१॥
मग हातीं भस्मचिमुटी ॥ वाताकर्षण झालें होटीं ॥ पाहूनि देवेचमूथाटी ॥ सव्य अपसव्य फेंकीतसे ॥८२॥
मग तो अस्त्रप्रयोग कठिण ॥ सकळ चमू घाली वेष्टून ॥ सर्वा हदयीं संचरुन ॥ आकर्षिला वात तो ॥८३॥
सर्वातें वात होतां लिप्त ॥ श्वासोच्छवास झाले कुंठित ॥ मग ते शस्त्रअस्त्र हस्त ॥ मोकलोनि देताती ॥८४॥
प्राण होऊनि कासाविस ॥ देह सांडिती स्वर्गमहीस ॥ रुधिर येऊनि आननास ॥ पूर वाहे भडभडां ॥८५॥
नेत्रद्वारें वटारुन ॥ सकळ सांडू पाहती प्राण ॥ गात्रें विकळ शवसमान ॥ सकळ काननीं मिरवले ॥८६॥
ऐशा दशेंत देव सघन ॥ होतां येरीकडे पाकशासन ॥ हेर भृत्य पाठवून ॥ समाचार आणवी ॥८७॥

येऊनि हेर पाहूनि तेथें ॥ सांगते झाले अमरपाळाते ॥ म्हणती महाराजा अत्यदभुत ॥ देव सर्वस्वीं निमाले ॥८८॥
निमाले परी पुढें आतां ॥ येथें येऊनि अमरनाथा ॥ तुमचे सकळ जीविता ॥ ओस नगरी करील कीं ॥८९॥
बाळरुप दिसतो सान ॥ परी कृतांताचा घेईल प्राण ॥ प्रळयरुद्र तो आकर्षण ॥ करील मही वाटतसे ॥९०॥
कीं महाप्रळय आजीच आला ॥ ऐसेपरी भासे आम्हांला ॥ ऐसें ऐकूनि बहु बोलां ॥ पाकशासन दचकतसे ॥९१॥
यावरी धैर्य धरोनि बोलत ॥ सिद्ध करा ऐरावत ॥ महाप्रळय वज्रघातें ॥ भग्न करणें तयासीं ॥९२॥
ऐसें ऐकूनि बोलती हेर ॥ म्हणती न्यून काय झुंजणार ॥ परी तो धनुष्यालागीं शर ॥ न लावी अजूनि महाराजा ॥९३॥
पाहतां पाहतां रणांगणीं ॥ विपरीत करतो करणी ॥ उगीच श्वासोच्छवास कोंडुनी ॥ प्राण सोडितां झुंजार ॥९४॥
तेथें तुमचें वज्रअस्त्र ॥ काय करील सहस्त्रनेत्र ॥ तयाची विद्या गुप्तक्षेत्र ॥ कांहीं करुं नेदीचि ॥९५॥
नातरी उगलाचि जाईल प्राण ॥ मग सकळ राहील मुखभंजन ॥ तरी दशकरातें साहाय्य करुन ॥ येथें आणावा महाराज ॥९६॥

त्याची होतांचि दृष्टी ॥ याची होय श्वासकुंठी ॥ तरी महाराजा हे दयाजेठी ॥ शिव साह्य करावा ॥९७॥
तरीच देव उठती पुढती ॥ नातरी सकळांची होऊनि शांती ॥ तस्मात् आतां युद्धाप्रती ॥ जाऊं नये महाराजा ॥९८॥
ऐसें ऐकतां हेरभाषण ॥ उठता झाला पाकशासन ॥ वाहनारुढ प्रत्यक्ष होऊन ॥ कैलासासी पातला ॥९९॥
तें शिवगणवेष्टित सदाशिव ॥ बैसला होता महादेव ॥ तों अकस्मात देवराव ॥ जाऊनियां पोहोंचला ॥१००॥
चरणावरी ठेवूनि माथा ॥ म्हणे महाराजा आदिनाथा ॥ तुम्हीं अमरपुरीं मज पतिता ॥ अमर करोनि बैसविलें ॥१॥
बैसविल्यावरी दानवें थोर ॥ गांजिल्यावरी वारंवार ॥ संकट निरसूनि सत्वर ॥ पदस्थापना मज केली ॥२॥
परी आतां निर्वाण आलें ॥ देव सकळ प्राणा मुकलें ॥ सांगावया तुम्हांसी वहिले ॥ उरलों आहें इतुका मी ॥३॥
शिव म्हणे ऐसा कोण ॥ आला आहे स्वर्ग चढून ॥ शक्र म्हणे स्वदृष्टीनें ॥ पाहिला नाहीं महाराजा ॥४॥
कुसुमलतिकेचा केला नाश ॥ म्हणूनि पाठविलें सर्व देवांस ॥ त्यांचा समूळ होतां प्राणनाश ॥ पळूनि आलों येथें मी ॥५॥

ऐसें ऐकतां शिवशंकर ॥ गणांसी आज्ञा देत सत्वर ॥ सिद्ध होऊनि चला समग्र ॥ समागमें माझिया ॥६॥
आणि विष्णूते करा श्रुत ॥ तो होवो अनायासें सहित ॥ ऐसें ऐकतां दूत ॥ विष्णूसमीप धांवती ॥७॥
मग गणांसहित अष्ट भैरव ॥ अष्ट पुत्र घेऊनि शिव ॥ शतकोटिसमुदाव ॥ अमरपुरीं पातला ॥८॥
चढाओढी रणांत ॥ देव मिळाले समस्त ॥ चरपटीनें दृष्टीं देखत ॥ भस्मचिमुटी कवळिली ॥९॥
चित्तीं म्हणे कासया उशीर ॥ उगाचि शीण करावा थोर ॥ निवृत्ति करुनि थोर व्यवहार ॥ बोलवावें सर्वासी ॥११०॥
ऐसें सिद्ध करुनि वचन ॥ प्रयोगीं अस्त्र वाताकर्षण ॥ अस्त्रदेवता सिद्ध करुन ॥ श्वास बंद शिवासहित ॥११॥
श्वास झाले कुंठित ॥ शिवासहित देव झाले विगलित ॥ मूर्च्छना येऊनि भूमीवरी पडत ॥ प्राण सर्वाचे निघूं पाहती ॥१२॥
असो शतकोटी गण ॥ शिवासह पाकशासन ॥ एकदांचि महीकारण ॥ ढासळून पाडिले ॥१३॥
जैं तरु पल्लवशाखीं ॥ मूळ खंडतां पडती शेखीं ॥ तेवीं अवस्था झाली निकी ॥ महीवरी पडतसे ॥१४॥

त्यापरी शिवादि शतकोटी गण ॥ मुख आच्छादी पाकशासन ॥ पुष्पवाटिके विकल प्राण ॥ मूर्च्छागत झाले ते ॥१५॥
अवघे पडिले निचेष्टित ॥ परी नारद दुरोनि विलोकित ॥ हस्तपाद खुडितां हंसत ॥ अमरनाथा पाहुनी ॥१६॥
मनीं म्हणे बरें झालें ॥ अहंकारीं सर्व गळाले ॥ देवांमाजी कित्येक मेले ॥ शव झालें शरीराचें ॥१७॥
कुसुमलतापाळक बनकर ॥ तैं सकळ सांडिले देहअवसर ॥ प्रेत होवोनि महीवर ॥ भयेंकरुनि पडियेले ॥१८॥
कोणा रुधिराचा भडभडाट ॥ मुखीं अपार पूर लोटत ॥ श्वेतवर्ण चक्षुपाट ॥ वटारुनि दाविती ॥१९॥
येरीकडे शिवदूत ॥ गेले होते वैकुंठांत ॥ विष्णु लक्षूनि महादभुत ॥ वृत्तांत सर्व सांगती ॥१२०॥
म्हणती महाराजा कमलाक्षा ॥ महीदक्षा सर्वसाक्षा ॥ राक्षसारी मोक्षमोक्षा ॥ निजदासां कैवारी ॥२१॥
नेणों अमरवनीं कोण ॥ आला आहे बलिष्ट जाण ॥ तेणें सकळ देव केले तृण ॥ गतप्राण झाले ते ॥२२॥
एकटा उरला अमरनाथ ॥ तोही शीघ्र येवूनि कैलासास ॥ स्तवूनियां उमानाथास ॥ युद्धालागीं गेलासे ॥२३॥

शतकोटी गणांसहित ॥ वीरभद्रासह देव समस्त ॥ सवें घेवूनि उमानाथ ॥ युद्धालागीं गेलासे ॥२४॥
भव जातां अमरपुरीसी ॥ आम्हां पाठविलें तुम्हांपासीं ॥ आपण चलावे त्या कटकासी ॥ म्हणोन आम्हीं धांवलों ॥२५॥
ऐसें ऐकतां मधुसूदन ॥ विचार न पाहतां विष्णुगण ॥ छपन्न कोटी मेळवून ॥ गरुडारुढ झालासे ॥२६॥
टाळ ढोल दुंदुभिनाद ॥ समारंभें श्रीगोविंद ॥ अमरपुरींत झाला नाद ॥ ऐसें येवूनि पातले ॥२७॥
समस्त बैसले घालूनि पोळा ॥ आर्‍हाटिती विष्णुमंडळा ॥ धरा मारा शब्दकोल्हाळा ॥ एकदांचि करिताती ॥२८॥
शिवगण जे शिवासहित ॥ देवांसह अमरनाथ ॥ परम पाहूनि अवस्थित ॥ विष्णु मनीं क्षोभला ॥२९॥
सकळ दूतां आज्ञापीत ॥ म्हणे तुमचा होय ताता ॥ धरा मारा आलंबित ॥ शस्त्रेंअस्त्रें करुनियां ॥१३०॥
आपण घेवूनि सुदर्शन ॥ गांडीव सजविलें लवोन ॥ इतुकें चरपटनाथें लक्षून ॥ भस्मचिमुटी कवळीतसे ॥३१॥
मनांत म्हणे विष्णुकुमार ॥ सुदर्शन हें आह अनिवार ॥ तरी आपण आधींच वारासार ॥ करुनियां बैसावें ॥३२॥

मग मोहनास्त्र जल्पूनि होटीं ॥ सुदर्शननामीं फेंकिली भस्मचिमुटी ॥ तें मोहनास्त्र सुदर्शनपोटीं ॥ जाऊनियां संचरलें ॥३३॥
तेणेंकरुनि सुदर्शन ॥ अचळ जड झालें मोहून ॥ तैसेंचि गांडीव आणि सकळ गण ॥ उठावले नेटकीं ॥३४॥
तें पाहूनि चरणस्थित ॥ काय करिता झाला नाथ ॥ विष्णुगण करुनि समस्त ॥ वाताकर्षण योजिलें ॥३५॥
वाताकर्षणप्रयोग नेटीं ॥ गर्णी फेंकितां भस्मचिमुटी ॥ तेणें विष्णुकटक सुभट ॥ श्वासोच्छवासें दाटलें ॥३६॥
कोंडतांचि श्वासोच्छ्वास ॥ धैर्य न उरे मग समस्तांस ॥ मग देह सांडूनि सकळ धरणीस ॥ धुळीमाजी लोळती ॥३७॥
खरसायके मोकळे हस्त ॥ शस्त्रविकार झाला बहुत ॥ मुखीं रुधिर विचकूनि दांत ॥ नेत्र श्वेत करिताती ॥३८॥
सकळ सांडूं पाहती प्राण ॥ हस्तपाद आपटिती दुःखी होवून ॥ तें पाहूनि मधुसूदन ॥ सुदर्शन प्रेरीतसे ॥३९॥
सुदर्शनातें वैडूर्यखाणी ॥ कीं येवूनि राहिले सहस्त्र तरणीं ॥ ऐसें अति चंचळाहुनी ॥ चपल महाअस्त्र तें ॥१४०॥
जैसा अश्वांत श्यामकर्ण ॥ कीं धेनुगणीं सुरभिरत्न ॥ तेवीं अस्त्र सुदर्शन ॥ जाज्वल्यपणीं मिरवें तें ॥४१॥

तें सुदर्शन कोपेंकरुन ॥ प्रेरिता झाला रमारमण ॥ परी तें नाथापाशीं येउन ॥ मोहेंकरुन वेष्टिलें ॥४२॥
चित्तीं म्हणे पिप्पलायन ॥ हा प्रत्यक्ष विष्णुनारायण ॥ स्वामी आपुला वाचवा प्राण ॥ घोट घेतला दिसेना ॥४३॥
तरी हें युद्ध पूर्ण नाहीं ॥ माझी परीक्षा पाही ॥ निमित्तें सहज करुनियां कांहीं ॥ खेळ मज दावीतसे ॥४४॥
ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ नमन केलें नाथाप्रती ॥ नमूनियां दक्षिण हस्ती ॥ जाउनियां विराजलें ॥४५॥
चरपटाहातीं सुदर्शन ॥ कुस्ती करितां मनोधर्म ॥ मग तो चरपट चांगुलपणें ॥ प्रत्यक्ष विष्णु भासतसे ॥ येरीकडे वैकुंठनाथ ॥
आश्चर्य करीं स्वचित्तांत ॥ म्हणे मोहूनि सुदर्शनातें ॥ घेतले कैसें अरिष्टानें ॥४७॥
मग हातीं गदा परताळून ॥ घेता झाला रमारमण ॥ तैं चरपट तेथें दृष्टीं पाहून ॥ भस्मचिमुटी कवळीतसे ॥४८॥
वाताकर्षणप्रयोगमंत्र ॥ सिद्ध करोनि तपपात्र ॥ समोर लक्षोनि कंजगात्र ॥ प्रेरी अस्त्र दुर्घट तें ॥४९॥
मग तें अस्त्र पवनगतीं ॥ संचरतें झालें हदयाप्रती ॥ तेणें झालें अरिष्ट अती ॥ धडाडूनि पडियेलें ॥१५०॥

हस्तविभक्त होवूनि गदा ॥ पडती झाली क्षितीं आल्हादा ॥ पांचजन्य प्रियप्रद गोविंदा ॥ सोडूनियां मिरवत ॥५१॥
ऐसा होतां अव्यवस्थित ॥ तें पाहूनियां चरपटनाथ ॥ मग विष्णूजवळी येवूनि त्वरित ॥ निजदृष्टी विलोकी ॥५२॥
विलोकितां विष्णूलागुनी ॥ तों दृष्टीं पडला कौस्तुभमणी ॥ मग मनांत म्हणे आपणालागुनी ॥ भूषणातें घ्यावा हा ॥५३॥
ऐसें म्हणोनि स्वचित्तांत ॥ वैजयंतीसी काढूनि घेत ॥ गळां ओपूनि मौळीं ठेवीत ॥ रत्नमुगुट विष्णूचा ॥५४॥
शंखचक्र आदिकरुन ॥ हातीं घेतसे ब्रह्मनंदन ॥ गदा कक्षेमाजी घालून ॥ शिवापासीं पातला ॥५५॥
शिव पाहूनि निजदृष्टीं ॥ तों कपालपात्र आणिलें पोटीं ॥ तें घेवूनि झोळीं त्रिपुटी ॥ सोडूनियां चालिला ॥५६॥
चित्तीं गमनागमध्यान ॥ त्वरें पातला सत्यग्राम ॥ पितयापुधें शीघ्र येवून ॥ उभा राहिला चरपट ॥५७॥
पांचजन्य सुदर्शन ॥ सव्य अपसव्य कराकारण ॥ कक्षे गदा हदयस्थान ॥ कौस्तुभ गळां शोभवी ॥५८॥
तें पाहूनि नाभिसुत ॥ विष्णुचिन्हें भूषणास्थित ॥ मौळीं मुगुट विराजित ॥ अर्कतेजीं चमकूनिया ॥५९॥

ऐसे चिन्हीं पाहतां विधी ॥ मनीं दचकला विशाळबुद्धि ॥ म्हणे मुला काय त्रिशुद्धी ॥ केलें आहेसी कळेना ॥१६०॥
मग चरपटाचा धरुनि हात ॥ आपुल्या अंकावरी घेत ॥ गोंजारुनि पुसत ॥ चिन्हें कोठूनी आणिली हीं ॥६१॥
येरु म्हणे ऐक तात ॥ सहज शक्राच्या कुसुमलतांत ॥ खेळत होतों पहात अर्थ ॥ मातें बनकरें तोडिलें ॥६२॥
मम म्यां कोपें बनकर ॥ मारुनि टाकिले महीवर ॥ तया कैवारें हरिहर ॥ झुंजावया पातले ॥६३॥
मग मी चित्तीं शांत होवून ॥ विकळ केले भवविभुप्राण ॥ तया अंगींची भूषणे घेऊन ॥ आलों आहे महाराजा ॥६४॥
ऐसी ऐकतां चरपटगोष्टी ॥ परम दचकला परमेष्ठी ॥ मग हदयीं धरुनि नाथ चरपटी ॥ गौरवीत बाळातें ॥६५॥
म्हणे वत्सा माझा तात ॥ आजा तुझा विष्णु निश्चित ॥ महादेव तो आराध्यदैवत ॥ मजसह जगाचा ॥६६॥
तरी ते होतील गतप्राण ॥ मग मही त्यांवांचून ॥ आश्रयरहित होवून ॥ जीवित्व आपुलें न चाले ॥६७॥
तरी बाळा ऊठ वेगीं ॥ क्लेश हरोनि करी निरोगि ॥ नातरी मज जीवित्वभागीं ॥ अंत्येष्टी करुनि जाई कां ॥६८॥

ऐसें बोलतां चतुरानन ॥ चित्तीं वेष्टला कृपेंकरुन ॥ म्हणे ताता उठवीन ॥ सकळिकां चाल कीं ॥६९॥
मग विधि आणि चरपटनाथ ॥ त्वरें पातले अमरपुरींत ॥ तों हरिहर अव्यवस्थित ॥ चतुराननें देखिले ॥१७०॥
मग प्रेमाश्रु आणूनि डोळां ॥ म्हणे वेगीं उठवीं बाळा ॥ वाताकर्षण चरपटें कळा ॥ काढूनियां घेतलें ॥७१॥
वातप्रेरकमंत्र जपून ॥ सावध केले सकळ देवजन ॥ उपरी जे कां गतप्राण ॥ संजीवनीनें उठविले ॥७२॥
सकळ सावध झाल्यापाठीं ॥ ब्रह्मा करीं धरुनि चरपटी ॥ विष्णुभवांच्या पदपुटीं ॥ निजहस्तें लोटिला ॥७३॥
परी विष्णुचिन्ह भूषणस्थित ॥ पाहूनियां रमानाथ ॥ कोण हा विधीतें पुसत ॥ तोही प्रांजळ सांगतसे ॥७४॥
मग जन्मापासूनि अवतारलक्षण ॥ विधी सांगे देवांकारण ॥ विष्णु सकळ वृत्तांत ऐकून ॥ ग्रीवेलागीं तुकावी ॥७५॥
मग म्हणे मम भूषणें ॥ वर्तलें नाही विभक्तपण ॥ माझाचि अवतार जाण ॥ चरपटनाथ आहे हा ॥७६॥
मग परमश्रेष्ठी हस्तेंकरुन ॥ चरपट आंगींचे काढूनि भूषण ॥ विष्णूलागीं देवून ॥ चरणीं माथा ठेवीतसे ॥७७॥

असो सकळांचे समाधान ॥ पावूनि पावले स्वस्थान ॥ चरपट अवतार पिप्पलायन ॥ सर्व देवालागीं समजला ॥७८॥
कपालपत्र शिवें घेवून ॥ गणांसह पावला स्वस्थान ॥ अमरपुरीं सहस्त्रनयन ॥ देवांसहित गेला असे ॥७९॥
मग विधीने चरपट करीं वाहून ॥ पाहतां झाला ब्रह्मस्थान ॥ येरीकडे नारद गायन ॥ करीत आला शक्रापाशीं ॥१८०॥
इंद्रालागीं नमस्कारुन ॥ म्हणे तुम्हां झाले थोर विघ्न ॥ येथें कोणता नारद येवून ॥ कळी करुन गेला असे ॥८१॥
आम्ही तुमच्या दर्शना येतां ॥ कळींचे नारद आम्हां म्हणतां ॥ तरी आजचि कैसी बळव्यथा ॥ कोणें दाखविली तुम्हांसी ॥८२॥
ऐसें नारद बोलतां वचन ॥ मनीं खोंचला सहस्त्रनयन ॥ चित्तीं म्हणे हेंचि कारण ॥ नारद आम्हां भंवलासे ॥८३॥
ऐसें समजूनि स्वचित्तांत ॥ कळीचे नारद कदा न म्हणत ॥ अल्प पूजनें गौरवीत ॥ मग बोळविलें तयासी ॥८४॥
येरीकडे चतुरानन ॥ गेला स्वस्थाना चरपटीसी घेवून ॥ तयामागें नारद येवून ॥ सत्यलोकीं देखिला ॥८५॥
यापरी पुढें खेळीमळी ॥ पर्वणी उत्तम पावली बळी ॥ मणिकर्णिकेसी सर्व मंडळी ॥ स्नानालागीं जातसे ॥८६॥

एकवीस स्वर्गीचे लोक समस्त ॥ मणिकर्णिकेसी आले बहुत ॥ तयांमाजी चरपटीनाथ ॥ विधी घेवूनि आलासे ॥८७॥
मग तात पुत्र करुनि स्नाना ॥ परतोनि आले स्वस्थाना ॥ याउपरी सहजस्थित होवून ॥ संवत्सर भरला असे ॥८८॥
नारदविद्या पूर्ण गमन ॥ मनीं चिंतितां पावे स्थान ॥ तया मार्गे गौरवून ॥ भोगावतीसी पातला ॥८९॥
विधिसुत चरपटनाथ ॥ गमन करीत महीं येत ॥ तेथेंही करुनि अन्य तीर्थ ॥ भोगावतीसी जातसे ॥१९०॥
करुनि भोगावतीचें स्नान ॥ सप्त पाताळ दृष्टीं पाहून ॥ बळिरायाच्या गृहीं जावून ॥ वामनातें वंदिलें ॥९१॥
बळीनें करुनि परम आतिथ्य ॥ बोळविला चरपटीनाथ ॥ यापरी इच्छापूर्ण नाथ ॥ भ्रमण करी महीसी ॥९२॥
ऐसी कथा ही सुरस ॥ कुसुममाळा ओपी त्यास ॥ कवि मालू श्रोतियांस ॥ भावेंकरुन अर्पीतसे ॥९३॥
नरहरीवंशी धुंडीसुत ॥ अनन्यभावें संतां शरणागत ॥ मालू ऐसे नाम देहाप्रत ॥ ज्ञानकृपें मिरवीतसे ॥९४॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ एकोनिचत्वारिंशत्ततिमोध्याय गोड हा ॥१९५॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ नवनाथभक्तिसार एकोनचत्वारिंशतितमोऽध्याय समाप्त ॥

श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय ३८

श्रीगणेशाय नमः
जयजयाजी व्यंकटरमणा ॥ दयासागरा परिपूर्णा ॥ भक्तदुःखभंजना ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥१॥
मागिले अध्यायीं कथन ॥ नागनाथा भेटला अत्रिनंदन ॥ विद्याभ्यासें दीक्षाकारण ॥ नाथपंथीं मिरवला ॥२॥
उपरी मच्छिंद्राशीं खेळूनि रळी ॥ जिंकिला मच्छिंद्र तपोबळी ॥ तंव सिद्ध उत्पन्न करुनि मंडळी ॥ शाबरी विद्या ओपिली ॥३॥
यावरी श्रोतीं पुढें कथन ॥ पूर्वी दक्षगृहीं वार्ता जाण ॥ निघालें विवाहयोजनालक्षण ॥ मंगळकार्याचें तेधवां ॥४॥

हिमालयाची आत्मजा ॥ ती योजिली मंगलकाजा ॥ तेव्हां देवदानवमानवां भोजा ॥ पाचारण पाठविलें ॥५॥
तेणेंकरुनि दक्षागार ॥ भरोनि निघाला सुरवर ॥ मानवी दक्ष हरि हर ॥ सभास्थानीं बैसले ॥६॥
मंडळी ऐसी सर्वासहित ॥ बैसली असे पार्वती त्यांत ॥ मंगलकला करुनि मंडपांत ॥ मिरवत असे नोवरी ॥७॥
परी ते नोवरी स्वरुपखाणी ॥ कीं चंद्रकला नक्षत्रगणीं ॥ तेजाला जैसी सौदामिनी ॥ उजळपणा कराया ॥८॥
कीं सहस्त्र विद्युल्लतांचा पाळा ॥ ऐक्यपणें झाला गोळा ॥ सुरवरीं घनमंडळा ॥ चमकपणी शोभवी ॥९॥
कीं अर्क प्रत्यक्ष दीक्षाबाळ ॥ सभासद मिरवे केवळ ॥ तयाचें प्रतिबिंब व्योमीं जळ ॥ ब्रह्माण्डकुंडीं अर्क हा ॥१०॥
ऐसियापरी लावण्यता ॥ सभेंत मिरवे जगन्माता ॥ ते स्वरुप देखूनि नाभिसुत ॥ कामानळ दाटला ॥११॥
कामविरह चपळवंत ॥ नेणे विचार समयोचित ॥ स्थान सोडूनि इंद्रियांत ॥ लिंगामाजी पातला ॥१२॥
तैं विधीचा विरहकाम ॥ अधीरपणीं द्रवला उत्तम ॥ महीं प्राप्त होतां मनोधर्मे ॥ संकोचला विधी तो ॥१३॥

बैसल्याठायींचि करुन ॥ रेत रगडियेले महीकारण ॥ तैं आगळे साठसहस्त्र ऋषी वेषें ॥ वालखिल्य भागीं मिरवले ॥१५॥
परी एक आगळा होता भाग ॥ तैसाचि राहिला तेथें चांग ॥ सेवक झाडी महीअंग ॥ केरसमानी मिसळला ॥१६॥
उपरी सरतां मंगळनेम ॥ केला होता लज्जाहोम ॥ केर आणि तयाचें भस्म ॥ सेवक सांडिती सरितेंत ॥१७॥
सरितेंत पडतां सकळ मेळ ॥ सर्व रेताचा सांडूनि मळ ॥ केर मग उगवोनि तळ ॥ निर्मळपणीं वर्तला ॥१८॥
मग तो जळी ढळढळीत ॥ तरुनि प्रवाहीं वाहात जात ॥ तो वाहतां अकस्मात ॥ कुशवेष्टनी आतुडला ॥१९॥
तैं जललहरीचें नेटेंकरुन ॥ कुशवेष्टींत पडे जाऊन ॥ तेथे लोटतां बहुत दिन ॥ कुशमुळ्यांनीं वेष्टिला ॥२०॥
यापरी बहुतां दिवशीं ॥ ईश्वरआज्ञा अवतारक्रमासी ॥ पिप्पलायन त्या रेतासी ॥ नारायण संचरला ॥२१॥
संचरला परी कैसे रीतीं ॥ रोहिसावजे विपिनीं असती ॥ तो मेळ त्या कुशवेष्टीप्रती ॥ उदकपाना पातला ॥२२॥
त्यांत रोहिणी ऋतुवंत ॥ मूत्न स्त्रवली प्रत्यक्ष रक्त ॥ तें भेदूनि वीर्यव्यक्त ॥ रेत वाढी लागलें ॥२३॥

कुशवेट परम भुवन ॥ तयामाजी हे सघन ॥ वाढी लागतां स्वेदजविधान ॥ कीटकन्यायें करुनियां ॥२४॥
अंडज जारज स्वेदज प्रकरण ॥ ऐसीं जीवां उत्पत्तिस्थानें ॥ असो या विधानेकरुन ॥ मूर्ति रचिलीं नवमास ॥२५॥
देह वाढता सबळवंत ॥ कुशमूळ झालें त्रुटित ॥ मग ढाळपणीं महीवरतीं ॥ बाळ दृष्टीसी ते आलें ॥२६॥
तो त्या ठायीं अकस्मात ॥ सत्यश्रवा विप्र भागीरथींत ॥ येवोनियां दर्भानिमित्त ॥ कुशवेष्टी विलोकी ॥२७॥
तो विप्र असे परम सुशीळ ॥ पुनीतग्रामीं तयाचें स्थळ ॥ तेथें येतां दृष्टीं बाळ ॥ पाहिलेसे तेधवां ॥२८॥
देखिलें परी देदीप्यमान ॥ अर्कतेजें परम सुगण ॥ कीं प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकोन ॥ आणिता झाला त्या ठायीं ॥२९॥
कीं अनंत मस्तकींचा मणी ॥ विसरुनि गेला ते स्थानीं ॥ ऐसें भासलें विप्रा मनीं ॥ अति तेजस्वी चकचकाटे ॥३०॥
चित्तीं म्हणे हें बाळ ॥ कोणाचें आहे तेजःपुंजाळ ॥ कीं उर्वशी उदरकमळ ॥ टाकूनियां गेली असे ॥३१॥
कीं राजबीज मनमोहन ॥ जळदेवतीं दृष्टी पाहून ॥ आणिलें मातेच्या शेजेहून ॥ आपुले स्थानीं न्यावया ॥३२॥

तरी याची पुनः माता ॥ येऊनि भेटेल कधी आतां ॥ परी प्रेमरहित लोभ ममता ॥ टाकूनि ती गेलीसे ॥३३॥
ऐसा तर्कवितर्क करीत ॥ परी तो बाळा न लावी हस्त ॥ कैसे न्यावें म्हणोनि मनांत ॥ पुढील अर्थ दिसेना ॥३४॥
अति वितर्के भेदलें मन ॥ परी मोहें वेष्टिले पंच प्राण ॥ चित्तीं म्हणें कैसें सोडून ॥ बाळालागीं जावें हो ॥३५॥
अरण्य कर्कश तीर भागीरथी ॥ सावजे येती उदकाप्रती ॥ दृष्टि पडतां तयाचि क्षितीं ॥ घात करतील बाळकाचा ॥३६॥
ऐसें मोहें चित्तीं जल्पून ॥ परी स्पर्श न करी भयेंकरुन ॥ चित्तीं म्हणे नेणों संधान ॥ कैसें आहे कळेना ॥३७॥
ऐसें प्रकरणीं शंकित मानस ॥ बाळानिकट उभा असे ॥ परी स्वर्गाचे देव असती डोळस ॥ देखते झाले तयासी ॥३८।\
बाळक करीतसे रुदन ॥ हस्तपादांतें नाचवून ॥ तें स्वर्गी सुरवर पाहून ॥ नमन करिती भावानें ॥३९॥
म्हणती हा पिप्पलायन नारायण ॥ आजि देखियले तयाचे चरण ॥ तरी आजिचा दिन परम सुदिन ॥ कृतकृत्य झालों कीं ॥४०॥
मग सर्वत्र करुनि जयजयकार ॥ वर्षिते झाले कुसुमभार ॥ कुशवेष्टींत कुसुमें अपार ॥ खचूनियां पाडियेलीं ॥४१॥

विप्र बाळाच्या अंगावरुनी ॥ कुसुमें अपरिमित काढूनी ॥ टाकी परी कुसुमांलागोनी ॥ परी न सरे म्हणोनि दचकला ॥४२॥
चित्तीं म्हणे कैचें बाळप्रकरण ॥ पिशाचकरणी येते दिसोन ॥ अकस्मात येऊनि कुसुमघन ॥ कोणीकडून वर्षती ॥४३॥
ऐसा भयस्थित होऊनि चित्तीं ॥ पळूं लागला नगरवाटीं ॥ कैंचे दर्भ चरणसंपुटीं ॥ अति कवळूनि पळतसे ॥४४॥
तें पाहूनि सुर समस्तीं ॥ गदगदां हास्य करिती ॥ सत्यश्रव्यासी पळतो म्हणती ॥ उभा उभा पळूं नको ॥४५॥
ते सत्यश्रवें शब्द ऐकोन ॥ परम घाबरला पडे उलथून ॥ चित्तीं म्हणे पिशाच येऊन ॥ भक्षावया धांवले ॥४६॥
ढळढळीत भरले दोन प्रहर ॥ खेळी निघाले महीवर ॥ कैंचे बाळक तें प्राणहर ॥ पिशाचकृत्यें मिरवला ॥४७॥
ऐशा वितर्ककल्पना आणूनी ॥ पळत आहे प्राण सोडुनी ॥ पडतां महीतें उलथुनी ॥ पुनः उठोनी पळतसे ॥४८॥
सुरवर उभा उभा म्हणती ॥ तों त्यातें न दिसे क्षिती ॥ परी शब्द सुस्वर होती ॥ पिशाच सत्य हें आहे ॥४९॥
मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडुनी ॥ नारदातें बोलती वचनी ॥ स्वामी तुम्हीं जाऊनी ॥ सत्यश्रव्यातें सुचवावें ॥५०॥

हा परम भ्याड ब्राह्मण ॥ सत्यवादी परी करी पलायन ॥ तरी त्याचा संशय छेदून ॥ टाकूनि बाळ त्या देईजे ॥५१॥
ऐसें सुरवर कमलोदभवसुता ॥ बोलतांचि महाराज होय निघता ॥ ब्रह्मवीणा घेऊनि हाता ॥ महीवरती उतरला ॥५२॥
आपुले स्वरुपाचा लोप करुन ॥ मानववेषी दिव्य ब्राह्मण ॥ सत्यश्रव्याचे पुढें जाऊन ॥ उभा राहे मार्गात तो ॥५३॥
सत्यश्रवा भयभीत ॥ मार्गी पळतां श्वास सांडीत ॥ पडत झडत मुनी जेथें ॥ येवोनि तेथें पोहोंचला ॥५४॥
प्राण झाला कासावीत ॥ मुखीं न निघे श्वासोच्छवास ॥ तें पाहुनि नारद त्यास ॥ बोलता झाला महाराजा ॥५५॥
म्हणे महाराजा किमर्थी ॥ घाबरलासी काय पंथीं ॥ येरु म्हणे प्राणाहुती ॥ आजि झाली होती कीं ॥५६॥
दर्भानिमित्त गेलों सरितेतीरा ॥ पिशाचकळा तेथें पाहिली चतुरा ॥ बाळवेषें मी मोहिलों विप्रा ॥ मीचि म्हणोनि टिकलों ॥५७॥
टिकलों परी अकस्मात ॥ अपार कुसुमें तेथे पडत ॥ तें पाहूनियां भयभीत ॥ होऊनियां पळालों ॥५८॥
पळालों परी मागाहून ॥ अपार शब्दें पिशाचगण येऊन ॥ उभा रहा ऐसें म्हणोन ॥ वारंवार ऐकितों मी ॥५९॥

परी मी न पाहें मागें ॥ पडत झडत आलों लगबगें ॥ ऐसी कथा सांगोपागें ॥ झाली असे मज विप्रा ॥६०॥
मग नारदें धरुनि त्याचा हात ॥ तरुखालतें नेऊनि त्वरित ॥ बैसवूनि त्या स्वस्थचित्त ॥ वृत्तांतातें सांगतसे ॥६१॥
म्हणे विप्रा ऐक वचन ॥ तूं होतासी कुशबेटाकारण ॥ तेव्हां तुज म्यां विलोकून ॥ ऊर्ध्वदृष्टी पाहिलें ॥६२॥
पाहिलें परी अंबरांत ॥ मज दृष्टीं पडलीं सुरवरदैवतें ॥ त्यांणीं कुसुमें घेऊनि हातांत ॥ तुजवरी झोंकिलीं ॥६३॥
झोंकिलीं याचें कारण ॥ तुज बोलाविलें नामाभिधाने ॥ येरी म्हणे माझेचि नाम ॥ सत्यश्रवा म्हणताती ॥६४॥
नारद म्हणे असो कैसें ॥ सत्यश्रवा नाम तुज वसे ॥ म्हणोनि पुकारीत होते देव तैसें ॥ भूतचेष्टा नसे बा ॥६५॥
तरी सत्यश्रवा तुझें नाम ॥ कोठे आहे तुझें धाम ॥ नाहीं ठाऊक आम्हां ग्राम ॥ कोण आहे सांग पां ॥६६॥
असो इतुकें त्यासी विचारुन ॥ पुढें बोलला एक वचन ॥ बाळालागीं सदनीं नेऊन ॥ करीं पाळण प्रीतीनें ॥६७॥
ऐसें बोलूनि आणिक बोलले ॥ कीं हें बाळक ब्रह्म ठेलें ॥ पिप्पलायन नारायण जन्मले ॥ अवतार प्रगट जाहला ॥६८॥

तरी सकळ संशय सांडून ॥ बाळ नेई सदनालागून ॥ याचें करितां संगोपन ॥ सकळ सिद्धी साधती ॥६९॥
ऐसें सुरवरांचे बोलणें ॥ विप्रा म्यां येथूनि ऐकिले कानें ॥ असत्य मानूं नको जाणें ॥ देव सर्वही बोलती ॥७०॥
सत्यश्रवा विचारी मानसीं ॥ स्वर्गात नम नाम काय माहितीसी ॥ हाचि संशय धरुनि चित्तासी ॥ क्षण एक तिष्ठतसे ॥७१॥
करुनि पाहे ऊर्ध्व दृष्टी ॥ तों देखिली अपार देवथाटी ॥ परी नारदकृपेची सर्व हातवटी ॥ देव दृष्टी पडियेले ॥७२॥
मग नारदबोलें तुकावी मान ॥ म्हणे विप्रा बोलसी सत्यवचन ॥ माझे दृष्टी सुरवरगण ॥ येथोनियां दिसती पैं ॥७३॥
तरी विप्रा ऐक सत्य वचन ॥ येई माझ्या समागमेंकरुन ॥ कुशवेष्टींतील बाळ उचलोन ॥ मम करीं ओपीं कां ॥७४॥
ऐसे बोल ऐकतां ॥ अवश्य म्हणे संवत्सरपिता ॥ मग नेऊनि सत्यश्रव्याचे हाता ॥ बाळकाकारणें ओपिलें ॥७५॥
सत्यश्रव्यातें नारदें ओपूनि बाळ ॥ तेणें योगें मन सुढाळ ॥ पोटीं आनंद भरोनि सबळ ॥ बाळ हदयीं कवळीतसे ॥७६॥
बाळ ओपूनि नारदमुनी ॥ बोलता झाला तयालागुनी ॥ सत्यश्रव्या बाळनामीं ॥ चरपट ऐसें पाचारीं ॥७७॥

चरपटनामी बाळ गुणी ॥ सुरवर बोलले आहेत वाणी ॥ ती ऐकिली निजश्रवणीं ॥ तरी हेंचि नाम ठेवीं कां ॥७८॥
अवश्य म्हणोनि सत्यश्रवा ॥ येता झाला निकट आपुल्या गांवा ॥ येरीकडे नारद देवां ॥ स्वर्गी जाऊनि संचरला ॥७९॥
सांगतां सकळ देवां वृत्तांत ॥ स्थाना गेले दव समस्त ॥ येरीकडे स्वसदनांत ॥ सत्यश्रवा संचरला ॥८०॥
गृहीं कांता चंद्रानामी ॥ अति लावण्य धार्मिक लक्ष्मी ॥ पतिव्रता ती अपारनेमी ॥ कीं ती अनसूया दूसरी ॥८१॥
तिचे निकट सत्यश्रवा ॥ उभा राहोनि बोले बरवा ॥ म्हणे कामिनी दर्भ मिळावा ॥ गेलों होतों काननीं ॥८२॥
तेथें अवचट लाभ झाला ॥ सुत तूतें दैंवें दिधला ॥ तरी पालन करुनि नाम याला ॥ चरपट ऐसें पाचारीं ॥८३॥
तयाच्या योगेंकरुन ॥ सुरवरांचे पाहिले चरण ॥ मग मुळापासूनि सकळ कथन ॥ कांतेपाशीं वदला तो ॥८४॥
कांता ऐकूनि वर्तमान ॥ तुकावीतसे आनंदें मान ॥ म्हणे दर्भभावें सेवितां विपिन ॥ वंशलता सांपडली ॥८५॥
कीं खापर वेंचूं जातां अवनीं ॥ तों सांपडला चिंतामणी ॥ तेवीं तुम्हां दैवेंकरुनी ॥ बाळ लाभलें महाराजा ॥८६॥

कीं भूत पूजावया मसणवटीं ॥ जातां लक्ष्मी भेटे वाटीं ॥ तेवीं तुम्हां काननपुटी ॥ बाळलाभ झाला असे ॥८७॥
कीं दगड उलथायाचे मिषें ॥ दैवें लाभला चोख परीस ॥ तेवीं तुम्हां लाभ सुरस ॥ बाळलाभ झाला असे ॥८८॥
कीं सहज मर्कट धरुं जातां ॥ गांठ पडली हनुमंता ॥ तेवीं तुम्हां दर्भभावार्था ॥ बाळलाभ झाला असे ॥८९॥
ऐसें म्हणोनि चंद्रा नारी ॥ बाळ हदयीं कवळी करीं ॥ परी अति स्नेहचित्तसमुद्रीं ॥ आनंदलहरी उठवीत ॥९०॥
जैसा दरिद्री पिशुन वनांत ॥ निजे परी मांदुस सांपडे त्यांत ॥ मग आनंद तयाचे हदयांत ॥ कवण अर्थी वर्णिला ॥९१॥
तेवीं वाढोनि आनंदलहरी ॥ बाळा आलिंगी चंद्रा नारी ॥ मग स्नान पान पयोधरी ॥ करुनि पालखातें हालवीतसे ॥९२॥
चरपट ऐसें बोलूनि नाम ॥ गीत गातसे साधूसम ॥ ऐसें सलील दावूनि प्रेम ॥ अपार दिवस लोटले ॥९३॥
सप्त वर्षेपर्यत ॥ पालन केलें कालस्थित ॥ उपरी मौंजीबंधन त्यांत ॥ अति गजरें केलें असे ॥९४॥
मग करवूनि वेदाध्ययन ॥ शास्त्रीविद्येत केलें निपुण ॥ मीमांसदि सकळ व्याकरण ॥ न्यायशास्त्र पढविलें ॥९५॥

यापरी कोणे एके दिवशीं ॥ गमन करितां देवऋषी ॥ सहज येत पुनीतग्रामासी ॥ स्मरण झाले नाथाचें ॥९६॥
मग आगंतुकाचा वेष धरुन ॥ पाहे सत्यश्रव्याचा आश्रम ॥ तों द्वादश वर्षाचा चरपट नाम ॥ महातेजस्वी दिसतसे ॥९७॥
मग विप्रवेषे ते गृहभक्ती ॥ सारुनि पाहिली चरपटमूर्ती ॥ तों सुगम विद्येची दैदीप्यशक्ती ॥ तया देही देखिली ॥९८॥
ब्रह्मरेतोदयप्राणी ॥ म्हणोनि बंधुत्व नारदमुनी ॥ त्या मोहानें सकळ करणी ॥ चरपटाची देखिली ॥९९॥
परम तोष मानूनि चित्तीं ॥ जात बद्रिकाश्रमाप्रती ॥ तों आत्रेय आणि मच्छिंद्रजती ॥ निजदृष्टीं देखिले ॥१००॥
मग भावेंकरुनि तये वेळां ॥ उभयतांसी जाऊनि भेटला ॥ त्यातें पाहूनि लोट लोटल ॥ चित्तसरिती प्रेमाचा ॥१॥
निकट बैसूनि तयांचे पंगतीं ॥ परी एकाग्रीं मिळाल्या चतुर्थशक्तीं ॥ मच्छिंद्रनाथ अपर्णापती ॥ दत्तात्रेय चतुर्थ तो ॥२॥
परी हे चौघेही एकाभ्यासी ॥ दीक्षावंत पूर्ण संन्यासी ॥ वैष्णवनामी भागवतदेशीं ॥ प्रतापार्क तयांचा ॥३॥
कीं निधी परीस चिंतामणी ॥ कीं चौथा कौस्तुभ वैडूर्यखाणी ॥ ऐसे चौघेही एकासनीं ॥ विराजले एकदां ते ॥४॥

वार्तालता अपरिमित ॥ तों चरपटवार्ता विधिसुत ॥ मुळापासूनि पूर्ण कथित ॥ त्रिवर्गात सांगितली ॥५॥
वार्ता ऐकतां आदिनाथ ॥ श्रीदत्तात्रेय बोलत ॥ कीं तुम्ही नवनारायणात ॥ सनाथ करुं इच्छिलें ॥६॥
तो पिप्पलायन नारायण ॥ अवतार मिरवला चरपटनाम ॥ तया आतां सनाथ करुन ॥ कल्याणरुपीं मिरवाल ॥७॥
ऐसे बोलतां उमारमण ॥ बोलतां झाला अत्रिनंदन ॥ कीं महाराजा पश्चात्तापाविण ॥ हितप्राप्ती मिळेना ॥८॥
तरी चरपटातें पश्चात्तापें ॥ मानला नाहीं जंववरी बापें ॥ त्यावरी अनुग्रहलोपें ॥ माझ्यावरी मिरवतसे ॥९॥
यावरी बोले नारदमुनी ॥ हे अवधूता बोलसी वाणी ॥ तरी चरपटाचे अंतःकरणीं ॥ पश्चात्ताप मिरवे तो ॥११०॥
परी तुम्ही जीवासम भावें ॥ चरपटभागीं मिरवा सदय ॥ तों पश्चात्तापउदय ॥ चरपटदेहीं करितों मी ॥११॥
ऐसें बोलूनि अवधूताप्रती ॥ पाहिली शीघ्र लुप्तग्रामक्षिती ॥ पवित्र होऊनि विद्यार्थी ॥ सत्यश्रव्यातें भेटला ॥१२॥
म्हणे महाराजा गुरुवर्या ॥ मी विद्यार्थी विद्याकार्या ॥ तरी मजवरी करुनि दया ॥ विद्यारत्न ओपावें ॥१३॥

मग अवश्य म्हणोनि तो ब्राह्मण ॥ अभ्यासविद्येकारणें ॥ कुलंब ऐसें स्वदेहा नामाने ॥ सत्यश्रव्या वदलासे ॥१४॥
कुलंब नामें नारदमुनी ॥ आणि चरपट नामेंकरोनीं ॥ उभयतां बैसूनि एकासनीं ॥ अभ्यास करिती सद्विद्या ॥१५॥
परी कोठेंही न लागे ठिकाण ॥ तो अवसर आल दैवेंकरोन ॥ तया ग्रामीं एक यजमान ॥ पाचारावया पातला ॥१६॥
तयाचे गृहीं प्रयोजन ॥ करणें होतें ओटीभरण ॥ तो ग्रामजोशी म्हणोन ॥ पाचारावया पातला ॥१७॥
पातला परी सत्याश्रवा ॥ बैसला होता अर्चूनि देवा ॥ मग चरपटा सांगोनि मनोभावा ॥ नारदासह पाठविला ॥१८॥
चरपट जाऊनि तयाचे धार्मी ॥ विधी उरकला मनोधर्मीं ॥ उपरी यजमान दक्षिणापाणी ॥ येता झाला महाराजा ॥१९॥
नारदें पाहूनियां संधी ॥ स्मरण झालें पूर्वविधी ॥ चरपटमनीं कलह नव्हता कधीं ॥ परी नारदें योजिला ॥१२०॥
बैसलें होते कार्यालागुनी ॥ तों नारद बोले चरपटासी वाणी ॥ दक्षिणा न घेतां तूं गुणी ॥ योगपुरुषा योगज्ञाना ॥२१॥
जरी तूं दक्षिणा हातीं घेसी ॥ तरी योग्य न वाटे आम्हांसीं ॥ आपण उभयतां अज्ञान विद्यार्थी ॥ भागाभाग समजेना ॥२२॥

तरी उगलाचि चाल चरपटा उठोनि ॥ सत्यश्रवा येईल तव दक्षिणा घेऊनि ॥ चरपट म्हणे रिक्तहस्तेकरोनी ॥ कैसें जावें सदनासी ॥२३॥
नारद म्हणें तूं दक्षिणा घेसी ॥ परी अमान्य होईल तव पित्यासी ॥ येरु म्हणे कसरतेसी ॥ करुनि दक्षिणा घेईन मी ॥२४॥
कसरत करुनि सवाई पाडें ॥ द्रव्य ठेवितां तातापुढें ॥ मग तो काय बोलेल वाकुडें ॥ भलेपणा दावील कीं ॥२५॥
तों ती दक्षिणा अति सान ॥ नव्हती उभयतांच्या स्वरुपाप्रमाण ॥ तेणेंकरुनि चरपट मनें ॥ खिन्न झाला धार्मिक तो ॥२६॥
ऐसें उभयांचें झालें भाषण ॥ तों यजमान आला दक्षिणा घेऊनि ॥ चरपटाहातीं देत भिजवून ॥ अल्प दक्षिणा पहातसे ॥२७॥
आधींच नारदें कळ लावूनी ॥ ठेविली होती अंतःकरणीं ॥ त्यावरी लघु दक्षिणा पाहूनी ॥ कोप अत्यंत पावला ॥२८॥
नारदें भाषणापूर्वीच बीज ॥ पेरुनि ठेविलें होतें सहज ॥ कोपतरु फळविराज ॥ कलह उत्पन्न झाला पैं ॥२९॥
मग बोलता झाला यजमानासी ॥ म्हणे तुम्हीं ओळखिलें नाहीं आम्हांसी ॥ कवण कार्य कवण याचकासी ॥ द्यावें कैसें कळेना ॥१३०॥
यजमान म्हणे ऐक भटा ॥ याचका पैका द्यावा मोठा ॥ परी दाता असेल करंटा ॥ मग याचकें काय करणें ॥३१॥

येरी म्हणे सामर्थ्य असतां ॥ तरी प्रवर्तावें कार्यार्था ॥ ऐसेपरी बोलतां ॥ उभयतां कलह अपार वाढे ॥३२॥
नारद तेथोनि निघोनी ॥ सत्यश्रवा विप्राजवळी येऊनी ॥ म्हणे दुखविला यजमान गुणी ॥ धडगत मज दिसेना ॥३३॥
असंतुष्ट द्विज नष्ट ॥ ऐसें बोलती सर्व वरिष्ठ ॥ तरी चरपटानें केलें भ्रष्ट ॥ यजमानकृत्य सर्वस्वीं ॥३४॥
आपण याचक संतुष्टवृत्ती ॥ सदा असावें गौरवयुक्ती ॥ आर्जव केलिया कार्ये घडती ॥ न घडे तेंचि महाराजा ॥३५॥
ऐसें बोलतां नारदमुनी ॥ कोप चढला सत्यश्रव्या लागुनी ॥ तत्काळ देवार्चन सोडोनी ॥ यजमानगृहीं पातला ॥३६॥
तो यजमान आणि सुत ॥ बोलबोली ऐकिली समस्त ॥ तेंही पाहूनि साक्षवंत ॥ अति कोप वाढला ॥३७॥
जैसा आधींच वैश्वानर ॥ त्यावरी सिंचिलें स्नेह अपार ॥ कीं उन्मत्त झालिया पान मदिर ॥ त्यावरी संचार भूताचा ॥३८॥
त्याची न्यायें सत्यश्रवा ॥ कोपानळीं चढला बरवा ॥ येतांचि चरपटमुखीं रवा ॥ करपुटानें काढीतसे ॥३९॥
ताडन होतां मुखावरती ॥ चरपटही पडला क्रोधाहुतीं ॥ आधींच बोलतां यजमानाप्रती ॥ क्रोधोदकें भिजलासे ॥१४०॥

त्यावरी चरपटनेत्रीं ॥ क्रोधाचे पूर लोटती ॥ मग सर्व त्यागूनि क्रोधें जल्पती ॥ गांवाबाहेर निघाला ॥४१॥
गांवाबाहेर भगवतीदुर्ग ॥ जाऊनि बैसला गुप्तमार्ग ॥ पश्चात्तापें झाला योग ॥ मनामाजी दाटेना ॥४२॥
येरीकडे नारदमुनी ॥ अंतरसाक्षी सर्व जाणुनी ॥ दिव्यभव्य विप्र प्राज्ञी ॥ वेष द्वितीय नटलासे ॥४३॥
होऊनि दिव्य ब्राह्मण ॥ दुर्गालयीं आला दर्शना म्हणोन ॥ भगवतीतें नमस्कारुन ॥ चरपटासमीप बैसला ॥४४॥
म्हणे कोण जी कां हो येथ ॥ बैसले आहां चिंतास्थित ॥ येरु ऐकूनि सकळ वृत्तांत ॥ तयापाशीं निवेदी ॥४५॥
ऐकूनि चरपटाचें वचन ॥ म्हणे पिसाट झाला ब्राह्मण ॥ ऐशा क्रोधें पुत्रालागून ॥ दुखविलें वृद्धानें ॥४६॥
आपुले चरणीं चरणसंपुट ॥ पुत्रापायीं येतां नीट ॥ मग पुत्रमर्यांदा रक्षूनि चोखट ॥ माहात्म्य आपुलें रक्षावें ॥४७॥
ऐशी चाल जगतांत ॥ प्रसिद्धपणी आहे वर्तत ॥ तरी मतिमंद तो वृद्ध निश्चित ॥ बुद्धिभ्रष्ट म्हणावा ॥४८॥
तरी ऐशियाचा संग त्यूजून ॥ तूं सेवावें महाकानन ॥ परतोनि त्याच्या वदना वदन ॥ दावूं नये पुत्रानें ॥४९॥

ऐसें बोलतां नारदमुनी ॥ चरपटा क्रोध अधिक मनीं ॥ दाटला पश्चात्तापें करुनी ॥ अधिकोत्तर नेटका ॥१५०॥
मग त्या विप्रालागीं बोलत ॥ म्हणे मम गृहीं जाऊन गुप्त ॥ कुलंब नाम विप्र यथार्थ ॥ पाचारुनि आणावा ॥५१॥
त्यातें घेऊनि स्वसंगती ॥ आम्ही जाऊं विदेशाप्रती ॥ पाहूनि सबळ सदगुणमूर्ती ॥ विद्या सकळ अभ्यासूं ॥५२॥
अवश्य म्हणोनि तो ब्राह्मण ॥ भगवती दुर्गाबाहेर येऊन ॥ त्या स्वरुपा लोप करुन ॥ कुलंववेष नटलासे ॥५३॥
पुन्हां त्यापाशीं शीघ्र येऊन ॥ केली चरपटालागी देखण ॥ म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण ॥ हिताहित कळेना ॥५४॥
तरी ऐसिया क्रोधापासीं ॥ आम्ही न राहूं निश्चयेंसीं ॥ तरी आणिक गुरु पाहूनि महीसी ॥ विद्येलागीं अभ्यासूं ॥५५॥
ऐसें बोलतां कुलंब वचन ॥ अधिकोत्तर चरपटमन ॥ पश्चात्ताप दाटून ॥ कुलंबचित्तीं मिरवला ॥५६॥
म्हणे सख्या अन्य क्षेत्रासी ॥ आपण राहूनि उभयतांसी ॥ दोघे एकचि मार्गासी ॥ वर्तणुकी राहूंया ॥५७॥
करुं एकचित्तें आपणास ॥ पडणार नाहीं दुःखलेश ॥ गुरु संपादूनि निःशेष ॥ विद्येलागीं अभ्यासूं ॥५८॥

ऐसें बोलतां चरपटासी ॥ अवश्य म्हणे विधिसुत त्यासी ॥ तत्काळ सांडूनियां नगरासी ॥ मुनिराज ऊठला ॥५९॥
मग चरपट आणि नारदमुनी ॥ उभयतां चालिले मार्ग लक्षूनी ॥ पांच कोश लंधितां अवनी ॥ नारद बोले तयातें ॥१६०॥
म्हणे सखया ऐक वचन ॥ आपण पाहूं बद्रिकाश्रम ॥ श्रीबद्रिकेदारा नमून ॥ काशीक्षेत्रीं मग जाऊं ॥६१॥
तये क्षेत्रीं विद्यावंत ॥ विप्र आहेत अपरिमित ॥ कोणी आवडेल जो चित्तांत ॥ विद्या त्यायाशीं अभ्यासूं ॥६२॥
ऐसें बोलतां कुलंब चरपटाप्रत ॥ अवश्य म्हणे विप्रपुत्र ॥ मार्ग धरुनि बद्रिकाश्रमातें ॥ पाहावया चालिले ॥६३॥
मार्गी करुनि भिक्षाटन ॥ पाहते झाले बद्रिकाश्रम ॥ केदारेश्वर देवालयांत जाऊन ॥ बद्रिकेदार नमियेला ॥६४॥
नमितां उभयें श्रीकेदार समर्थ ॥ तों प्रगट झाले मच्छिंद्रदत्त ॥ तें पाहूनि विधिसुत ॥ तयांपासीं पातले ॥६५॥
दत्तचरणीं ठेवूनि माथा ॥ आणिक नमी मच्छिंद्रनाथा ॥ तें पाहूनि चरपटी तत्त्वतां ॥ तोही वंदी उभयतांसी ॥६६॥
चरपटें उभयतां करुनि नमन ॥ पुसतसे तो कुलंबाकारण ॥ म्हणे महाराजा हे कोण ॥ उभयतां असती पैं ॥६७॥

नारद म्हणे ओळखीं नयनीं ॥ अत्रिसुत हा दत्तात्रेय मुनी ॥ आणि मच्छिंद्र जती ऐकसी कानीं ॥ तोचि असे का ब्राह्मणा ॥६८॥
यानंतर मी देवऋषी ॥ नारद म्हणती या देहासी ॥ तव कार्यार्थ कुलंबवेषीं ॥ मानवदेहीं नटलों मी ॥६९॥
ऐसे ऐकतां चरपटवचन ॥ कुलंबचरणीं माथा ठेवून ॥ म्हणे महाराजा स्वरुप दावून ॥ सनाथ करी मज आतां ॥१७०॥
नारद म्हणे ऐक वचन ॥ आम्ही स्वरुप दावूं त्रिवर्ग जाण ॥ परी बा गुरुप्रसादाविण ॥ न देखवे गा तुजलागीं ॥७१॥
तरी गुरुप्रसादमंत्र कानीं ॥ रिघावा होतांचि ध्यानीं ॥ मग आम्हीच काय दिसती त्रिभुवनीं ॥ ब्रह्मस्वरुप होशील तूं ॥७२॥
यावरी बोले चरपटनाथ ॥ कोणता पाहूं गुरु येथ ॥ तुम्हांपक्षां प्रतिष्ठावंत ॥ भुवनत्रयीं असेना ॥७३॥
तरी मज अनुग्रह द्यावा येथें ॥ करावें स्वरुपीं सनाथ मातें ॥ नारद म्हणे दत्तात्रेयातें ॥ कारण आपुलें संपादा ॥७४॥
ऐसें बोलतां नारदमुनी ॥ श्रीदत्तात्रेय कृपा करुनी ॥ ठेविता झाला वरदपाणी ॥ चरपटमौळीं तेधवां ॥७५॥
संकल्पित स्थित तनु मन ॥ कायावाचा जीवित्वप्राण ॥ चित्त बुद्धि अंतःकरण ॥ घेतलें गोवूनि संकल्पीं ॥७६॥

मग वरदहस्त ठेवूनि मौळीं ॥ कर्णी ओपिली मंत्रावळी ॥ ओपिताचि अज्ञानकाजळी ॥ फिटूनि गेली तात्काळ ॥७७॥
ब्रह्मदर्शन खुणाव्यक्त ॥ होतांचि देखिलें सत्तत्त्व तेथ ॥ लखलखीत तेज अदभुत ॥ मित्रापरी भासलें ॥७८॥
कीं औदुंबरींचा ठाव सांडून ॥ मिरवती पृथ्वीवरुन ॥ तेवीं विधिपुत्र वसुनंदन ॥ तेजेंकरुनि गहिवरलें ॥७९॥
तें चरपटें पाहूनि तेजोसविता ॥ त्रिवर्गा चरणीं ठेविला माथा ॥ तो अवसर पाहूनि तत्त्वतां ॥ उमाकांत प्रगटला ॥१८०॥
प्रगट होतां अपर्णापती ॥ चरपटा सांगे मच्छिंद्रजती ॥ दशकर नमींकां कृपामूर्ती ॥ भेटावया आलासे ॥८१॥
ऐसें ऐकतां चरपटनाथ ॥ शिवा नमीतसे आनंदभरित ॥ मग दशकर कवळूनि हदयांत ॥ मुखालागीं कुरवाळी ॥८२॥
कुरवाळूनि म्हणे अत्रिसुता ॥ विद्या सांगावी चरपटनाथा ॥ नवांच्या गणीं करुनि सरता ॥ नाथपंथी मिरवी कां ॥८३॥
अवश्य म्हणोनि अत्रिसुत ॥ चरपटासी विद्या अभ्यासीत ॥ सकळ शास्त्रीं झाला ज्ञात ॥ उपरी तपा बैसविला ॥८४॥

मग नागपात्री अश्वत्थीं जाऊन ॥ द्वादश वर्षे वीरसाधन ॥ नऊ कोटी सात लक्ष रत्न ॥ शाबरी कवित्व पैं केलें ॥८५॥
यापरी मंत्रविद्या करुन ॥ मेळविले सुरवर मंडण ॥ स्वर्गदेवता तोषवून ॥ विद्यावरु घेतला ॥८६॥
मग श्रीगुरु अत्रिसुत ॥ सेविता झाला गिरनारपर्वत ॥ येरीकडे चरपटनाथ ॥ तीर्थावळी चालिला ॥८७॥
श्रीरामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर ॥ जगन्नाथ हरिहरेश्वर ॥ काशी मनकर्णिका विश्वेश्वर ॥ तीर्थे सेवीत चालिला ॥८८॥
तीर्थे करितां अपरिमित ॥ सच्छिष्य नव झाले त्यांत ॥ ते नवशिष्य प्रख्यातवंत ॥ सिद्धकळा जाणती ॥८९॥
राघवसिद्ध बाळसिद्ध ॥ गोकाटसिद्ध जाबुसिद्ध ॥ नैमित्यिक सारेंद्वक हुक्ष प्रसिद्ध ॥ द्वारभैरव रणसिद्ध तो ॥१९०॥
ऐसे चरपटाचे नवसिद्ध वर्ण ॥ शाबरी विद्येंत असती पूर्ण ॥ चौर्‍यायशीं सिद्ध नवांपासून ॥ उदयवंत पावले ॥९१॥
जोगी शारंगी निजानंद ॥ नैननिरंजन यदु प्रसिद्ध ॥ गैवनक्षुद्र कास्त सिद्ध ॥ रेवणनाथाचे असती पैं ॥९२॥
उरेश सुरेश धुरेश कुहर ॥ केशमर्दन सुद्धकपूर ॥ भटेंद्र आणि कटभ्रवा साबर ॥ हे नवसिद्ध भर्तरीनाथाचे ॥९३॥

दक्षेंद्र आणि अनिर्वा अपरोक्ष ॥ कामुकार्णव सहनसिद्ध प्रसिद्ध ॥ दक्षलायन देवसिद्ध ॥ पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध हे ॥९४॥
निर्णयार्णव हरदंतान ॥ भोमान हुक्षे कृष्णपलायन ॥ हेमा क्षेत्रांत रत्नागर नाम ॥ गोरक्षाचे हे असती ॥९५॥
विनयभास्कर दत्तघात ॥ पवनभार्गव सुक्षार्णव यथार्थ ॥ कविटशवी वधम प्रोक्षित ॥ नव जालिंदराचे हे असती ॥९६॥
शारुक वालुक शरभ सहन ॥ प्रोक्षितशैर्म कोकिल नाम ॥ कोस्मितवाच संपति नवही पूर्ण ॥ कान्हिपाचे हे असती ॥९७॥
यापरी चौरंगीचे सहा सिद्ध ॥ लोम भ्रातरक चिरकालवृन्द ॥ नारायण काळिका साव्रजी प्रसिद्ध ॥ चौरंगीचे असती पैं ॥९८॥
मीननाथ अडबंगीनाथ ॥ यांचे सहा सिद्ध सिद्धिवंत ॥ सुलक्षा लुक्ष मोक्षार्णव समर्थ ॥ द्वार भद्राक्ष सहावा ॥९९॥
एकूण चौर्‍यायशीं सिद्धांचा झाडा पूर्ण ॥ ग्रंथीं वदला धुंडीनंदन ॥ मालू नरकिमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ अष्टत्रिंशततिमोऽध्याय गोड हा ॥२०१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ अध्याय ३८॥ ओंव्या २०१॥
॥ नवनाथभक्तिसार अष्टत्रिंशतितमोऽध्याय समाप्त ॥

श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय ३८

श्रीगणेशाय नमः
जयजयाजी व्यंकटरमणा ॥ दयासागरा परिपूर्णा ॥ भक्तदुःखभंजना ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥१॥
मागिले अध्यायीं कथन ॥ नागनाथा भेटला अत्रिनंदन ॥ विद्याभ्यासें दीक्षाकारण ॥ नाथपंथीं मिरवला ॥२॥
उपरी मच्छिंद्राशीं खेळूनि रळी ॥ जिंकिला मच्छिंद्र तपोबळी ॥ तंव सिद्ध उत्पन्न करुनि मंडळी ॥ शाबरी विद्या ओपिली ॥३॥
यावरी श्रोतीं पुढें कथन ॥ पूर्वी दक्षगृहीं वार्ता जाण ॥ निघालें विवाहयोजनालक्षण ॥ मंगळकार्याचें तेधवां ॥४॥

हिमालयाची आत्मजा ॥ ती योजिली मंगलकाजा ॥ तेव्हां देवदानवमानवां भोजा ॥ पाचारण पाठविलें ॥५॥
तेणेंकरुनि दक्षागार ॥ भरोनि निघाला सुरवर ॥ मानवी दक्ष हरि हर ॥ सभास्थानीं बैसले ॥६॥
मंडळी ऐसी सर्वासहित ॥ बैसली असे पार्वती त्यांत ॥ मंगलकला करुनि मंडपांत ॥ मिरवत असे नोवरी ॥७॥
परी ते नोवरी स्वरुपखाणी ॥ कीं चंद्रकला नक्षत्रगणीं ॥ तेजाला जैसी सौदामिनी ॥ उजळपणा कराया ॥८॥
कीं सहस्त्र विद्युल्लतांचा पाळा ॥ ऐक्यपणें झाला गोळा ॥ सुरवरीं घनमंडळा ॥ चमकपणी शोभवी ॥९॥
कीं अर्क प्रत्यक्ष दीक्षाबाळ ॥ सभासद मिरवे केवळ ॥ तयाचें प्रतिबिंब व्योमीं जळ ॥ ब्रह्माण्डकुंडीं अर्क हा ॥१०॥
ऐसियापरी लावण्यता ॥ सभेंत मिरवे जगन्माता ॥ ते स्वरुप देखूनि नाभिसुत ॥ कामानळ दाटला ॥११॥
कामविरह चपळवंत ॥ नेणे विचार समयोचित ॥ स्थान सोडूनि इंद्रियांत ॥ लिंगामाजी पातला ॥१२॥
तैं विधीचा विरहकाम ॥ अधीरपणीं द्रवला उत्तम ॥ महीं प्राप्त होतां मनोधर्मे ॥ संकोचला विधी तो ॥१३॥

बैसल्याठायींचि करुन ॥ रेत रगडियेले महीकारण ॥ तैं आगळे साठसहस्त्र ऋषी वेषें ॥ वालखिल्य भागीं मिरवले ॥१५॥
परी एक आगळा होता भाग ॥ तैसाचि राहिला तेथें चांग ॥ सेवक झाडी महीअंग ॥ केरसमानी मिसळला ॥१६॥
उपरी सरतां मंगळनेम ॥ केला होता लज्जाहोम ॥ केर आणि तयाचें भस्म ॥ सेवक सांडिती सरितेंत ॥१७॥
सरितेंत पडतां सकळ मेळ ॥ सर्व रेताचा सांडूनि मळ ॥ केर मग उगवोनि तळ ॥ निर्मळपणीं वर्तला ॥१८॥
मग तो जळी ढळढळीत ॥ तरुनि प्रवाहीं वाहात जात ॥ तो वाहतां अकस्मात ॥ कुशवेष्टनी आतुडला ॥१९॥
तैं जललहरीचें नेटेंकरुन ॥ कुशवेष्टींत पडे जाऊन ॥ तेथे लोटतां बहुत दिन ॥ कुशमुळ्यांनीं वेष्टिला ॥२०॥
यापरी बहुतां दिवशीं ॥ ईश्वरआज्ञा अवतारक्रमासी ॥ पिप्पलायन त्या रेतासी ॥ नारायण संचरला ॥२१॥
संचरला परी कैसे रीतीं ॥ रोहिसावजे विपिनीं असती ॥ तो मेळ त्या कुशवेष्टीप्रती ॥ उदकपाना पातला ॥२२॥
त्यांत रोहिणी ऋतुवंत ॥ मूत्न स्त्रवली प्रत्यक्ष रक्त ॥ तें भेदूनि वीर्यव्यक्त ॥ रेत वाढी लागलें ॥२३॥

कुशवेट परम भुवन ॥ तयामाजी हे सघन ॥ वाढी लागतां स्वेदजविधान ॥ कीटकन्यायें करुनियां ॥२४॥
अंडज जारज स्वेदज प्रकरण ॥ ऐसीं जीवां उत्पत्तिस्थानें ॥ असो या विधानेकरुन ॥ मूर्ति रचिलीं नवमास ॥२५॥
देह वाढता सबळवंत ॥ कुशमूळ झालें त्रुटित ॥ मग ढाळपणीं महीवरतीं ॥ बाळ दृष्टीसी ते आलें ॥२६॥
तो त्या ठायीं अकस्मात ॥ सत्यश्रवा विप्र भागीरथींत ॥ येवोनियां दर्भानिमित्त ॥ कुशवेष्टी विलोकी ॥२७॥
तो विप्र असे परम सुशीळ ॥ पुनीतग्रामीं तयाचें स्थळ ॥ तेथें येतां दृष्टीं बाळ ॥ पाहिलेसे तेधवां ॥२८॥
देखिलें परी देदीप्यमान ॥ अर्कतेजें परम सुगण ॥ कीं प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकोन ॥ आणिता झाला त्या ठायीं ॥२९॥
कीं अनंत मस्तकींचा मणी ॥ विसरुनि गेला ते स्थानीं ॥ ऐसें भासलें विप्रा मनीं ॥ अति तेजस्वी चकचकाटे ॥३०॥
चित्तीं म्हणे हें बाळ ॥ कोणाचें आहे तेजःपुंजाळ ॥ कीं उर्वशी उदरकमळ ॥ टाकूनियां गेली असे ॥३१॥
कीं राजबीज मनमोहन ॥ जळदेवतीं दृष्टी पाहून ॥ आणिलें मातेच्या शेजेहून ॥ आपुले स्थानीं न्यावया ॥३२॥

तरी याची पुनः माता ॥ येऊनि भेटेल कधी आतां ॥ परी प्रेमरहित लोभ ममता ॥ टाकूनि ती गेलीसे ॥३३॥
ऐसा तर्कवितर्क करीत ॥ परी तो बाळा न लावी हस्त ॥ कैसे न्यावें म्हणोनि मनांत ॥ पुढील अर्थ दिसेना ॥३४॥
अति वितर्के भेदलें मन ॥ परी मोहें वेष्टिले पंच प्राण ॥ चित्तीं म्हणें कैसें सोडून ॥ बाळालागीं जावें हो ॥३५॥
अरण्य कर्कश तीर भागीरथी ॥ सावजे येती उदकाप्रती ॥ दृष्टि पडतां तयाचि क्षितीं ॥ घात करतील बाळकाचा ॥३६॥
ऐसें मोहें चित्तीं जल्पून ॥ परी स्पर्श न करी भयेंकरुन ॥ चित्तीं म्हणे नेणों संधान ॥ कैसें आहे कळेना ॥३७॥
ऐसें प्रकरणीं शंकित मानस ॥ बाळानिकट उभा असे ॥ परी स्वर्गाचे देव असती डोळस ॥ देखते झाले तयासी ॥३८।\
बाळक करीतसे रुदन ॥ हस्तपादांतें नाचवून ॥ तें स्वर्गी सुरवर पाहून ॥ नमन करिती भावानें ॥३९॥
म्हणती हा पिप्पलायन नारायण ॥ आजि देखियले तयाचे चरण ॥ तरी आजिचा दिन परम सुदिन ॥ कृतकृत्य झालों कीं ॥४०॥
मग सर्वत्र करुनि जयजयकार ॥ वर्षिते झाले कुसुमभार ॥ कुशवेष्टींत कुसुमें अपार ॥ खचूनियां पाडियेलीं ॥४१॥

विप्र बाळाच्या अंगावरुनी ॥ कुसुमें अपरिमित काढूनी ॥ टाकी परी कुसुमांलागोनी ॥ परी न सरे म्हणोनि दचकला ॥४२॥
चित्तीं म्हणे कैचें बाळप्रकरण ॥ पिशाचकरणी येते दिसोन ॥ अकस्मात येऊनि कुसुमघन ॥ कोणीकडून वर्षती ॥४३॥
ऐसा भयस्थित होऊनि चित्तीं ॥ पळूं लागला नगरवाटीं ॥ कैंचे दर्भ चरणसंपुटीं ॥ अति कवळूनि पळतसे ॥४४॥
तें पाहूनि सुर समस्तीं ॥ गदगदां हास्य करिती ॥ सत्यश्रव्यासी पळतो म्हणती ॥ उभा उभा पळूं नको ॥४५॥
ते सत्यश्रवें शब्द ऐकोन ॥ परम घाबरला पडे उलथून ॥ चित्तीं म्हणे पिशाच येऊन ॥ भक्षावया धांवले ॥४६॥
ढळढळीत भरले दोन प्रहर ॥ खेळी निघाले महीवर ॥ कैंचे बाळक तें प्राणहर ॥ पिशाचकृत्यें मिरवला ॥४७॥
ऐशा वितर्ककल्पना आणूनी ॥ पळत आहे प्राण सोडुनी ॥ पडतां महीतें उलथुनी ॥ पुनः उठोनी पळतसे ॥४८॥
सुरवर उभा उभा म्हणती ॥ तों त्यातें न दिसे क्षिती ॥ परी शब्द सुस्वर होती ॥ पिशाच सत्य हें आहे ॥४९॥
मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडुनी ॥ नारदातें बोलती वचनी ॥ स्वामी तुम्हीं जाऊनी ॥ सत्यश्रव्यातें सुचवावें ॥५०॥

हा परम भ्याड ब्राह्मण ॥ सत्यवादी परी करी पलायन ॥ तरी त्याचा संशय छेदून ॥ टाकूनि बाळ त्या देईजे ॥५१॥
ऐसें सुरवर कमलोदभवसुता ॥ बोलतांचि महाराज होय निघता ॥ ब्रह्मवीणा घेऊनि हाता ॥ महीवरती उतरला ॥५२॥
आपुले स्वरुपाचा लोप करुन ॥ मानववेषी दिव्य ब्राह्मण ॥ सत्यश्रव्याचे पुढें जाऊन ॥ उभा राहे मार्गात तो ॥५३॥
सत्यश्रवा भयभीत ॥ मार्गी पळतां श्वास सांडीत ॥ पडत झडत मुनी जेथें ॥ येवोनि तेथें पोहोंचला ॥५४॥
प्राण झाला कासावीत ॥ मुखीं न निघे श्वासोच्छवास ॥ तें पाहुनि नारद त्यास ॥ बोलता झाला महाराजा ॥५५॥
म्हणे महाराजा किमर्थी ॥ घाबरलासी काय पंथीं ॥ येरु म्हणे प्राणाहुती ॥ आजि झाली होती कीं ॥५६॥
दर्भानिमित्त गेलों सरितेतीरा ॥ पिशाचकळा तेथें पाहिली चतुरा ॥ बाळवेषें मी मोहिलों विप्रा ॥ मीचि म्हणोनि टिकलों ॥५७॥
टिकलों परी अकस्मात ॥ अपार कुसुमें तेथे पडत ॥ तें पाहूनियां भयभीत ॥ होऊनियां पळालों ॥५८॥
पळालों परी मागाहून ॥ अपार शब्दें पिशाचगण येऊन ॥ उभा रहा ऐसें म्हणोन ॥ वारंवार ऐकितों मी ॥५९॥

परी मी न पाहें मागें ॥ पडत झडत आलों लगबगें ॥ ऐसी कथा सांगोपागें ॥ झाली असे मज विप्रा ॥६०॥
मग नारदें धरुनि त्याचा हात ॥ तरुखालतें नेऊनि त्वरित ॥ बैसवूनि त्या स्वस्थचित्त ॥ वृत्तांतातें सांगतसे ॥६१॥
म्हणे विप्रा ऐक वचन ॥ तूं होतासी कुशबेटाकारण ॥ तेव्हां तुज म्यां विलोकून ॥ ऊर्ध्वदृष्टी पाहिलें ॥६२॥
पाहिलें परी अंबरांत ॥ मज दृष्टीं पडलीं सुरवरदैवतें ॥ त्यांणीं कुसुमें घेऊनि हातांत ॥ तुजवरी झोंकिलीं ॥६३॥
झोंकिलीं याचें कारण ॥ तुज बोलाविलें नामाभिधाने ॥ येरी म्हणे माझेचि नाम ॥ सत्यश्रवा म्हणताती ॥६४॥
नारद म्हणे असो कैसें ॥ सत्यश्रवा नाम तुज वसे ॥ म्हणोनि पुकारीत होते देव तैसें ॥ भूतचेष्टा नसे बा ॥६५॥
तरी सत्यश्रवा तुझें नाम ॥ कोठे आहे तुझें धाम ॥ नाहीं ठाऊक आम्हां ग्राम ॥ कोण आहे सांग पां ॥६६॥
असो इतुकें त्यासी विचारुन ॥ पुढें बोलला एक वचन ॥ बाळालागीं सदनीं नेऊन ॥ करीं पाळण प्रीतीनें ॥६७॥
ऐसें बोलूनि आणिक बोलले ॥ कीं हें बाळक ब्रह्म ठेलें ॥ पिप्पलायन नारायण जन्मले ॥ अवतार प्रगट जाहला ॥६८॥

तरी सकळ संशय सांडून ॥ बाळ नेई सदनालागून ॥ याचें करितां संगोपन ॥ सकळ सिद्धी साधती ॥६९॥
ऐसें सुरवरांचे बोलणें ॥ विप्रा म्यां येथूनि ऐकिले कानें ॥ असत्य मानूं नको जाणें ॥ देव सर्वही बोलती ॥७०॥
सत्यश्रवा विचारी मानसीं ॥ स्वर्गात नम नाम काय माहितीसी ॥ हाचि संशय धरुनि चित्तासी ॥ क्षण एक तिष्ठतसे ॥७१॥
करुनि पाहे ऊर्ध्व दृष्टी ॥ तों देखिली अपार देवथाटी ॥ परी नारदकृपेची सर्व हातवटी ॥ देव दृष्टी पडियेले ॥७२॥
मग नारदबोलें तुकावी मान ॥ म्हणे विप्रा बोलसी सत्यवचन ॥ माझे दृष्टी सुरवरगण ॥ येथोनियां दिसती पैं ॥७३॥
तरी विप्रा ऐक सत्य वचन ॥ येई माझ्या समागमेंकरुन ॥ कुशवेष्टींतील बाळ उचलोन ॥ मम करीं ओपीं कां ॥७४॥
ऐसे बोल ऐकतां ॥ अवश्य म्हणे संवत्सरपिता ॥ मग नेऊनि सत्यश्रव्याचे हाता ॥ बाळकाकारणें ओपिलें ॥७५॥
सत्यश्रव्यातें नारदें ओपूनि बाळ ॥ तेणें योगें मन सुढाळ ॥ पोटीं आनंद भरोनि सबळ ॥ बाळ हदयीं कवळीतसे ॥७६॥
बाळ ओपूनि नारदमुनी ॥ बोलता झाला तयालागुनी ॥ सत्यश्रव्या बाळनामीं ॥ चरपट ऐसें पाचारीं ॥७७॥

चरपटनामी बाळ गुणी ॥ सुरवर बोलले आहेत वाणी ॥ ती ऐकिली निजश्रवणीं ॥ तरी हेंचि नाम ठेवीं कां ॥७८॥
अवश्य म्हणोनि सत्यश्रवा ॥ येता झाला निकट आपुल्या गांवा ॥ येरीकडे नारद देवां ॥ स्वर्गी जाऊनि संचरला ॥७९॥
सांगतां सकळ देवां वृत्तांत ॥ स्थाना गेले दव समस्त ॥ येरीकडे स्वसदनांत ॥ सत्यश्रवा संचरला ॥८०॥
गृहीं कांता चंद्रानामी ॥ अति लावण्य धार्मिक लक्ष्मी ॥ पतिव्रता ती अपारनेमी ॥ कीं ती अनसूया दूसरी ॥८१॥
तिचे निकट सत्यश्रवा ॥ उभा राहोनि बोले बरवा ॥ म्हणे कामिनी दर्भ मिळावा ॥ गेलों होतों काननीं ॥८२॥
तेथें अवचट लाभ झाला ॥ सुत तूतें दैंवें दिधला ॥ तरी पालन करुनि नाम याला ॥ चरपट ऐसें पाचारीं ॥८३॥
तयाच्या योगेंकरुन ॥ सुरवरांचे पाहिले चरण ॥ मग मुळापासूनि सकळ कथन ॥ कांतेपाशीं वदला तो ॥८४॥
कांता ऐकूनि वर्तमान ॥ तुकावीतसे आनंदें मान ॥ म्हणे दर्भभावें सेवितां विपिन ॥ वंशलता सांपडली ॥८५॥
कीं खापर वेंचूं जातां अवनीं ॥ तों सांपडला चिंतामणी ॥ तेवीं तुम्हां दैवेंकरुनी ॥ बाळ लाभलें महाराजा ॥८६॥

कीं भूत पूजावया मसणवटीं ॥ जातां लक्ष्मी भेटे वाटीं ॥ तेवीं तुम्हां काननपुटी ॥ बाळलाभ झाला असे ॥८७॥
कीं दगड उलथायाचे मिषें ॥ दैवें लाभला चोख परीस ॥ तेवीं तुम्हां लाभ सुरस ॥ बाळलाभ झाला असे ॥८८॥
कीं सहज मर्कट धरुं जातां ॥ गांठ पडली हनुमंता ॥ तेवीं तुम्हां दर्भभावार्था ॥ बाळलाभ झाला असे ॥८९॥
ऐसें म्हणोनि चंद्रा नारी ॥ बाळ हदयीं कवळी करीं ॥ परी अति स्नेहचित्तसमुद्रीं ॥ आनंदलहरी उठवीत ॥९०॥
जैसा दरिद्री पिशुन वनांत ॥ निजे परी मांदुस सांपडे त्यांत ॥ मग आनंद तयाचे हदयांत ॥ कवण अर्थी वर्णिला ॥९१॥
तेवीं वाढोनि आनंदलहरी ॥ बाळा आलिंगी चंद्रा नारी ॥ मग स्नान पान पयोधरी ॥ करुनि पालखातें हालवीतसे ॥९२॥
चरपट ऐसें बोलूनि नाम ॥ गीत गातसे साधूसम ॥ ऐसें सलील दावूनि प्रेम ॥ अपार दिवस लोटले ॥९३॥
सप्त वर्षेपर्यत ॥ पालन केलें कालस्थित ॥ उपरी मौंजीबंधन त्यांत ॥ अति गजरें केलें असे ॥९४॥
मग करवूनि वेदाध्ययन ॥ शास्त्रीविद्येत केलें निपुण ॥ मीमांसदि सकळ व्याकरण ॥ न्यायशास्त्र पढविलें ॥९५॥

यापरी कोणे एके दिवशीं ॥ गमन करितां देवऋषी ॥ सहज येत पुनीतग्रामासी ॥ स्मरण झाले नाथाचें ॥९६॥
मग आगंतुकाचा वेष धरुन ॥ पाहे सत्यश्रव्याचा आश्रम ॥ तों द्वादश वर्षाचा चरपट नाम ॥ महातेजस्वी दिसतसे ॥९७॥
मग विप्रवेषे ते गृहभक्ती ॥ सारुनि पाहिली चरपटमूर्ती ॥ तों सुगम विद्येची दैदीप्यशक्ती ॥ तया देही देखिली ॥९८॥
ब्रह्मरेतोदयप्राणी ॥ म्हणोनि बंधुत्व नारदमुनी ॥ त्या मोहानें सकळ करणी ॥ चरपटाची देखिली ॥९९॥
परम तोष मानूनि चित्तीं ॥ जात बद्रिकाश्रमाप्रती ॥ तों आत्रेय आणि मच्छिंद्रजती ॥ निजदृष्टीं देखिले ॥१००॥
मग भावेंकरुनि तये वेळां ॥ उभयतांसी जाऊनि भेटला ॥ त्यातें पाहूनि लोट लोटल ॥ चित्तसरिती प्रेमाचा ॥१॥
निकट बैसूनि तयांचे पंगतीं ॥ परी एकाग्रीं मिळाल्या चतुर्थशक्तीं ॥ मच्छिंद्रनाथ अपर्णापती ॥ दत्तात्रेय चतुर्थ तो ॥२॥
परी हे चौघेही एकाभ्यासी ॥ दीक्षावंत पूर्ण संन्यासी ॥ वैष्णवनामी भागवतदेशीं ॥ प्रतापार्क तयांचा ॥३॥
कीं निधी परीस चिंतामणी ॥ कीं चौथा कौस्तुभ वैडूर्यखाणी ॥ ऐसे चौघेही एकासनीं ॥ विराजले एकदां ते ॥४॥

वार्तालता अपरिमित ॥ तों चरपटवार्ता विधिसुत ॥ मुळापासूनि पूर्ण कथित ॥ त्रिवर्गात सांगितली ॥५॥
वार्ता ऐकतां आदिनाथ ॥ श्रीदत्तात्रेय बोलत ॥ कीं तुम्ही नवनारायणात ॥ सनाथ करुं इच्छिलें ॥६॥
तो पिप्पलायन नारायण ॥ अवतार मिरवला चरपटनाम ॥ तया आतां सनाथ करुन ॥ कल्याणरुपीं मिरवाल ॥७॥
ऐसे बोलतां उमारमण ॥ बोलतां झाला अत्रिनंदन ॥ कीं महाराजा पश्चात्तापाविण ॥ हितप्राप्ती मिळेना ॥८॥
तरी चरपटातें पश्चात्तापें ॥ मानला नाहीं जंववरी बापें ॥ त्यावरी अनुग्रहलोपें ॥ माझ्यावरी मिरवतसे ॥९॥
यावरी बोले नारदमुनी ॥ हे अवधूता बोलसी वाणी ॥ तरी चरपटाचे अंतःकरणीं ॥ पश्चात्ताप मिरवे तो ॥११०॥
परी तुम्ही जीवासम भावें ॥ चरपटभागीं मिरवा सदय ॥ तों पश्चात्तापउदय ॥ चरपटदेहीं करितों मी ॥११॥
ऐसें बोलूनि अवधूताप्रती ॥ पाहिली शीघ्र लुप्तग्रामक्षिती ॥ पवित्र होऊनि विद्यार्थी ॥ सत्यश्रव्यातें भेटला ॥१२॥
म्हणे महाराजा गुरुवर्या ॥ मी विद्यार्थी विद्याकार्या ॥ तरी मजवरी करुनि दया ॥ विद्यारत्न ओपावें ॥१३॥

मग अवश्य म्हणोनि तो ब्राह्मण ॥ अभ्यासविद्येकारणें ॥ कुलंब ऐसें स्वदेहा नामाने ॥ सत्यश्रव्या वदलासे ॥१४॥
कुलंब नामें नारदमुनी ॥ आणि चरपट नामेंकरोनीं ॥ उभयतां बैसूनि एकासनीं ॥ अभ्यास करिती सद्विद्या ॥१५॥
परी कोठेंही न लागे ठिकाण ॥ तो अवसर आल दैवेंकरोन ॥ तया ग्रामीं एक यजमान ॥ पाचारावया पातला ॥१६॥
तयाचे गृहीं प्रयोजन ॥ करणें होतें ओटीभरण ॥ तो ग्रामजोशी म्हणोन ॥ पाचारावया पातला ॥१७॥
पातला परी सत्याश्रवा ॥ बैसला होता अर्चूनि देवा ॥ मग चरपटा सांगोनि मनोभावा ॥ नारदासह पाठविला ॥१८॥
चरपट जाऊनि तयाचे धार्मी ॥ विधी उरकला मनोधर्मीं ॥ उपरी यजमान दक्षिणापाणी ॥ येता झाला महाराजा ॥१९॥
नारदें पाहूनियां संधी ॥ स्मरण झालें पूर्वविधी ॥ चरपटमनीं कलह नव्हता कधीं ॥ परी नारदें योजिला ॥१२०॥
बैसलें होते कार्यालागुनी ॥ तों नारद बोले चरपटासी वाणी ॥ दक्षिणा न घेतां तूं गुणी ॥ योगपुरुषा योगज्ञाना ॥२१॥
जरी तूं दक्षिणा हातीं घेसी ॥ तरी योग्य न वाटे आम्हांसीं ॥ आपण उभयतां अज्ञान विद्यार्थी ॥ भागाभाग समजेना ॥२२॥

तरी उगलाचि चाल चरपटा उठोनि ॥ सत्यश्रवा येईल तव दक्षिणा घेऊनि ॥ चरपट म्हणे रिक्तहस्तेकरोनी ॥ कैसें जावें सदनासी ॥२३॥
नारद म्हणें तूं दक्षिणा घेसी ॥ परी अमान्य होईल तव पित्यासी ॥ येरु म्हणे कसरतेसी ॥ करुनि दक्षिणा घेईन मी ॥२४॥
कसरत करुनि सवाई पाडें ॥ द्रव्य ठेवितां तातापुढें ॥ मग तो काय बोलेल वाकुडें ॥ भलेपणा दावील कीं ॥२५॥
तों ती दक्षिणा अति सान ॥ नव्हती उभयतांच्या स्वरुपाप्रमाण ॥ तेणेंकरुनि चरपट मनें ॥ खिन्न झाला धार्मिक तो ॥२६॥
ऐसें उभयांचें झालें भाषण ॥ तों यजमान आला दक्षिणा घेऊनि ॥ चरपटाहातीं देत भिजवून ॥ अल्प दक्षिणा पहातसे ॥२७॥
आधींच नारदें कळ लावूनी ॥ ठेविली होती अंतःकरणीं ॥ त्यावरी लघु दक्षिणा पाहूनी ॥ कोप अत्यंत पावला ॥२८॥
नारदें भाषणापूर्वीच बीज ॥ पेरुनि ठेविलें होतें सहज ॥ कोपतरु फळविराज ॥ कलह उत्पन्न झाला पैं ॥२९॥
मग बोलता झाला यजमानासी ॥ म्हणे तुम्हीं ओळखिलें नाहीं आम्हांसी ॥ कवण कार्य कवण याचकासी ॥ द्यावें कैसें कळेना ॥१३०॥
यजमान म्हणे ऐक भटा ॥ याचका पैका द्यावा मोठा ॥ परी दाता असेल करंटा ॥ मग याचकें काय करणें ॥३१॥

येरी म्हणे सामर्थ्य असतां ॥ तरी प्रवर्तावें कार्यार्था ॥ ऐसेपरी बोलतां ॥ उभयतां कलह अपार वाढे ॥३२॥
नारद तेथोनि निघोनी ॥ सत्यश्रवा विप्राजवळी येऊनी ॥ म्हणे दुखविला यजमान गुणी ॥ धडगत मज दिसेना ॥३३॥
असंतुष्ट द्विज नष्ट ॥ ऐसें बोलती सर्व वरिष्ठ ॥ तरी चरपटानें केलें भ्रष्ट ॥ यजमानकृत्य सर्वस्वीं ॥३४॥
आपण याचक संतुष्टवृत्ती ॥ सदा असावें गौरवयुक्ती ॥ आर्जव केलिया कार्ये घडती ॥ न घडे तेंचि महाराजा ॥३५॥
ऐसें बोलतां नारदमुनी ॥ कोप चढला सत्यश्रव्या लागुनी ॥ तत्काळ देवार्चन सोडोनी ॥ यजमानगृहीं पातला ॥३६॥
तो यजमान आणि सुत ॥ बोलबोली ऐकिली समस्त ॥ तेंही पाहूनि साक्षवंत ॥ अति कोप वाढला ॥३७॥
जैसा आधींच वैश्वानर ॥ त्यावरी सिंचिलें स्नेह अपार ॥ कीं उन्मत्त झालिया पान मदिर ॥ त्यावरी संचार भूताचा ॥३८॥
त्याची न्यायें सत्यश्रवा ॥ कोपानळीं चढला बरवा ॥ येतांचि चरपटमुखीं रवा ॥ करपुटानें काढीतसे ॥३९॥
ताडन होतां मुखावरती ॥ चरपटही पडला क्रोधाहुतीं ॥ आधींच बोलतां यजमानाप्रती ॥ क्रोधोदकें भिजलासे ॥१४०॥

त्यावरी चरपटनेत्रीं ॥ क्रोधाचे पूर लोटती ॥ मग सर्व त्यागूनि क्रोधें जल्पती ॥ गांवाबाहेर निघाला ॥४१॥
गांवाबाहेर भगवतीदुर्ग ॥ जाऊनि बैसला गुप्तमार्ग ॥ पश्चात्तापें झाला योग ॥ मनामाजी दाटेना ॥४२॥
येरीकडे नारदमुनी ॥ अंतरसाक्षी सर्व जाणुनी ॥ दिव्यभव्य विप्र प्राज्ञी ॥ वेष द्वितीय नटलासे ॥४३॥
होऊनि दिव्य ब्राह्मण ॥ दुर्गालयीं आला दर्शना म्हणोन ॥ भगवतीतें नमस्कारुन ॥ चरपटासमीप बैसला ॥४४॥
म्हणे कोण जी कां हो येथ ॥ बैसले आहां चिंतास्थित ॥ येरु ऐकूनि सकळ वृत्तांत ॥ तयापाशीं निवेदी ॥४५॥
ऐकूनि चरपटाचें वचन ॥ म्हणे पिसाट झाला ब्राह्मण ॥ ऐशा क्रोधें पुत्रालागून ॥ दुखविलें वृद्धानें ॥४६॥
आपुले चरणीं चरणसंपुट ॥ पुत्रापायीं येतां नीट ॥ मग पुत्रमर्यांदा रक्षूनि चोखट ॥ माहात्म्य आपुलें रक्षावें ॥४७॥
ऐशी चाल जगतांत ॥ प्रसिद्धपणी आहे वर्तत ॥ तरी मतिमंद तो वृद्ध निश्चित ॥ बुद्धिभ्रष्ट म्हणावा ॥४८॥
तरी ऐशियाचा संग त्यूजून ॥ तूं सेवावें महाकानन ॥ परतोनि त्याच्या वदना वदन ॥ दावूं नये पुत्रानें ॥४९॥

ऐसें बोलतां नारदमुनी ॥ चरपटा क्रोध अधिक मनीं ॥ दाटला पश्चात्तापें करुनी ॥ अधिकोत्तर नेटका ॥१५०॥
मग त्या विप्रालागीं बोलत ॥ म्हणे मम गृहीं जाऊन गुप्त ॥ कुलंब नाम विप्र यथार्थ ॥ पाचारुनि आणावा ॥५१॥
त्यातें घेऊनि स्वसंगती ॥ आम्ही जाऊं विदेशाप्रती ॥ पाहूनि सबळ सदगुणमूर्ती ॥ विद्या सकळ अभ्यासूं ॥५२॥
अवश्य म्हणोनि तो ब्राह्मण ॥ भगवती दुर्गाबाहेर येऊन ॥ त्या स्वरुपा लोप करुन ॥ कुलंववेष नटलासे ॥५३॥
पुन्हां त्यापाशीं शीघ्र येऊन ॥ केली चरपटालागी देखण ॥ म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण ॥ हिताहित कळेना ॥५४॥
तरी ऐसिया क्रोधापासीं ॥ आम्ही न राहूं निश्चयेंसीं ॥ तरी आणिक गुरु पाहूनि महीसी ॥ विद्येलागीं अभ्यासूं ॥५५॥
ऐसें बोलतां कुलंब वचन ॥ अधिकोत्तर चरपटमन ॥ पश्चात्ताप दाटून ॥ कुलंबचित्तीं मिरवला ॥५६॥
म्हणे सख्या अन्य क्षेत्रासी ॥ आपण राहूनि उभयतांसी ॥ दोघे एकचि मार्गासी ॥ वर्तणुकी राहूंया ॥५७॥
करुं एकचित्तें आपणास ॥ पडणार नाहीं दुःखलेश ॥ गुरु संपादूनि निःशेष ॥ विद्येलागीं अभ्यासूं ॥५८॥

ऐसें बोलतां चरपटासी ॥ अवश्य म्हणे विधिसुत त्यासी ॥ तत्काळ सांडूनियां नगरासी ॥ मुनिराज ऊठला ॥५९॥
मग चरपट आणि नारदमुनी ॥ उभयतां चालिले मार्ग लक्षूनी ॥ पांच कोश लंधितां अवनी ॥ नारद बोले तयातें ॥१६०॥
म्हणे सखया ऐक वचन ॥ आपण पाहूं बद्रिकाश्रम ॥ श्रीबद्रिकेदारा नमून ॥ काशीक्षेत्रीं मग जाऊं ॥६१॥
तये क्षेत्रीं विद्यावंत ॥ विप्र आहेत अपरिमित ॥ कोणी आवडेल जो चित्तांत ॥ विद्या त्यायाशीं अभ्यासूं ॥६२॥
ऐसें बोलतां कुलंब चरपटाप्रत ॥ अवश्य म्हणे विप्रपुत्र ॥ मार्ग धरुनि बद्रिकाश्रमातें ॥ पाहावया चालिले ॥६३॥
मार्गी करुनि भिक्षाटन ॥ पाहते झाले बद्रिकाश्रम ॥ केदारेश्वर देवालयांत जाऊन ॥ बद्रिकेदार नमियेला ॥६४॥
नमितां उभयें श्रीकेदार समर्थ ॥ तों प्रगट झाले मच्छिंद्रदत्त ॥ तें पाहूनि विधिसुत ॥ तयांपासीं पातले ॥६५॥
दत्तचरणीं ठेवूनि माथा ॥ आणिक नमी मच्छिंद्रनाथा ॥ तें पाहूनि चरपटी तत्त्वतां ॥ तोही वंदी उभयतांसी ॥६६॥
चरपटें उभयतां करुनि नमन ॥ पुसतसे तो कुलंबाकारण ॥ म्हणे महाराजा हे कोण ॥ उभयतां असती पैं ॥६७॥

नारद म्हणे ओळखीं नयनीं ॥ अत्रिसुत हा दत्तात्रेय मुनी ॥ आणि मच्छिंद्र जती ऐकसी कानीं ॥ तोचि असे का ब्राह्मणा ॥६८॥
यानंतर मी देवऋषी ॥ नारद म्हणती या देहासी ॥ तव कार्यार्थ कुलंबवेषीं ॥ मानवदेहीं नटलों मी ॥६९॥
ऐसे ऐकतां चरपटवचन ॥ कुलंबचरणीं माथा ठेवून ॥ म्हणे महाराजा स्वरुप दावून ॥ सनाथ करी मज आतां ॥१७०॥
नारद म्हणे ऐक वचन ॥ आम्ही स्वरुप दावूं त्रिवर्ग जाण ॥ परी बा गुरुप्रसादाविण ॥ न देखवे गा तुजलागीं ॥७१॥
तरी गुरुप्रसादमंत्र कानीं ॥ रिघावा होतांचि ध्यानीं ॥ मग आम्हीच काय दिसती त्रिभुवनीं ॥ ब्रह्मस्वरुप होशील तूं ॥७२॥
यावरी बोले चरपटनाथ ॥ कोणता पाहूं गुरु येथ ॥ तुम्हांपक्षां प्रतिष्ठावंत ॥ भुवनत्रयीं असेना ॥७३॥
तरी मज अनुग्रह द्यावा येथें ॥ करावें स्वरुपीं सनाथ मातें ॥ नारद म्हणे दत्तात्रेयातें ॥ कारण आपुलें संपादा ॥७४॥
ऐसें बोलतां नारदमुनी ॥ श्रीदत्तात्रेय कृपा करुनी ॥ ठेविता झाला वरदपाणी ॥ चरपटमौळीं तेधवां ॥७५॥
संकल्पित स्थित तनु मन ॥ कायावाचा जीवित्वप्राण ॥ चित्त बुद्धि अंतःकरण ॥ घेतलें गोवूनि संकल्पीं ॥७६॥

मग वरदहस्त ठेवूनि मौळीं ॥ कर्णी ओपिली मंत्रावळी ॥ ओपिताचि अज्ञानकाजळी ॥ फिटूनि गेली तात्काळ ॥७७॥
ब्रह्मदर्शन खुणाव्यक्त ॥ होतांचि देखिलें सत्तत्त्व तेथ ॥ लखलखीत तेज अदभुत ॥ मित्रापरी भासलें ॥७८॥
कीं औदुंबरींचा ठाव सांडून ॥ मिरवती पृथ्वीवरुन ॥ तेवीं विधिपुत्र वसुनंदन ॥ तेजेंकरुनि गहिवरलें ॥७९॥
तें चरपटें पाहूनि तेजोसविता ॥ त्रिवर्गा चरणीं ठेविला माथा ॥ तो अवसर पाहूनि तत्त्वतां ॥ उमाकांत प्रगटला ॥१८०॥
प्रगट होतां अपर्णापती ॥ चरपटा सांगे मच्छिंद्रजती ॥ दशकर नमींकां कृपामूर्ती ॥ भेटावया आलासे ॥८१॥
ऐसें ऐकतां चरपटनाथ ॥ शिवा नमीतसे आनंदभरित ॥ मग दशकर कवळूनि हदयांत ॥ मुखालागीं कुरवाळी ॥८२॥
कुरवाळूनि म्हणे अत्रिसुता ॥ विद्या सांगावी चरपटनाथा ॥ नवांच्या गणीं करुनि सरता ॥ नाथपंथी मिरवी कां ॥८३॥
अवश्य म्हणोनि अत्रिसुत ॥ चरपटासी विद्या अभ्यासीत ॥ सकळ शास्त्रीं झाला ज्ञात ॥ उपरी तपा बैसविला ॥८४॥

मग नागपात्री अश्वत्थीं जाऊन ॥ द्वादश वर्षे वीरसाधन ॥ नऊ कोटी सात लक्ष रत्न ॥ शाबरी कवित्व पैं केलें ॥८५॥
यापरी मंत्रविद्या करुन ॥ मेळविले सुरवर मंडण ॥ स्वर्गदेवता तोषवून ॥ विद्यावरु घेतला ॥८६॥
मग श्रीगुरु अत्रिसुत ॥ सेविता झाला गिरनारपर्वत ॥ येरीकडे चरपटनाथ ॥ तीर्थावळी चालिला ॥८७॥
श्रीरामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर ॥ जगन्नाथ हरिहरेश्वर ॥ काशी मनकर्णिका विश्वेश्वर ॥ तीर्थे सेवीत चालिला ॥८८॥
तीर्थे करितां अपरिमित ॥ सच्छिष्य नव झाले त्यांत ॥ ते नवशिष्य प्रख्यातवंत ॥ सिद्धकळा जाणती ॥८९॥
राघवसिद्ध बाळसिद्ध ॥ गोकाटसिद्ध जाबुसिद्ध ॥ नैमित्यिक सारेंद्वक हुक्ष प्रसिद्ध ॥ द्वारभैरव रणसिद्ध तो ॥१९०॥
ऐसे चरपटाचे नवसिद्ध वर्ण ॥ शाबरी विद्येंत असती पूर्ण ॥ चौर्‍यायशीं सिद्ध नवांपासून ॥ उदयवंत पावले ॥९१॥
जोगी शारंगी निजानंद ॥ नैननिरंजन यदु प्रसिद्ध ॥ गैवनक्षुद्र कास्त सिद्ध ॥ रेवणनाथाचे असती पैं ॥९२॥
उरेश सुरेश धुरेश कुहर ॥ केशमर्दन सुद्धकपूर ॥ भटेंद्र आणि कटभ्रवा साबर ॥ हे नवसिद्ध भर्तरीनाथाचे ॥९३॥

दक्षेंद्र आणि अनिर्वा अपरोक्ष ॥ कामुकार्णव सहनसिद्ध प्रसिद्ध ॥ दक्षलायन देवसिद्ध ॥ पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध हे ॥९४॥
निर्णयार्णव हरदंतान ॥ भोमान हुक्षे कृष्णपलायन ॥ हेमा क्षेत्रांत रत्नागर नाम ॥ गोरक्षाचे हे असती ॥९५॥
विनयभास्कर दत्तघात ॥ पवनभार्गव सुक्षार्णव यथार्थ ॥ कविटशवी वधम प्रोक्षित ॥ नव जालिंदराचे हे असती ॥९६॥
शारुक वालुक शरभ सहन ॥ प्रोक्षितशैर्म कोकिल नाम ॥ कोस्मितवाच संपति नवही पूर्ण ॥ कान्हिपाचे हे असती ॥९७॥
यापरी चौरंगीचे सहा सिद्ध ॥ लोम भ्रातरक चिरकालवृन्द ॥ नारायण काळिका साव्रजी प्रसिद्ध ॥ चौरंगीचे असती पैं ॥९८॥
मीननाथ अडबंगीनाथ ॥ यांचे सहा सिद्ध सिद्धिवंत ॥ सुलक्षा लुक्ष मोक्षार्णव समर्थ ॥ द्वार भद्राक्ष सहावा ॥९९॥
एकूण चौर्‍यायशीं सिद्धांचा झाडा पूर्ण ॥ ग्रंथीं वदला धुंडीनंदन ॥ मालू नरकिमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ अष्टत्रिंशततिमोऽध्याय गोड हा ॥२०१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ अध्याय ३८॥ ओंव्या २०१॥
॥ नवनाथभक्तिसार अष्टत्रिंशतितमोऽध्याय समाप्त ॥

श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय ३७

श्रीगणेशाय नमः
जयजयाजी पंकजाक्षा ॥ आदिपुरुषा सर्वसाक्षा ॥ अव्यक्तव्यक्ता सर्वपरीक्षा ॥ महादक्षा रमावरा ॥१॥
मागिले अध्यायीं कथन ॥ करविलें वटसिद्धनागनाथजन्म ॥ उपरी सिद्धकळा पावून ॥ कोल्हापुरीं पातला ॥२॥
तेथें राहूनि लक्ष्मीआलयांत ॥ पुजारी करुनि हस्तगत ॥ सर्व सामग्री ओवरींत ॥ नेऊनियां दाखविली ॥३॥
दाखवूनि म्हणें पुजार्‍यांसी ॥ सबळ पडल्या कनकराशी ॥ तरी ह्या सरतील ज्या दिवशीं ॥ तंववरी संतर्पण योजावें ॥४॥

योजावें तरी अन्यवर्ण ॥ कांहींच धरुं नये भिन्न ॥ सकळांलागीं करुनि पक्कान्न ॥ पंक्तीतें वाढावें ॥५॥
गांवामाजी सकळांकारणें ॥ पेटूं न द्यावा पाकीं अग्न ॥ द्विवेळा त्रिवेळा घालूनि भोजन ॥ तुष्ट करावें सकळातें ॥६॥
शेट सावकार राजा रंक ॥ सकळांसी आणूनि ओपावा पाक ॥ अंत्यजादि भुदेव लोक ॥ तुष्ट करावें सर्वांसी ॥७॥
ऐसें सांगूनि पुजार्‍यातें ॥ शीघ्र कामाठी आणवीत ॥ कार्ययोगें अपरिमित ॥ सकाम कामीं योजिले ॥८॥
उत्तम तिथी नेम करुन ॥ मांडव मंडप उभारुन ॥ पाकालागीं सज्ज करुन ॥ सर्व काम चालविलें ॥९॥
मग शिष्टाशिष्ट गृहीं धाडून ॥ तया दिधलें आमंत्रण ॥ येरीकडे पाक निर्माण ॥ करावया लाविलें ॥१०॥
आणि ग्रामद्वारीं टिळा लावून ॥ भोजनदवंडी ग्रामीं पिटून ॥ सर्व सामग्री सज्ज करुन ॥ काम चालीं चालविलें ॥११॥
शैव श्रावक आणि ब्राह्मण ॥ भेद चौर्‍यायशीं देशांसमान ॥ देवाग्नी विप्र ऋषि ब्राह्मण ॥ पाक भिन्नभिन्न निर्मिती ॥१२॥
पंच द्राविड देश मुलतानी ॥ मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी ॥ हुसेनी पौंड्र मिळोनी ॥ देशजाती मिळाल्या ॥१३॥

असो भेदाभेद अन्यजाती ॥ षड्र मार्गानीं पाकविती ॥ खाज्या करंज्या कचुर मालती ॥ शिरा बुंदी करिताती ॥१४॥
पुरी पोळी क्षिप्रा बहुत ॥ चमचमीत भाज्या वरणभात ॥ पंचमधु त्यांत अपार घृत ॥ इच्छेसमान मिरवलें ॥१५॥
असो पाकाग्नि सिद्ध करुन ॥ चालते पंक्तीं सेविती अन्न ॥ पुन्हां क्षुधा लागल्या परतून ॥ येऊनि अन्न सेविती ॥१६॥
प्रथम पाक जातजाती ॥ तेथें नसे कांहीं अरुती ॥ कितीक वाढूनि गृहासी नेती ॥ भोजन करुनि मन माने ॥१७॥
कोणी कोरडेंचि उपटूनि नेती अन्न ॥ नेऊनि भरिती आपुलें सदन ॥ मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न ॥ सर्व झालें गांवांत ॥१८॥
राव रंक कुटुंबासहित ॥ अन्न सेवूनि होती तृप्त ॥ मग वन्ही इतुका दीपानिमित्त ॥ गृहोगृहीं मिरवला ॥१९॥
असो यापरी एक मास ॥ ग्राम सेवी सिद्धअन्नास ॥ यावरी कथा अत्रिसुतास ॥ कैसी वर्तली ती ऐका ॥२०॥
प्रथम दिनीं भिक्षेकारण ॥ गांवांत संचरे अत्रिनंदन ॥ कुश्वितरुपी विरुपवान ॥ भिक्षा मागे गृहोगृहीं ॥२१॥
तंव ते घरोघरींचे जन ॥ म्हणती गांवांत प्रयोजन ॥ होतें तेथे आम्हां जाणें ॥ कुटुंबादि भोजना ॥२२॥

तरी तूं सत्वरगती ॥ जाऊनि सारी कां आपुली भुक्ती ॥ व्यर्थ शीण कासायाप्रती ॥ वाईट कदन्न इच्छूनी ॥२३॥
उत्तम पक्क अन्न टाकून ॥ व्यर्थ कां शिणसी दरिद्रवान ॥ कामधेनूचे कासे आनन ॥ कांडणकोंडा कां भक्षावा ॥२४॥
कीं कल्पतरु बैसल्या ठायीं ॥ इच्छेसमान पदार्थ देई ॥ मग कां शिणावें धांवूनि पायीं ॥ मेळवावया भुक्तीते ॥२५॥
परीस असतां गृहालागून ॥ मच चाकरी कासया करावी हेमाकारण ॥ भाग्यें आतुडतां पीयुषपान ॥ मग वल्लीरसायण कां इच्छावें ॥२६॥
तेवीं तूं प्रकरण करिसी येथें सोडूनि सुधारसअन्नातें ॥ कदन्नाकरितां या गांवात ॥ हिंडतोसी मतिमंदा ॥२७॥
येपरी असों आम्ही गृहासी ॥ भोजना जातों आम्ही कुटुंबेंसीं ॥ पाक करावा कवणें अर्थेसीं ॥ तुजलागीं ओपावया ॥२८॥
ऐसीं घरोघरीं भाषणें ॥ होती दत्तात्रेयाकारणें ॥ मग मनांत म्हणे प्रयोजन ॥ जाऊनि पाहूं निजदृष्टीं ॥२९॥
ऐसें योजूनि स्वचित्तांत ॥ तेथें पातला तपोनाथ ॥ उभा राहूनि पाकशाळेंत ॥ पाक लक्षांत आणीतसे ॥३०॥
तंव तो महाराज योगकारण ॥ देखतां ओळखी सिद्धिअन्न ॥ थोडें करितां नगसमान ॥ होय अपार न पचवितां ॥३१॥

एक पोळी पडतांचि लागली ॥ परी सहस्त्रही वाढियेली ॥ ऐशा चिन्हें ओळखिली ॥ सिद्धिकळा महाराजें ॥३२॥
मग तेथींच्या जनालागीं पुसत ॥ हें प्रयोजन एवढें कोण करीत ॥ येरु म्हणती महासमर्थ ॥ वटसिद्धनागनाथ करितो कीं ॥३३॥
ऐसें ऐकोनि अत्रिसुत ॥ खूण जाणली स्वचित्तांत ॥ कीं म्यां मुलासी सिद्धपदार्थ ॥ काशीक्षेत्रीं ओपिले ॥३४॥
तरी त्याचें नांव होतें यथार्थ ॥ वटसिद्धनागेश नागनाथ ॥ तरी तोचि काय आहे तेथें ॥ मोठेपणा मिरवावया ॥३५॥
त्यासी वर्षे लोटली वीस ॥ तरी झाला असेल स्थूळ देहास ॥ तरुणपणीं महंतीस ॥ वाढवावया टेकला ॥३६॥
टेकला परी मजकारणीं ॥ गोचर व्हावें ही इच्छा मनीं ॥ या गांवींचें संधान धरुनी ॥ संतर्पण मांडिलें ॥३७॥
हें गावीचें भिक्षास्थान ॥ भ्रष्ट करावें सिद्धिअन्न ॥ सकळ गांवींचा पाक वर्जून ॥ केला अर्थ मजकरितां ॥३८॥
तरी आतां असो कैसें ॥ आजिचा दिन करुं उपवास ॥ ऐसें योजूनि स्वचित्तास ॥ स्वामी तेथूनि चालिला ॥३९॥
चालिला परी आणिक जन ॥ पाचारिती बाळाकारण ॥ आपण जावें भोजन करुन ॥ तूं ऐसा कां जातोसी ॥४०॥

ऐसें म्हणोनि हातीं धरिती ॥ पुन्हां पाकशाळे आणिती ॥ परी तो नायके योगपती ॥ गांवामाजीं संचरे ॥४१॥
मग कणधान्याची भिक्षा करीत ॥ लोक पुसतां त्यांतें वदत ॥ कीं आमुचा नेम भिक्षारहित ॥ अन्न सेवीत नाहीं जी ॥४२॥
ऐसें वदूनि सकळ लोकांत ॥ शुष्क अन्न मागूनि घेत ॥ काशीक्षेत्रीं जाऊनि त्वरित ॥ भोजनातें सारीतसे ॥४३॥
ऐसें रीतीं एक मास ॥ लोटूनि गेला सहजस्थितीस ॥ परी नागनाथ स्वचित्तास ॥ विचार करितां पैं झाला ॥४४॥
म्हणे लोटला एक मास ॥ स्वामी न दिसे आम्हांस ॥ मग बोलावूनि ग्रामस्थांस ॥ पुसतां झाला महाराज ॥४५॥
म्हणे गांवात कोणी येत ॥ अतिथ आहे भिक्षावंत ॥ तंव ते म्हणती सिद्धनाथ ॥ एक अतिथ येतो की ॥४६॥
तो येथींचें तुमचें अन्न ॥ न सेवी मागतो भिक्षाकदन्न ॥ आम्ही पुसतां म्हणतो नेम ॥ माझा ऐसा आहे कीं ॥४७॥
आम्ही सारितो येथें भोजन ॥ म्हणोनि न मिळे त्या पक्कान्न ॥ यास्तव कोरडे मागूनि धान्य ॥ नेत आहे महाराजा ॥४८॥
ऐसें बोलतां सकळ ग्रामस्थ ॥ त्यांसी म्हणे नागनाथ ॥ मागूं येतील जे गांवांत ॥ करा श्रुत मजलागीं ॥४९॥

त्यांसीं कांहीं न टाकून ॥ श्रुत करावें मजकारण ॥ मग मी जाऊनी ग्लानित वचनें ॥ भोजन घालीन तयांसी ॥५०॥
परी आणिक एक अर्थ ॥ कोरडें अन्न न्या गृहांत ॥ येरु येईल जंव भिक्षेतें ॥ तेंचि अन्न वाढावें ॥५१॥
त्याणें हें अन्न घेतल्या पदरीं ॥ मग प्रयोजन आहे सांगा यापरी ॥ न घेई मग तुम्ही येऊनि झडकरी ॥ श्रुत करा मजलागीं ॥५२॥
ऐसें पांच पन्नासांसी ॥ नाथें सांगितलें भाविकांसी ॥ जे कदाकाळी कार्यासी ॥ ढळणार नाहींत निश्चयें ॥५३॥
ऐसें सांगूनि सिद्धिअन्न ॥ त्यातें दिधलें वस्त्रीं बांधून ॥ मग आपुल्या गृहीं जाऊन ॥ वाट पहात बैसले ॥५४॥
तों श्रीदत्तात्रेय अत्रिसुत ॥ भिक्षेसी आले अकस्मात ॥ तंव ते सिद्धिअन्न घेऊनि हातांत ॥ सन्मुख येती घालावया ॥५५॥
म्हणती महाराजा आम्ही दीन ॥ आमुचें गृहीं कैचें अन्न ॥ परी नागनाथ ॥ कृपा करुन ॥ देतो अन्न आम्हांसी ॥५६॥
तरी त्या भिक्षेंत भिक्षा चोज ॥ तुम्हां वाढावें धर्मकाज ॥ ऐसें बोलती तें सहज ॥ श्रुत कराया दत्तासी ॥५७॥
परम चतुर विचक्षण ॥ परीक्षा घेती श्रुत करुन ॥ परी तो त्रैदेवांचा अंश हें ऐकून ॥ भिक्षेतें आकळेना ॥५८॥

मागें पाऊल तत्काळ ठेवून ॥ जात होय अत्रिनंदन ॥ मग तें आपुलें गृहीचें अन्न ॥ घेऊनियां धांवती ॥५९॥
म्हणती महाराजा नागनाथाचें अन्न ॥ आपणा न वाटे चित्तीं प्रसन्न ॥ तरी आमुचे कष्टा चित्त देऊन ॥ विन्मुख होऊं नका जी ॥६०॥
ऐसें सांगूनि भिक्षा देती ॥ तो घेत नाहीं प्रांजळ चित्तीं ॥ मग लगबगें हेर जाती ॥ श्रुत करिती नाथासी ॥६१॥
नाथासी होतां श्रुत मात ॥ शीघ्र चपळत्वें येत धांवत ॥ निकट येतां हस्तसंकेतें ॥ हेर दाविती तयासी ॥६२॥
तोही हस्तसंकेतखुणें ॥ अत्रिसुताच्या निकट जाऊन ॥ प्रथम करें कर कवळून ॥ चरणीं माथा ठेवीतसे ॥६३॥
म्हणे महाराजा योगपती ॥ माय तूं माउली दयाळ कितीं ॥ तरी डावलूनि पाडसाप्रती ॥ गुप्त कैसा विचरसी ॥६४॥
मज करुनियां निढळवान ॥ दैन्यवंत बहुत काननीं ॥ तेथें सांडूनि निष्ठुरपणीं ॥ जासी कैसा वो माये ॥६५॥
मज बाळपणी आपुलें चोज ॥ दावूनियां तपोभोज ॥ गेलासी टाकूनि महाराज ॥ मागें दृष्टि न करितां ॥६६॥
तरी मी सखया तुजबांचुनी ॥ पडलों आहे घोर वनीं ॥ मार्ग लक्षितां सूक्ष्मनयनीं ॥ प्राण कंठीं उरला असे ॥६७॥

जैसा चातक दृष्टीकरुन ॥ वाट पाहे अंबुद सघन ॥ कीं उखली हरिणीलागून ॥ वाट पाहे पाडस ॥६८॥
वीस संवत्सर गेला काळ ॥ परी चिंतावन्ही दाही तळमळ ॥ तैं शांत करावया जळ ॥ तुझें कांहीं दिसेना ॥६९॥
आपावेगळी आपमासोळी ॥ तेवीं तव भेटी जीव तळमळी ॥ परी माये त्वां हदयगतकमळीं ॥ निष्ठुर कैसें सांठविलें ॥७०॥
ऐसें म्हणोनि आरंबळत ॥ नेत्रअश्रूंनी पाद क्षाळीत ॥ म्हणे अंतर देऊनि मातें ॥ गेलासी कैसा महाराजा ॥७१॥
ऐसी वदूनि ग्लानित वाणी ॥ पूर लोटवी नेत्रजीवनीं ॥ मग त्रयदेव परीक्षानयनीं ॥ अंतरातें ओळखी ॥७२॥
चित्तीं म्हणे प्रांजळवंत ॥ तापे तापला आहे नाथ ॥ मग मस्तकाखाली घालूनि हस्त ॥ उठविलें महाराजें ॥७३॥
प्रेमस्नेहें कवळूनि पाणी ॥ हदयीं कवळीला प्रेमेंकरुनी ॥ वामहस्ते कवळुनि मूध्नी ॥ नेत्रअश्रु पुसीतसे ॥७४॥
मग धरुनि शीघ्र हस्त ॥ नेत स्वामी एकांतांत ॥ कृपें मौळीं ठेवूनि हस्त ॥ कर्णी मंत्र ओपीला ॥७५॥
देऊनि स्वमुखें आत्मखून ॥ केला ब्रह्मपरायण ॥ अपरंपार अज्ञानपण ॥ मुळाहूनी नाशिलें ॥७६॥

ऐसी होतां ब्रह्मस्थितकोटी ॥ तत्काळ गुरुकृपें पडली दृष्टी ॥ जैसें अभ्र वितुळतां शेवटीं ॥ सुढाळ अर्क दिसतसे ॥७७॥
तेवीं पाहतां दत्तस्वरुप ॥ मग उचंबळला आनंदकूप ॥ अहा म्हणोनि बाप बाप ॥ पदीं मौळी अर्पीतसे ॥७८॥
मग परम प्रिय अत्रिनंदन ॥ कीं घेतला स्नेहेंकरुन ॥ करे मुख कुरवाळून ॥ मागील कथा निवेदी ॥७९॥
आविर्होत्र नारायण ॥ आहेसी बा तूं महीकारण ॥ उरगीकुशीं विधिवीर्यवान ॥ जन्म तुझा होय बा ॥८०॥
तरी ही ऐसी मूळकथा ॥ मज आतुडली हदयीं शोधिता ॥ म्हणूनि बाळा तुझ्या हाता ॥ सिद्धिकळा ओपिली ॥८१॥
तरी तुज भेटी द्यावयाकारण ॥ इच्छित होतें माझें मन ॥ परी प्रारब्धयोगें करुन ॥ आजि घडूनि आलें बा ॥८२॥
जें प्रकरण समयोचित ॥ लोहचुंबका भेटी होत ॥ कीं समुद्रक्षारऐक्यवंत ॥ नगआवळी होतसे ॥८३॥
तेवी बापा तुज मज भेठी ॥ झाली प्रारब्धयोगंकाठीं ॥ ऐसें म्हणोनि हदयपुटीं ॥ नाथालागीं धरीतसे ॥८४॥
मग उभय प्रतापवंत ॥ निघतां सांडूनि ते एकांत ॥ ग्रामाबाहेर निघोनि त्वरित ॥ काशीक्षेत्रीं चालिले ॥८५॥

चालिले परी ऐसें रीती ॥ यानमंत्र प्रयोगी विभूतीं ॥ नाथभाळीं चर्चुनि निगुतीं ॥ गमन दोघे करिताती ॥८६॥
मग पवनवेंगाचे गमन थकिता ॥ वाटे ऐसे गमती उभयतां ॥ लवतां नेत्रपातिये पातां ॥ काशीक्षेत्रीं पातले ॥८७॥
तेथे कांहींसे टेंकूनि क्षण ॥ सारिला आपुला नित्यनेम ॥ मग बद्रिकेदार चित्तीं धरुन ॥ गमन करिती त्या मागें ॥८८॥
भाळीं प्रयोग दिव्य विभूती ॥ यानरुपाची महाशक्ती ॥ क्षणें बद्रिकाश्रमाप्रती ॥ जाऊनिया पोंचलें ॥८९॥
संचार करिती शिवालयांत ॥ प्रत्यक्ष झाला उमाकांत ॥ मग प्रेमआवडीं उभवूनि पर्वत ॥ एकमेकां भेटती ॥९०॥
यापरी तो उमाकांत ॥ श्रीदत्तातें विचारीत ॥ दुसरा कोण आहे भृत्य ॥ मेळविला सेवेसी ॥९१॥
ऐसें बोलतां अनसूयासुत ॥ म्हणे महाराजा नाम या नागनाथ ॥ आविर्होत्र प्रतापवंत ॥ नारायण अवतार ॥९२॥
ऐसें बोलतां उमारमण ॥ दत्तासी म्हणे ऐक वचन ॥ यातें सद्विद्या अभ्यासून ॥ नाथपंथीं मिळवावा कीं ॥९३॥
मग अवश्य म्हणोनि अत्रिसुत ॥ राहता झाला षण्मास तेथ ॥ सांगूनि सकळ अस्त्रविद्येप्रत ॥ चवदा कळा चौसष्टी ॥९४॥

उपरी नागपत्रीं अश्वत्थीं नेऊन ॥ केलें सकल सिद्धार्थ साधन ॥ उपरी बद्रिकाश्रमीं जाऊन ॥ तपालागी बैसविलें ॥९५॥
नाथदीक्षा तत्काळ देऊनी ॥ उन्मनी मुद्रा लेववी कानीं ॥ शिंगी शैली सिद्ध करुनी ॥ नाथालागीं ओषिली ॥९६॥
असो ऐशा दीक्षारुपें ॥ द्वादश वर्षे केलें तप ॥ मग स्वर्गदेव मेळवूनि अमूप ॥ वरालांगीं दीधलें ॥९७॥
मावदें करुनि देदीप्यमान ॥ तुष्ट करुनि स्वर्गीचें जन ॥ बोळविलें स्थानोस्थान ॥ नाथा वर देऊनियां ॥९८॥
यावरी पुढें तो अत्रिसुत ॥ नागनाथा बोळवीत ॥ म्हणे बा रे महीचें तीर्थ ॥ सांगोपांग करीं कां ॥९९॥
तीर्थे अति मळीण ॥ तयांचा मळ सांडिती संतजन ॥ तस्मात् बा रे तीर्थाटन ॥ संतमेळीं करीं कां ॥१००॥
मग अवश्य म्हणूनि नाथ प्रेमळ ॥ वंदूनि श्रीगुरुचें पदकमळ ॥ तीर्थे कराया उतावेळ ॥ महीवरी संचरला ॥१॥
अत्रिसुत गेला गिरनारपर्वतीं ॥ येरीकडे नागनाथ जती ॥ तीर्थे करीन नाना क्षिती ॥ क्षिती बालेघाटीं पातला ॥२॥
तेथें पाहूनि शुद्ध कानन ॥ वस्तीसी राहिला मनोधर्म ॥ परी तो प्रतापी तपी सघन ॥ गांवोगांवीं समजला ॥३॥

मग अपार लोक येती दर्शना ॥ दिवसानुदिवस वाढे महिमा ॥ मग भक्तिपुरस्करांची वाढली महिमा ॥ तुम्ही येथेंचि वस्ती करावी ॥४॥
मग अपार धर्म करुन ॥ वस्तीसी राहिले अपार जन ॥ वडवाळ ऐसें ग्राम नाम ॥ नागनाथें ठेविलें ॥५॥
यापरी कोणे एके दिवशीं ॥ मच्छिंद्र आला त्या ठायासी ॥ सहज राहता झाला वडवाळासी ॥ नाथकीर्ती ऐकिली ॥६॥
म्हणोनि मच्छिंद्र दर्शना जात ॥ तो मठद्वारीं येऊनि त्वरित ॥ सदृढ चालतां द्वाराआंत ॥ स्वशिष्यांनीं हटकिलें ॥७॥
म्हणती नाथबोवा ऐका वचन ॥ पुढें नका करुं गमन ॥ श्रीनागनाथातें सांगून ॥ तुम्हां नेऊं दर्शना ॥८॥
तयाच्या परवानगीवांचून ॥ होत नाहीं कोणाचें गमन ॥ तस्मात् थांबावें एक क्षण ॥ आम्ही विचारुनि येतों कीं ॥९॥
ऐसें मच्छिंद्रें ऐकता वचन ॥ कोपानळीं चढलें मन ॥ चित्तीं म्हणे हा संतजन ॥ कैंचा राववत दिसतसे ॥११०॥
देवद्वार साधुद्वार ॥ मुक्त असावें निरंतर ॥ तरी कपटपणींचा संत वेव्हार ॥ संग्रहातें न ठेविती ॥११॥
तरी येथें आहे बंड ॥ जग भोंदावयाचें केले प्रचंड ॥ तरी शिक्षा आतां उदंड ॥ दाखवावी या नरा ॥१२॥

ऐसें क्रोधें चित्तीं आणून ॥ त्या शिष्यांसी केलें ताडण ॥ ताडण करितां बहुत जन ॥ सप्तशत शिष्य धांवले ॥१३॥
तें पाहूनियां मच्छिंद्रनाथ ॥ स्पर्शकळा त्वरें प्रेरीत ॥ तेणें झाले महीव्यक्त ॥ सातशें शिष्य सकळिक ॥१४॥
महीव्यक्त सकळ होतां ॥ नाथमुखवटा ताडण ॥ करितां ॥ तंव ते आरंबळती आक्रोशवंत ॥ एक आरडा उठला ॥१५॥
तों येरीकडे मठांत ॥ सदा ध्यानीं भरुनि नागनाथ ॥ कोल्हाळ आरडा ऐकूनि प्रांजळवंत ॥ देहावरी पातला ॥१६॥
ध्यान भंगिले कोल्हाळेंकरुन ॥ तेणे कोपानळीं पेटलें मन ॥ मग उपरी वरी शीघ्र जाऊन ॥ निजदृष्टीं पहातसे ॥१७॥
तैं सातशें शिष्य महीव्यक्त ॥ झाले ते चलनवलनरहित ॥ एकटा तया गणीं नाथ ॥ मुखावरी मेदीतसे ॥१८॥
ऐसें नागनाथें पाहून ॥ अत्यंत कोपला कोपानळानें ॥ म्हणे हा नाथ दीक्षेसी येतो दिसोन ॥ परी भ्रष्टबुद्धी आहे कीं ॥१९॥
शांति क्षमा दया पूर्ण ॥ पाळिजे साधूचें हेंचि लक्षण ॥ स्वप्नामाजी तीव्रपण ॥ ठेवूं नये निजवृत्तीं ॥१२०॥
तरी हा यातें नाहीं योग्य नाथ ॥ नाथपंथा लाविला डाग ॥ कोणता साधू होता मांग ॥ उपदेशिलें ऐशासी ॥२१॥

तरी यातें शिक्षा करुन ॥ दीक्षा घ्यावी हिरोन ॥ ऐसें कोपोंचि जल्पून ॥ धुनीभस्म कवळिलें ॥२२॥
प्रथम गरुडबंधनविद्या जल्पून ॥ स्वर्गी गरुडाचें केलें बंधन ॥ सकळ नुरे चलनवलन ॥ स्वर्गी व्यक्त केला असे ॥२३॥
मग विभक्तास्त्र जल्पून ॥ शिष्य मुक्त केले महीकारण ॥ मुक्त होतांचि सकळ जन ॥ नाथपृष्ठीं दडाले ॥२४॥
तें पाहूनियां मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे चूर्ण करावे हे समस्त ॥ मग जल्पूनि अस्त्रपर्वत ॥ महानग निर्मिला ॥२५॥
तो पर्वत विशाळपणीं ॥ येता झाला पंथगगनीं ॥ तें नाथें पाहूनि नयनीं ॥ शक्रवज जल्पिलें ॥२६॥
मग तो शीघ्र पाकशासन ॥ अंतराळीं वज्र देत सोडून ॥ तेणें पर्वत झाला चूर्ण ॥ मच्छिंद्रनाथ पाहुनी कोपला ॥२७॥
मग जल्पूनि वाताकर्षण ॥ शक्र पाडिला महीकारण ॥ वज्रकाळीविद्या जल्पून ॥ वज्रालागीं निवटिलें ॥२८॥
तें पाहूनियां नागनाथ ॥ मनीं क्षोभला अति अदभुत ॥ मग वातप्रेरक विद्या त्वरित ॥ मेघास्त्रावरी टाकिली ॥२९॥
तेणें शक्र सावध होऊन ॥ पळूं लागला भयेंकरुन ॥ म्हणे हे प्रतापी गहन दोघे जण ॥ आपुलें काम नसे येथें ॥१३०॥

ऐसें म्हणोनि भयस्थित ॥ शक्र स्थाना पळूनि जात ॥ येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ काय करितां पैं झाला ॥३१॥
मग वासवशक्ति अति दारुण ॥ जल्पूनि मंत्रप्रयोगानें ॥ सिद्ध करुनि देदीप्यमान ॥ नागेशभागा पाठविली ॥३२॥
परी ती शक्ति महादारुण ॥ सहस्त्रमित्रतेजेंकरुन ॥ प्रलयकाळींचा जैसा अग्न ॥ शब्द करीत येतसे ॥३३॥
शब्द करितां कडकडाट ॥ खचूनि पडती गिरिकपाट ॥ धरा कांपे जळजळाट ॥ द्विभाग होऊ पाहातसे ॥३४॥
श्वापदें पळती रानोरान ॥ दिग्गजां न मिळे कोठे ठिकाण ॥ पाताळभुवनीं शेष दचकून ॥ मूर्धनीते सरसावी ॥३५॥
एकाचि झाला हलकल्लोळ ॥ महींचे जीव चराचर सकळ ॥ घाबरोनि झाला हडवळ ॥ क्षमेंत स्थळ पाहती ॥३६॥
ऐसा पाहुनि महा आकांत ॥ काय करी नागनाथ ॥ सकळ दैवतें बंधनविद्येंत ॥ जल्पता झाला महाराजा ॥३७॥
तेणें दैवतांचें बंधन समस्त ॥ मग न धावती स्फुरल्या विद्येंत ॥ ऐसी केली गती कुंठित ॥ सकळ अस्त्रशस्त्रांची ॥३८॥
मग हेमाद्रिपर्वत दारुण ॥ अस्त्र योजिलें महादारुण ॥ हेमाद्रि अस्त्र पावोन ॥ नाथें वासवी शक्ती टाकिली ॥३९॥

तें पाहोनियां मच्छिंद्रनाथ ॥ शक्रवज्रालागीं स्तवीत ॥ वरी बंधन झालें सकळ दैवत ॥ अस्त्रविद्या फळेना ॥१४०॥
मग नाना अस्त्रांचें प्रयोग युक्तीं ॥ जपें परी ते सकळ व्यर्थ जाती ॥ मग निःशक्त मच्छिंद्र होवोनि जगती ॥ स्तब्धदृष्टीं पहातसे ॥४१॥
तों येरीकडे नागनाथ ॥ नाना अस्त्रें जल्पोनि त्वरित ॥ पर्वतासमान तक्षक तेथें ॥ अस्त्रविद्येसीं धावले ॥४२॥
मग मच्छिंद्रातें दंशूं धांवती ॥ शतानुशत नाहीं गगती ॥ ते पाहोनि मच्छिंद्रजती ॥ गरुडास्त्र तेव्हां जपतसे ॥४३॥
परी नागनाथें पूर्वप्रकरणीं ॥ केलें होतें गरुडबंधन ॥ तेथें मच्छिंद्राचा योग पूर्ण ॥ व्यर्थ झाला गरुडास्त्रीं ॥४४॥
मग ते सर्प उन्मत्त ॥ येवोनि डंखिती ठायीं नाथ ॥ तेणें मच्छिंद्र हडबडीत ॥ प्राण सोडूं पाहतसे ॥४५॥
मग अंतकाळींचा समय जाणून ॥ चित्त बुद्धी अंतःकरण ॥ काया वाचा तन मन ॥ गुरुचे चरण स्तवीतसे ॥४६॥
स्तवीतसे परी कैशा रीतीं ॥ ऊर्ध्वशब्द उद्धभटगति ॥ म्हणे महाराजा कृपामूर्ती ॥ अत्रिसुता धांव रे ॥४७॥
मी बाळक लडिवाळ जाण ॥ वेष्टलो असें सर्पबंधनें ॥ तरी माये तुजवांचून ॥ कोण सोडवील मज आतां ॥४८॥

हे त्रयदेवअवतारखाणी ॥ मज पाडसाची तूं हरिणी ॥ व्याघ्र बैसला मम प्राणहरणी ॥ ये धांवोन लगबगें ॥४९॥
परम संकटीं पडलों येथें ॥ कैसी निद्रा लागली तूतें ॥ सर्वसाक्षी असोनि जगातें ॥ नेत्र झांकिले मजविषयीं ॥१५०॥
दत्त दत्त ऐसें म्हणोन ॥ शब्द फोडिला अट्टाहस्येंकरुन ॥ नेत्र झाले श्वेतवर्ण ॥ मुखीं हुंदका येतसे ॥५१॥
परी दत्तात्रेयनामेंकरुन ॥ बाहे अट्टहस्यें वचन ॥ ते नागनाथें शब्द ऐकून ॥ साशंकित होतसे ॥५२॥
चित्तीं म्हणे मम गुरुचें ॥ स्मरण हा करितो किमर्थ वाचे ॥ तरी हा कोणाचा शिष्य याचें ॥ नांव विचारुं जावोनी ॥५३॥
मग निकट येवोनि वटसिद्धनाथ ॥ पुसता झाला स्नेहभरित ॥ म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत ॥ गुरु कोण तुमचा ॥५४॥
येरु म्हणे आदश नाथा ॥ नाम मच्छिंद्र तत्त्वतां ॥ प्रसन्न करोनि अत्रिसुता ॥ अनुग्रह घेतला ॥५५॥
तरी यासी नाथपंथ मूळ ॥ मी प्रथमभागीं दत्ताचें बाळ ॥ मजमागें जालिंदर सबळ ॥ दत्तानुग्रहीं मिरवला ॥५६॥
तयामागे भर्तरीनाथ ॥ दत्तशिष्य झाला जगविख्यात ॥ जोंवरी अवनी तोंपर्यत ॥ चिरंजीव मिरवला ॥५७॥

तयामागें रेवणनाथ ॥ दत्तानुग्रहीं प्रतापवंत ॥ जेणें जिंकोनि देव समस्त ॥ विप्रबाळें उठविलीं ॥५८॥
तरी महाराजा नाथपंथांत ॥ मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सुत ॥ ऐसें ऐकोनि वटसिद्धनाथ ॥ मनामाजी कळवळला ॥५९॥
मग सुपर्णाचें सोडून बंधन ॥ गरुडअस्त्र जपे वाचेकारण ॥ ऐसें होतां तत्काळ सुपर्ण ॥ महीवरी उतरले ॥१६०॥
उतरोनि नागकुळ समस्त ॥ होवोनियां भयभीत ॥ तत्काळ विष शोषूनि त्वरित ॥ अदृश्य ते पावले ॥६१॥
असो नागकुळ विष शोषून ॥ अदृश्य झालिया भयेंकरुन ॥ गरुडही उभयतां नमून ॥ स्वर्गाप्रती तो गेला ॥६२॥
येरीकडे नागनाथ ॥ मच्छिंद्रचरणीं माथा ठेवीत ॥ म्हणे तातासमान वडिल भ्रात ॥ गुरु माझा तूं होसी ॥६३॥
मग नेवोनियां स्वस्थानासी ॥ बैसविला आपणापाशीं ॥ गौरवोनि उदार मानसीं ॥ एक मास ठेविला ॥६४॥
यावरी मच्छिंद्र एके दिवशीं ॥ बोलता झाला नागनाथासी ॥ तुवा बंधन द्वारापाशीं ॥ ठेविलें काय म्हणोनियां ॥६५॥
भाविक येती दर्शनातें ॥ तव शिष्य येवों न देती त्यातें ॥ तुज मज कळी याचि निमित्तें ॥ झाली असे महाराजा ॥६६॥

यावरी बोले नागनाथ ॥ मी असतों सदा ध्यानस्थ ॥ जन हे येवोनि अपरिमित ॥ ध्यान माझें भंगिती ॥६७॥
म्हणोनि द्वारीं ठेवितो रक्षण ॥ उपरी बोले मच्छिंद्रनंदन ॥ नाथा हें नव्हे चांगुलपण ॥ भूषणिक आपणासी ॥६८॥
कोण जन ते हीन दीन ॥ व्हावया येती पवित्र पावन ॥ तरी ते द्वार अटक पाहोन ॥ विन्मुख मागें जाताती ॥६९॥
तरी मुक्तद्वार आतां येथून ॥ ठेवीं जगाचें अकिंचनपण ॥ हरोनियां मनोधर्म ॥ रुढमार्गा वाढवीं ॥१७०॥
ऐसें सांगोनि नागनाथासी ॥ मच्छिंद्र जाती तीर्थासी ॥ येरीकडे वडवाळगांवासी ॥ काय करी नाथ तो ॥७१॥
मुक्तद्वार अगार टाकोन ॥ मग दर्शना येती अपार जन ॥ नाना जगाचें अकिंचनपण ॥ फिटोनि मागे जाताती ॥७२॥
ऐसें असतां कोणे एके दिवशीं ॥ चांगुणा संतशिष्य होता त्यासी ॥ तयाची स्त्री पुण्यराशी ॥ मृत्यु पावली मठांत ॥७३॥
तें पाहोनि वटसिद्धनाथ ॥ उठविती तयाचे कांतेतें ॥ तेणें बोभाट वडवाळ्यांत ॥ घरोघरीं संचरला ॥७४॥
मग जयाचे घरीं होत मृत ॥ आणूनि टाकिती मठा प्रेत ॥ उठवूनि नागनाथ ॥ सदना धाडी तयाच्या ॥७५॥

ऐसें होतां बहुत दिवस ॥ संकट पडलें यमधर्मास ॥ मग तो जाऊन सत्यलोकास ॥ विधीलागीं निवेदी ॥७६॥
मग तो मूर्तिमंत चतुरानन ॥ वडवाळांत शीघ्र येवोन ॥ श्रीनाथाचा स्तव करोन ॥ राहविले त्या कर्मा ॥७७॥
यापरी सहा शिष्य त्यातें ॥ सिद्धकळा लाधली नवांतें ॥ ते जगामाजी प्रसिद्धवंत ॥ सिद्धनामीं मिरवले ॥७८॥
चांगुलसिद्ध धर्मसिद्ध ॥ देवसिद्ध भोमसिद्ध ॥ देवनसिद्ध भोमनसिद्ध ॥ कोकिळ सुंदरचक्षू तो ॥७९॥
ऐशा नवसिद्धांमाझारीं ॥ विद्या ओपिली कवित्व साबरी ॥ देव जिंकोनि सत्वरीं ॥ विद्यावरु मिरवले ॥१८०॥
बावन वीरांचे करोनि बंधन ॥ केल्या साबरी विद्या स्वाधीन ॥ ते साबरी विद्या कवित्वरत्न ॥ नवसिद्धांत मिरवती ॥८१॥
एक कोटी एक लक्ष ॥ नागनाथाची विद्या प्रत्यक्ष ॥ परोपकारी सौम्य दक्ष ॥ पीडाकारक नव्हती ॥८२॥
धांवरें खांडुक उसण ॥ टिके किरळ अहिरानैम ॥ वृश्चिकसर्पविषहरण ॥ ऐसी विद्या परोपकारीं ॥८३॥

असो ऐसी विद्या साबरी कवित ॥ नवांनीं प्रगट केली जगांत ॥ यापरी दिवस लोटले बहुत ॥ कथा वर्तली विप्राची ॥८४॥
समाधियोग सरला शेवट ॥ तैं उद्धरिला बहिरंभट ॥ आणि रामाजी भक्त सुभट ॥ हेमकारक उद्धरिला ॥८५॥
तरी त्या कथा पूर्ण भागांत ॥ वदलों भक्तिकथामृतग्रंथांत ॥ या उपरी चरपटीनाथ ॥ श्रवण करावें श्रोते हो ॥८६॥
धुंडीसुत नरहरिवंशीं ॥ मालू तो संतकृपेसी ॥ अवधान विद्ये सावकाशीं ॥ श्रोते तुम्ही अवधारा ॥८७॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ सप्तत्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥१८८॥
श्रीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ३७॥ ओंव्या १८८॥
॥ नवनाथभक्तिसार सप्तत्रिंशतितमऽध्याय समाप्त ॥